शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

चिखली, आंबेवाडीत अद्याप अडकलेेत २५० जण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:21 IST

मुसळधार पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात नेहमीप्रमाणे महापुराचा कहर झाला. महापुराने करवीर तालुक्यातील चिखली, आंबेवाडी या दोन गावांना विळखा घातल्याने अनेक ...

मुसळधार पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात नेहमीप्रमाणे महापुराचा कहर झाला. महापुराने करवीर तालुक्यातील चिखली, आंबेवाडी या दोन गावांना विळखा घातल्याने अनेक जण अडकले. पूरपरिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच काहींनी सुरक्षित स्थळी आसरा घेतला होता; पण अनेकांनी पुराची तीव्रता न भासल्याने घर न सोडता पहिल्या मजल्यावर अगर टेरेसवर आसरा घेतला.

चिखली व आंबेवाडी गावात अनेक दुभती जनावरे असल्याने गतवर्षीचा अनुभव पहाता अनेकांनी आपली दुभत्या गायी, म्हशी ही जनावरे अगोदरच सुरक्षितस्थळी नेऊन ठेवली होती. प्रशासनाने राबवलेल्या मदतकार्यात गेल्या दोन दिवसात महापुरात अडकलेल्या सुमारे साडेआठशेहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात प्रशासनाला यश आले. एनडीआरएफ’च्या बोटीतून हे वेगाने मदतकार्य सुरू आहे.

शनिवारी दिवसभर पावसाने उघडीप दिली, पुराचे पाणी काही अंशी उतरल्याने महापुरात अडकलेल्यांना दिलासा मिळाला, पण महापुराचा धोका कायम आहे. पुराचे पाणी उतरेल, या अपेक्षेने शनिवारी चिखलीत अडकलेले नागरिक घर सोडण्यास तयार नाहीत. अक्षरशा मदतकार्यातील लोक महापुरात अडकलेल्यांना हातापाया पडून बाहेर पडण्यासाठी आवाहन करीत आहेत; पण त्याला तितकासा प्रतिसाद दिला जात नव्हता. दिवसभरात सुमारे दोनशे नागरिकांना मदतकार्य राबवून महापुरातून बाहेर काढले. यामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांचा समावेश आहे.

घरे, गुऱ्हाळघरे पाण्याखाली

चिखली व आंबेवाडी ही तसे गुऱ्हाळघराची गावे म्हणून प्रसिद्ध आहेत. या दोन गावात सुमारे २० हून अधिक गुऱ्हाळघरे आहेत; पण महापुरामध्ये ही सर्वच गुऱ्हाळघरे पूर्णपणे पाण्याखाली गेली. या ठिकाणी फक्त गुऱ्हाळघराच्या आवारातील गवतांच्या गंजीच दिसत होत्या. याशिवाय बहुतांशी घरेही पाण्याखाली अडकली आहेत. या दोन गावातील बहुतांशी सर्वच घरे, इमारतींचे तळमजले पाण्याखाली गेले आहेत. शनिवारी दुपारी चिखली गावात सुमारे १० ते १२ फूट महापुरातील पाणी पातळी होती.

मदतीची याचना, पण प्रत्यक्षात नकार

महापुरात अडकलेल्या चिखलीतील काहींनी शनिवारी सकाळी नियंत्रण कक्षाला फोन करून आम्हाला महापुराच्या पाण्यातून बाहेर काढण्याची विनंती केली. त्यानुसार शिवाजी पूल येथून एनडीआरएफच्या बोटी पुराच्या पाण्यातून वाट काढत चिखली गावात पोहोचल्या; पण तेथे पोहोचल्यानंतर विनंती केलेल्यांनी बाहेर पडण्यास नकार दिल्याने मदतकार्यातील जवान संतप्त झाले.