शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ‘आरटीई’ च्या २७०९ जागा अद्यापही रिक्त

By admin | Updated: May 9, 2017 15:49 IST

पालकांनी फिरविली पाठ, बुधवारपर्यंत संधी

आॅनलाईन लोकमत/संतोष मिठारी

कोल्हापूर : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ अन्वये (आरटीई) पहिलीच्या २५ टक्के आरक्षित प्रवेश प्रक्रियेअंतर्गत २७०९ जागा अद्यापही रिक्त आहेत. प्रवेशासाठी पहिल्या फेरीत तीनवेळा मुदतवाढ देऊनही ५६० विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चिती झाली आहे. विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत मोफत शिक्षण मिळणाऱ्या ‘आरटीई’कडे पालकांनी पाठ फिरविली असल्याचे दिसत आहे.

‘आरटीई’च्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेशासाठी जिल्ह्यातील मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या विनाअनुदानित स्वयंअर्थसहाय्यित ३२१ शाळांमध्ये ३२६९ जागा आहेत. या जागांवरील प्रवेशासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

प्रवेशाच्या ३२६९ जागांवरील प्रवेशासाठी २ मार्चअखेर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण १३३० आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी एकूण ११५९ पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी आरटीई आॅनलाईन प्रणालीद्वारे ‘एसएमएस’ पाठविण्यात आले होते.

ही फेरी २५ मार्चला संपली. त्यात ५२४ विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत, तर २१० विद्यार्थी अपात्र ठरले. यानंतर संबंधित पहिल्या फेरीअंतर्गत प्रवेशासाठी तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली. यामध्ये अवघ्या ३६ जणांची प्रवेश निश्चिती झाली. यापूर्वी ज्यांनी प्रवेश अर्ज दाखल केले नव्हते. त्यांच्यासाठी अर्ज करण्याची संधी ही दुसऱ्या फेरीद्वारे प्राथमिक शिक्षण विभागाने ३० एप्रिलपासून उपलब्ध करून दिली.

याअंतर्गत अर्ज करण्याची अंतिम मुदत बुधवार (दि. १० मे) पर्यंत आहे. मागासवर्गीय, दुर्बल व वंचित घटकांतील मुलांना आरटीईअंतर्गत सीबीएसई, एसएससी, आदी माध्यमांच्या विनाअनुदानित शाळांमध्ये आठवीपर्यंतचे शिक्षण मोफत मिळते. मात्र, पालकांची काहीशी उदासिनता, योग्य पद्धतीने लक्ष न देण्याच्या वृत्तीमुळे संबंधित प्रवेशासाठी संधी असूनदेखील पात्र असणाऱ्या मुलांना या मोफत शिक्षणापासून वंचित राहावे लागणार असल्याचे दिसत आहे. राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेली ही शिक्षणाची संधी साधण्यासाठी पालकांनी जागे होण्याची आवश्यकता आहे.

पालकांनी तत्काळ अर्ज करावा

जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत शिक्षणाची संधी मिळावी, या उद्देशाने प्रवेशाबाबत फेब्रुवारीपासून विविध माध्यमांतून जनजागृती सुरू केली असल्याचे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांनी सांगितले. ते म्हणाले, प्रत्येक शाळेच्या आवारात आरटीई प्रवेशाची माहिती देणारे फलक लावले होते. जिल्ह्यात २६ मदत केंद्रे कार्यन्वित होती. पहिल्या फेरीमध्ये प्रवेश निश्चितीसाठी तीनवेळा मुदतवाढ दिली. ज्यांचे अर्ज अपात्र ठरले त्यांना प्रवेश नाकारण्यात आले. विद्यार्थी हितास्तव प्रवेशासाठी अर्ज करण्याची दुसरी फेरी ३० एप्रिलला सुरू असून, त्याची अंतिम मुदत १० मेपर्यंत आहे. ज्यांनी प्रवेश प्रक्रियेत अर्ज केला नव्हता. त्यांना या फेरीत अर्ज करता येईल. ‘आरटीई’अंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतची ट्युशन फी सरकारद्वारे भरली जाते. त्यामुळे एकप्रकारे मोफत शिक्षण मिळते. ते लक्षात घेऊन प्रवेशासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी तत्काळ अर्ज करावा.

गेल्या चार वर्षांतील प्रवेशाची आकडेवारी

 २०१२-१३ : ४२५

२०१३-१४ : ८०४

२०१४-१५ : ११८१

२०१५-१६ : १७०९

आरटीईद्वारे समाजातील वंचित व दुर्बल घटकांतील मुलांच्या शिक्षणाला बळ मिळत आहे. मात्र, याअंतर्गत होणाऱ्या प्रवेशाबाबत संबंधित घटकांतील अधिकतर पालकांमध्ये जागृती नाही. त्यामुळे प्रवेश निश्चितीची आकडेवारी कमी दिसते. हे वास्तव लक्षात घेता शाळांनी आरटीई प्रवेशाबाबत जागृतीसाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.

- मोहन आवळे,

मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक, शिक्षकेतर महासंघ