शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

‘कृषिपंप’ कनेक्शनसाठी २८०० कोटींचे कर्ज घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 00:37 IST

नसिम सनदी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : निधीअभावी कृषिपंपासाठीच्या वीज जोडण्या प्रलंबित राहून, शेतकऱ्यांच्या उद्रेकाला सामोेरे जावे लागल्याने ...

नसिम सनदी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : निधीअभावी कृषिपंपासाठीच्या वीज जोडण्या प्रलंबित राहून, शेतकऱ्यांच्या उद्रेकाला सामोेरे जावे लागल्याने महावितरणने कर्ज काढून शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तीन वित्तीय संस्थांकडून २८०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले जाणार आहे. या कर्जाला राज्य शासनाने दोन वर्षांची हमीही दिली आहे.विदर्भ, मराठवाडा वगळून उर्वरित महाराष्ट्रातील शेतकºयांना याचा लाभ होणार आहे. निधीअभावी गेल्या वर्षभरात फक्त ८०० जोडण्या होऊ शकल्या. आता या निर्णयामुळे कोल्हापूर व सांगलीतील १५ हजार प्रलंबित जोडण्यांचा मार्ग मोकळा होणार आहे. कृषिपंपाची थकबाकी नगण्य असतानाही कोल्हापूर, सांगली, साताºयासह उर्वरित महाराष्ट्रातील शेतकºयांना महावितरणकडून वीज जोडणी वेळेत मिळत नाही. याउलट विदर्भ, मराठवाड्यात थकबाकी असतानाही त्यांना मात्र जोडणी देताना हात सैल सोडला जातो. याविरोधी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकºयांनी थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत आवाज उठविला. महाराज्य इरिगेशन फेडरेशनने सातत्याने मोर्चे, आंदोलने, मंत्र्यांसोबत बैठका या माध्यमांतून वीजजोडणी मिळावी म्हणून सातत्याने आवाज उठविला आहे. त्याला लोकप्रतिनिधींचेही बळ मिळाल्याने प्रलंबित वीजजोडणीच्यामुद्द्याने पेट घेण्यास सुरुवात केली आहे.ऐन विधानसभेच्या तोंडावर हा मुद्दा पेटणे परवडणारे नसल्याचे लक्षात आल्याने सरकारने तातडीने हालचाली करत ‘महावितरण’ने जोडणी देण्यासाठी मदत करण्याचे धोरण स्वीकारले आहे.२८ जूनला जीआर काढून कृषिपंपांना उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे वीज जोडण्या देण्यासह १०५ नवीन उपकेंद्रे उभारण्याकरिता लागणारा निधी बँकांकडून कर्जाऊ स्वरूपात घेण्यासह या कर्जाला दोन वर्षांसाठीची हमी सरकारने घेतली आहे. मार्च २०२० पर्यंत हे काम पूर्ण करा, असेही आदेशाद्वारे सूचित केले आहे.कोल्हापूर, सांगलीत१५ हजार जोडण्या प्रलंबितउर्वरित महाराष्ट्रातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील उच्चदाब वितरण प्रणालीच्या अजून १५ हजार जोडण्या प्रलंबित आहेत.यातील मार्च २०१८ पूर्वी मागणी केलेल्या १३ हजार ८९० अर्जांचा समावेश आहे. यातील ८०० जोडण्यांची कामे गेल्या वर्षभरात पूर्ण झाली आहेत; त्यासाठी ३११ कोटींचे टेंडर काढण्यात आले होते. त्यानुसार कामे झाली आहेत.उर्वरित कामे सुरू असून, निधी उपलब्ध होईल तसे मार्च २०२० पर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे. मार्च २०१८ नंतर २२६७ नवीन अर्ज आले आहेत. यात कोल्हापूरचे ८१३ आणि सांगलीचे १४१५ आहेत. निधीअभावी टेंडर प्रक्रिया अद्याप सुरूझालेली नाही.आचारसंहिता लागण्यापूर्वी ही प्रक्रिया सुरू होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. निधी आल्यानंतर टेंडर काढून प्रलंबित जोडण्यांची कामे हाती घेतली जाणार आहेत.