शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
4
Mumbai Metro: उद्यापासून आर ते वरळी मेट्रो धावणार, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
5
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
6
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
7
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
8
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
9
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
10
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
11
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
12
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
13
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
14
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
15
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
16
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
17
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
18
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
19
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
20
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?

‘वॉटर आॅडिट’साठी अडीच कोटी

By admin | Updated: August 13, 2016 00:39 IST

ठेकेदार निश्चित : स्थायी समिती सभेत निविदा मंजूर; गळती दूर होणार

कोल्हापूर : महानगरपालिका शहर पाणीपुरवठा विभागामार्फत केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याचे लेखापरीक्षण करण्यासाठी स्थायी समितीने शुक्रवारी ठेकेदाराची नियुक्ती केली. पाण्याच्या लेखापरीक्षणामुळे (वॉटर आॅडिट) शहरातील पाणीपुरवठ्याचा संपूर्ण लेखाजोखा मांडला जाईल, तसेच हायड्रॉलिक मॉडेलिंग व जीआयएस मॅपिंग केले जाईल. त्यामुळे पाणीपुरवठ्यातील गळती दूर होऊन शहरातील वितरणनलिकांचे रेखाचित्रे, आराखडे तयार होतील. या लेखापरीक्षणासाठी तब्बल दोन कोटी ३६ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे लेखापरीक्षण आतापर्यंत कधीही झाले नव्हते. त्यामुळे पाणीउपसा आणि प्रत्यक्ष होणारे बिलिंग यात मोठी तफावत होती. गळतीचे प्रमाण मोठे असल्याने नुकसान सोसावे लागत होते. जमिनीखालून कोठून जलवाहिनी गेल्या आहेत याचे कोणतेही रेखाचित्र महानगरपालिकेकडे उपलब्ध नाही. त्यामुळे जलवाहिन्यांना कोठे गळती आहे, हे कळत नाही. त्यामुळे पाण्याचे लेखापरीक्षण आणि सॅटेलाईट इमेज तसेज भूगर्भातील जलवाहिन्यांची फोटो इमेज घेऊन त्याद्वारे रेखाचित्रे तयार केली जाणार आहेत. ज्यामुळे जेथे गळती आहे, त्या ठिकाणीच खुदाई करणे सोयीचे होऊन वेळ व खर्चाची बचत होणार आहे. पुण्यातील एस.जी.आय.ए. स्टुडिओ इंजिग्नेरिया इंडिया प्रा. लि. या कंपनीला लेखापरीक्षणाचे काम देण्यात आले आहे. स्थायी समितीने शुक्रवारी त्यावर मोहर उमटविली. स्पॉट बिलिंगसाठी मीटर रीडर कार्यक्षमपणे काम करीत नाही. त्यांना स्पॉट बिलिंगच करायचे नाही. त्यामुळे मानधनावरील कमी केलेल्या मीटर रीडरना पुन्हा कामावर घ्यावे, अशी मागणी सभेत झाली. पाण्याची बिले वाढून येत आहेत. चुकीच्या पद्धतीने बिलांची आकारणी झाल्यामुळे नागरिकांना भुर्दंड बसत आहे, अशी तक्रार सत्यजित कदम, उमा इंगळे यांनी केली. शहरात रस्ताखुदाईसाठी १७७५ रुपये दर आकारण्यात येतो, तो ७०० रुपये करण्यात यावा, अशी मागणी जयश्री चव्हाण यांनी केली. तसा ठराव त्यांनी दिला. यावेळी झालेल्या विविध विषयांवरील चर्चेत रूपाराणी निकम, मेहजबीन सुभेदार, निलोफर आजरेकर, प्रतिज्ञा निल्ले, सूरमंजिरी लाटकर, अजित ठाणेकर यांनी भाग घेतला. (प्रतिनिधी) रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ पाणीपुरवठा तसेच प. व डि. विभागाकडील रोजंदारी कर्मचाऱ्यांना दिवसाला ४१४ रुपये रोजंदारी देण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. यापूर्वी २३६ रुपये रोजंदारी दिली जात होती. या निर्णयाचा लाभ २०० कर्मचाऱ्यांना होणार आहे.