शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ‘आरटीई’ च्या २७०९ जागा अद्यापही रिक्त

By admin | Updated: May 9, 2017 15:49 IST

पालकांनी फिरविली पाठ, बुधवारपर्यंत संधी

आॅनलाईन लोकमत/संतोष मिठारी

कोल्हापूर : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ अन्वये (आरटीई) पहिलीच्या २५ टक्के आरक्षित प्रवेश प्रक्रियेअंतर्गत २७०९ जागा अद्यापही रिक्त आहेत. प्रवेशासाठी पहिल्या फेरीत तीनवेळा मुदतवाढ देऊनही ५६० विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चिती झाली आहे. विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत मोफत शिक्षण मिळणाऱ्या ‘आरटीई’कडे पालकांनी पाठ फिरविली असल्याचे दिसत आहे.

‘आरटीई’च्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेशासाठी जिल्ह्यातील मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या विनाअनुदानित स्वयंअर्थसहाय्यित ३२१ शाळांमध्ये ३२६९ जागा आहेत. या जागांवरील प्रवेशासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

प्रवेशाच्या ३२६९ जागांवरील प्रवेशासाठी २ मार्चअखेर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण १३३० आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी एकूण ११५९ पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी आरटीई आॅनलाईन प्रणालीद्वारे ‘एसएमएस’ पाठविण्यात आले होते.

ही फेरी २५ मार्चला संपली. त्यात ५२४ विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत, तर २१० विद्यार्थी अपात्र ठरले. यानंतर संबंधित पहिल्या फेरीअंतर्गत प्रवेशासाठी तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली. यामध्ये अवघ्या ३६ जणांची प्रवेश निश्चिती झाली. यापूर्वी ज्यांनी प्रवेश अर्ज दाखल केले नव्हते. त्यांच्यासाठी अर्ज करण्याची संधी ही दुसऱ्या फेरीद्वारे प्राथमिक शिक्षण विभागाने ३० एप्रिलपासून उपलब्ध करून दिली.

याअंतर्गत अर्ज करण्याची अंतिम मुदत बुधवार (दि. १० मे) पर्यंत आहे. मागासवर्गीय, दुर्बल व वंचित घटकांतील मुलांना आरटीईअंतर्गत सीबीएसई, एसएससी, आदी माध्यमांच्या विनाअनुदानित शाळांमध्ये आठवीपर्यंतचे शिक्षण मोफत मिळते. मात्र, पालकांची काहीशी उदासिनता, योग्य पद्धतीने लक्ष न देण्याच्या वृत्तीमुळे संबंधित प्रवेशासाठी संधी असूनदेखील पात्र असणाऱ्या मुलांना या मोफत शिक्षणापासून वंचित राहावे लागणार असल्याचे दिसत आहे. राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेली ही शिक्षणाची संधी साधण्यासाठी पालकांनी जागे होण्याची आवश्यकता आहे.

पालकांनी तत्काळ अर्ज करावा

जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत शिक्षणाची संधी मिळावी, या उद्देशाने प्रवेशाबाबत फेब्रुवारीपासून विविध माध्यमांतून जनजागृती सुरू केली असल्याचे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांनी सांगितले. ते म्हणाले, प्रत्येक शाळेच्या आवारात आरटीई प्रवेशाची माहिती देणारे फलक लावले होते. जिल्ह्यात २६ मदत केंद्रे कार्यन्वित होती. पहिल्या फेरीमध्ये प्रवेश निश्चितीसाठी तीनवेळा मुदतवाढ दिली. ज्यांचे अर्ज अपात्र ठरले त्यांना प्रवेश नाकारण्यात आले. विद्यार्थी हितास्तव प्रवेशासाठी अर्ज करण्याची दुसरी फेरी ३० एप्रिलला सुरू असून, त्याची अंतिम मुदत १० मेपर्यंत आहे. ज्यांनी प्रवेश प्रक्रियेत अर्ज केला नव्हता. त्यांना या फेरीत अर्ज करता येईल. ‘आरटीई’अंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतची ट्युशन फी सरकारद्वारे भरली जाते. त्यामुळे एकप्रकारे मोफत शिक्षण मिळते. ते लक्षात घेऊन प्रवेशासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी तत्काळ अर्ज करावा.

गेल्या चार वर्षांतील प्रवेशाची आकडेवारी

 २०१२-१३ : ४२५

२०१३-१४ : ८०४

२०१४-१५ : ११८१

२०१५-१६ : १७०९

आरटीईद्वारे समाजातील वंचित व दुर्बल घटकांतील मुलांच्या शिक्षणाला बळ मिळत आहे. मात्र, याअंतर्गत होणाऱ्या प्रवेशाबाबत संबंधित घटकांतील अधिकतर पालकांमध्ये जागृती नाही. त्यामुळे प्रवेश निश्चितीची आकडेवारी कमी दिसते. हे वास्तव लक्षात घेता शाळांनी आरटीई प्रवेशाबाबत जागृतीसाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.

- मोहन आवळे,

मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक, शिक्षकेतर महासंघ