कोल्हापूर : महापुरामुळे जिल्ह्यातील बंद पडलेल्या ६१९ नळ पाणीपुरवठा योजनांपैकी चारच दिवसांत २९१ योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. उर्वरित योजनांपैकी ११८ योजना येत्या ७२ तासांमध्ये सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी ही माहिती दिली.
महापुराच्या काळात २३ जुलैपासून ६१९ पाणी योजना बंद पडल्या होत्या. याबाबत संजयसिंह चव्हाण यांनी याबाबत युध्दपातळीवर कार्यवाही करण्याच्या सूचना ग्रामाीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे यांना दिल्या. त्यानुसार बाराही तालुक्यातील अधिकारी आणि ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, कर्मचारी यांनी प्रयत्न करून २९ जुलैपर्यंत २९१ पाणी योजना पुन्हा सुरू केल्या आहेत.
आजरा, भुदरगड, चंदगड तालुक्यांतील बंद पडलेल्या योजना सुरू करण्यात आल्या असून शिरोळ, हातकणंगले आणि करवीर तालुक्यातील पुराचे पाणी ओसरल्यानंतर तातडीने योजना दुरूस्त करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
चौकट
तालुका बंद योजना सुरू झालेल्या योजना
आजरा १४ १४
भुदरगड ५६ ४५
चंदगड २१ २१
गडहिंग्लज ४२ २५
गगनबावडा ३२ ०९
हातकणंगले ३८ ०३
कागल ४३ १४
करवीर ९८ ३३
पन्हाळा ८३ ५१
राधानगरी ७९ ६२
शाहूवाडी ६५ ०९
शिरोळ ४८ ०५