शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

चिखली, आंबेवाडीत अद्याप अडकलेेत २५० जण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:21 IST

मुसळधार पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात नेहमीप्रमाणे महापुराचा कहर झाला. महापुराने करवीर तालुक्यातील चिखली, आंबेवाडी या दोन गावांना विळखा घातल्याने अनेक ...

मुसळधार पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात नेहमीप्रमाणे महापुराचा कहर झाला. महापुराने करवीर तालुक्यातील चिखली, आंबेवाडी या दोन गावांना विळखा घातल्याने अनेक जण अडकले. पूरपरिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच काहींनी सुरक्षित स्थळी आसरा घेतला होता; पण अनेकांनी पुराची तीव्रता न भासल्याने घर न सोडता पहिल्या मजल्यावर अगर टेरेसवर आसरा घेतला.

चिखली व आंबेवाडी गावात अनेक दुभती जनावरे असल्याने गतवर्षीचा अनुभव पहाता अनेकांनी आपली दुभत्या गायी, म्हशी ही जनावरे अगोदरच सुरक्षितस्थळी नेऊन ठेवली होती. प्रशासनाने राबवलेल्या मदतकार्यात गेल्या दोन दिवसात महापुरात अडकलेल्या सुमारे साडेआठशेहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात प्रशासनाला यश आले. एनडीआरएफ’च्या बोटीतून हे वेगाने मदतकार्य सुरू आहे.

शनिवारी दिवसभर पावसाने उघडीप दिली, पुराचे पाणी काही अंशी उतरल्याने महापुरात अडकलेल्यांना दिलासा मिळाला, पण महापुराचा धोका कायम आहे. पुराचे पाणी उतरेल, या अपेक्षेने शनिवारी चिखलीत अडकलेले नागरिक घर सोडण्यास तयार नाहीत. अक्षरशा मदतकार्यातील लोक महापुरात अडकलेल्यांना हातापाया पडून बाहेर पडण्यासाठी आवाहन करीत आहेत; पण त्याला तितकासा प्रतिसाद दिला जात नव्हता. दिवसभरात सुमारे दोनशे नागरिकांना मदतकार्य राबवून महापुरातून बाहेर काढले. यामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांचा समावेश आहे.

घरे, गुऱ्हाळघरे पाण्याखाली

चिखली व आंबेवाडी ही तसे गुऱ्हाळघराची गावे म्हणून प्रसिद्ध आहेत. या दोन गावात सुमारे २० हून अधिक गुऱ्हाळघरे आहेत; पण महापुरामध्ये ही सर्वच गुऱ्हाळघरे पूर्णपणे पाण्याखाली गेली. या ठिकाणी फक्त गुऱ्हाळघराच्या आवारातील गवतांच्या गंजीच दिसत होत्या. याशिवाय बहुतांशी घरेही पाण्याखाली अडकली आहेत. या दोन गावातील बहुतांशी सर्वच घरे, इमारतींचे तळमजले पाण्याखाली गेले आहेत. शनिवारी दुपारी चिखली गावात सुमारे १० ते १२ फूट महापुरातील पाणी पातळी होती.

मदतीची याचना, पण प्रत्यक्षात नकार

महापुरात अडकलेल्या चिखलीतील काहींनी शनिवारी सकाळी नियंत्रण कक्षाला फोन करून आम्हाला महापुराच्या पाण्यातून बाहेर काढण्याची विनंती केली. त्यानुसार शिवाजी पूल येथून एनडीआरएफच्या बोटी पुराच्या पाण्यातून वाट काढत चिखली गावात पोहोचल्या; पण तेथे पोहोचल्यानंतर विनंती केलेल्यांनी बाहेर पडण्यास नकार दिल्याने मदतकार्यातील जवान संतप्त झाले.