शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

‘टोल’चे २५०० जणांवरील खटले काढणार

By admin | Updated: February 12, 2016 00:53 IST

प्रक्रिया सुरू : प्रशासनास मात्र शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा; कृती समितीच्या मागणीची घेतली दखल

गणेश शिंदे-- कोल्हापूर कोल्हापूरच्या ऐतिहासिक टोलविरोधी आंदोलनातील सुमारे अडीच हजार कार्यकर्त्यांवर पोलीस ठाण्यांत नोंद झालेले खटले काढून टाकण्याची प्रक्रिया पोलीस प्रशासनाने सुरू केली आहे. गेल्या रविवारी (दि. ७) येथे झालेल्या टोल रद्दच्या विजयोत्सवी मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी तसे थेट आदेश जिल्हा पोलीसप्रमुखांना दिले होते. त्यानुसार ही कार्यवाही सुरू झाली आहे. एकूण ५४ दखलपात्रसह ६३ गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये अदखलपात्र नऊ गुन्ह्यांंचा समावेश आहे. गुन्ह्यांमध्ये लाखो रुपयांच्या शासकीय मालमत्तेचे नुकसान झाल्याचा आरोप आहे.या आंदोलनात एकूण किती जणांवर गुन्हे दाखल आहेत, याची माहिती पोलिसांकडून जमा करण्यात येत आहे. एकूण ५४ गुन्हे नोंद आहेत. हा प्रत्येक गुन्हा सरासरी ५० जणांवर नोंद आहे. त्या हिशेबाने सुमारे अडीच हजारांहून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. त्यामध्ये एकच गुन्हा अनेक कार्यकर्त्यांवरही दाखल झालेल्यांची संख्याही जास्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुन्हे अडीच हजार असले तरी कार्यकर्त्यांची संख्या चौकशीत कमी होण्याची शक्यता आहे. कोल्हापुरातील टोल रद्द केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर शहर टोलविरोधी कृती समितीच्यावतीने रविवारी प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर सत्कार करण्यात आला. त्यामध्ये कृती समितीने व सार्वजनिक बांधकाम मंत्री (विशेष प्रकल्प) एकनाथ शिंदे यांनीही खटले काढून टाकण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी ही प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश पोलीस प्रशासनास दिले होते. कोल्हापुरात एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पामधून ‘आयआरबी’ कंपनीने ‘बांधा, वापरा व हस्तांतर करा’ (बीओटी) तत्त्वावर सुमारे ४९.४९ किलोमीटरचे रस्ते बांधले. हे रस्ते निकृष्ट दर्जाचे असल्याने शहरवासीयांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. गेली पाच वर्षे विविध माध्यमांतून आंदोलनाची धार वाढवत नेली. त्याची दखल राज्यकर्त्यांना घ्यावी लागली व टोल रद्दचा निर्णय झाला; परंतु आता त्यासाठी आंदोलन केलेल्या कार्यकर्त्यांची सुटका करण्याची मागणी पुढे आली व तिचीही दखल मुख्यमंत्र्यांनी घेऊन खटले काढून टाकण्याचे आदेश दिले.नऊ अदखलपात्र...शाहूपुरी, राजारामपुरी व करवीर या पोलीस ठाण्यांत अदखलपात्र असे एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. अदखलपात्र गुन्हे म्हणजे पोलिसांनी घेतली नाही तरी चालते. पण, संबधिताला ताकीद देणे, असे स्वरूप आहे.कोल्हापुरातील टोल आंदोलनातील कार्यकर्त्यांच्या दाखल झालेले गुन्हे काढून टाकावेत, या मुख्यमंत्री महोदय यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही प्रक्रिया सुरू केली आहे. पण, शासनाचा याबाबतचा आदेश अद्याप आलेला नाही. त्यांचा आदेश आल्यावर आम्ही टोल आंदोलनातील गुन्ह्यांचा प्रस्ताव शासनास सादर करू. - प्रदीप देशपांडे, जिल्हा पोलीस अधीक्षक,कोल्हापूर.प्रक्रिया अशी...गृह विभागाने हे खटले काढून घेण्यासंदर्भात जिल्हा पोलीस प्रशासनास आदेश द्यावे लागतील. त्यानुसार पोलीस प्रशासन शासनास त्यासंबंधीचा प्रस्ताव सादर करेल. हा प्रस्ताव गृहविभागाकडून पुन्हा विधि व न्याय विभागाकडे जाईल व त्यानंतर न्यायालयातून हे खटले काढून टाकण्याची कार्यवाही होईल. पोलिसांना हे खटले काढून टाकता येत नसल्याची माहिती कोल्हापूर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अजित मोहिते यांनी ‘लोकमत’ला दिली.भाग पाच, भाग सहाम्हणजे काय ? भारतीय दंंडविधान संहिता कलमानुसार टोल समितीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये भाग पाचमध्ये ३९ गुन्ह्यांचा समावेश आहे. खून, दरोडा, बलात्कार अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश असतो. यामध्ये तीन वर्षांपेक्षा जास्त वर्षांची शिक्षा असते. भाग सहामध्ये तीन वर्षांपेक्षा कमी व इतर भारतीय दंडविधान संहिता कलम असलेल्या गुन्ह्यांचा समावेश असतो. उदा. जुगार, हरणाचे कातडे पकडले आदी.