शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
3
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
4
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
6
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
7
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
8
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
9
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
10
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
11
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
12
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
13
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
14
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
15
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
16
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
17
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
18
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
19
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
20
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर

‘कृषिपंप’ कनेक्शनसाठी २८०० कोटींचे कर्ज घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 00:37 IST

नसिम सनदी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : निधीअभावी कृषिपंपासाठीच्या वीज जोडण्या प्रलंबित राहून, शेतकऱ्यांच्या उद्रेकाला सामोेरे जावे लागल्याने ...

नसिम सनदी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : निधीअभावी कृषिपंपासाठीच्या वीज जोडण्या प्रलंबित राहून, शेतकऱ्यांच्या उद्रेकाला सामोेरे जावे लागल्याने महावितरणने कर्ज काढून शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तीन वित्तीय संस्थांकडून २८०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले जाणार आहे. या कर्जाला राज्य शासनाने दोन वर्षांची हमीही दिली आहे.विदर्भ, मराठवाडा वगळून उर्वरित महाराष्ट्रातील शेतकºयांना याचा लाभ होणार आहे. निधीअभावी गेल्या वर्षभरात फक्त ८०० जोडण्या होऊ शकल्या. आता या निर्णयामुळे कोल्हापूर व सांगलीतील १५ हजार प्रलंबित जोडण्यांचा मार्ग मोकळा होणार आहे. कृषिपंपाची थकबाकी नगण्य असतानाही कोल्हापूर, सांगली, साताºयासह उर्वरित महाराष्ट्रातील शेतकºयांना महावितरणकडून वीज जोडणी वेळेत मिळत नाही. याउलट विदर्भ, मराठवाड्यात थकबाकी असतानाही त्यांना मात्र जोडणी देताना हात सैल सोडला जातो. याविरोधी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकºयांनी थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत आवाज उठविला. महाराज्य इरिगेशन फेडरेशनने सातत्याने मोर्चे, आंदोलने, मंत्र्यांसोबत बैठका या माध्यमांतून वीजजोडणी मिळावी म्हणून सातत्याने आवाज उठविला आहे. त्याला लोकप्रतिनिधींचेही बळ मिळाल्याने प्रलंबित वीजजोडणीच्यामुद्द्याने पेट घेण्यास सुरुवात केली आहे.ऐन विधानसभेच्या तोंडावर हा मुद्दा पेटणे परवडणारे नसल्याचे लक्षात आल्याने सरकारने तातडीने हालचाली करत ‘महावितरण’ने जोडणी देण्यासाठी मदत करण्याचे धोरण स्वीकारले आहे.२८ जूनला जीआर काढून कृषिपंपांना उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे वीज जोडण्या देण्यासह १०५ नवीन उपकेंद्रे उभारण्याकरिता लागणारा निधी बँकांकडून कर्जाऊ स्वरूपात घेण्यासह या कर्जाला दोन वर्षांसाठीची हमी सरकारने घेतली आहे. मार्च २०२० पर्यंत हे काम पूर्ण करा, असेही आदेशाद्वारे सूचित केले आहे.कोल्हापूर, सांगलीत१५ हजार जोडण्या प्रलंबितउर्वरित महाराष्ट्रातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील उच्चदाब वितरण प्रणालीच्या अजून १५ हजार जोडण्या प्रलंबित आहेत.यातील मार्च २०१८ पूर्वी मागणी केलेल्या १३ हजार ८९० अर्जांचा समावेश आहे. यातील ८०० जोडण्यांची कामे गेल्या वर्षभरात पूर्ण झाली आहेत; त्यासाठी ३११ कोटींचे टेंडर काढण्यात आले होते. त्यानुसार कामे झाली आहेत.उर्वरित कामे सुरू असून, निधी उपलब्ध होईल तसे मार्च २०२० पर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे. मार्च २०१८ नंतर २२६७ नवीन अर्ज आले आहेत. यात कोल्हापूरचे ८१३ आणि सांगलीचे १४१५ आहेत. निधीअभावी टेंडर प्रक्रिया अद्याप सुरूझालेली नाही.आचारसंहिता लागण्यापूर्वी ही प्रक्रिया सुरू होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. निधी आल्यानंतर टेंडर काढून प्रलंबित जोडण्यांची कामे हाती घेतली जाणार आहेत.