शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

‘बिद्री’कडून २५८५ दर

By admin | Updated: December 19, 2014 23:51 IST

के. पी. पाटील : एक कोटी युनिट वीज निर्यात; दोन लाख साखर पोत्यांचे पूजन

सरवडे : बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यास यावर्षी गळितास येणाऱ्या उसाला एफआरपीप्रमाणे प्रतिटन २५८५ रुपये एकरकमी देण्यात येणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी केली.बिद्री कारखाना कार्यस्थळावर कारखान्याच्या सहवीज प्रकल्पातून निर्माण झालेली एक कोटी युनिट वीज निर्यात व उत्पादित दोन लाख साखर पोत्यांचे पूजन, अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष पाटील यांच्या हस्ते साखर पोत्यांचे पूजन, तर एक कोटी वीज विक्री केली त्याबद्दल वीज निर्यात पॅनेलचे पूजन उपाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्ष पाटील म्हणाले, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेची उपलब्धता जादा असल्याने दिवसेंदिवस साखरेचे भाव कमी होत आहेत. केंद्र सरकारकडून बफर स्टॉक ठेवणे, निर्यातीसाठी अनुदान देणे अथवा विशेष अनुदान यासारखे उपाय योजले जातील. या प्रतीक्षेत सर्व कारखानदार आहेत. मात्र, त्यावर काही हालचाली होताना दिसत नाहीत. आपल्या सहवीज प्रकल्पाच्या उत्पादनातून ऊसदर देण्यासाठी काही प्रमाणात मदत होणार आहे. कारखाना यावर्षी गळितास आलेल्या उसाला प्रतिटन २५८५ रुपये दर जाहीर करीत असून, पहिल्या पंधरावड्यास गाळपास आलेल्या उसाचे बिल ऊस पुरवठादारांच्या बॅँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. केंद्र व राज्य शासनाची मदत, सवलती व साखरेचे दर वाढल्यास यापुढेही आर्थिक वाढावा देण्यास बिद्री कारखाना कटिबद्ध राहील.यावेळी उपाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, संचालक के. डी. नांदेकर, नामदेवराव भोईटे, ए. वाय. पाटील, गणपतराव फराकटे, विजयसिंह मोरे, वसंतराव पाटील, दत्तात्रय खराडे, पंडितराव केणे, विलासराव झोरे, धनाजीराव देसाई, सविता एकल, कमल चौगले, कार्यकारी संचालक आर. डी. देसाई, आदी उपस्थित होते.