शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
2
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
3
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
4
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
5
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
6
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
7
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
8
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
9
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
10
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
11
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
12
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
13
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
14
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
15
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
16
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
17
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
18
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
19
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
20
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘वॉटर आॅडिट’साठी अडीच कोटी

By admin | Updated: August 13, 2016 00:39 IST

ठेकेदार निश्चित : स्थायी समिती सभेत निविदा मंजूर; गळती दूर होणार

कोल्हापूर : महानगरपालिका शहर पाणीपुरवठा विभागामार्फत केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याचे लेखापरीक्षण करण्यासाठी स्थायी समितीने शुक्रवारी ठेकेदाराची नियुक्ती केली. पाण्याच्या लेखापरीक्षणामुळे (वॉटर आॅडिट) शहरातील पाणीपुरवठ्याचा संपूर्ण लेखाजोखा मांडला जाईल, तसेच हायड्रॉलिक मॉडेलिंग व जीआयएस मॅपिंग केले जाईल. त्यामुळे पाणीपुरवठ्यातील गळती दूर होऊन शहरातील वितरणनलिकांचे रेखाचित्रे, आराखडे तयार होतील. या लेखापरीक्षणासाठी तब्बल दोन कोटी ३६ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे लेखापरीक्षण आतापर्यंत कधीही झाले नव्हते. त्यामुळे पाणीउपसा आणि प्रत्यक्ष होणारे बिलिंग यात मोठी तफावत होती. गळतीचे प्रमाण मोठे असल्याने नुकसान सोसावे लागत होते. जमिनीखालून कोठून जलवाहिनी गेल्या आहेत याचे कोणतेही रेखाचित्र महानगरपालिकेकडे उपलब्ध नाही. त्यामुळे जलवाहिन्यांना कोठे गळती आहे, हे कळत नाही. त्यामुळे पाण्याचे लेखापरीक्षण आणि सॅटेलाईट इमेज तसेज भूगर्भातील जलवाहिन्यांची फोटो इमेज घेऊन त्याद्वारे रेखाचित्रे तयार केली जाणार आहेत. ज्यामुळे जेथे गळती आहे, त्या ठिकाणीच खुदाई करणे सोयीचे होऊन वेळ व खर्चाची बचत होणार आहे. पुण्यातील एस.जी.आय.ए. स्टुडिओ इंजिग्नेरिया इंडिया प्रा. लि. या कंपनीला लेखापरीक्षणाचे काम देण्यात आले आहे. स्थायी समितीने शुक्रवारी त्यावर मोहर उमटविली. स्पॉट बिलिंगसाठी मीटर रीडर कार्यक्षमपणे काम करीत नाही. त्यांना स्पॉट बिलिंगच करायचे नाही. त्यामुळे मानधनावरील कमी केलेल्या मीटर रीडरना पुन्हा कामावर घ्यावे, अशी मागणी सभेत झाली. पाण्याची बिले वाढून येत आहेत. चुकीच्या पद्धतीने बिलांची आकारणी झाल्यामुळे नागरिकांना भुर्दंड बसत आहे, अशी तक्रार सत्यजित कदम, उमा इंगळे यांनी केली. शहरात रस्ताखुदाईसाठी १७७५ रुपये दर आकारण्यात येतो, तो ७०० रुपये करण्यात यावा, अशी मागणी जयश्री चव्हाण यांनी केली. तसा ठराव त्यांनी दिला. यावेळी झालेल्या विविध विषयांवरील चर्चेत रूपाराणी निकम, मेहजबीन सुभेदार, निलोफर आजरेकर, प्रतिज्ञा निल्ले, सूरमंजिरी लाटकर, अजित ठाणेकर यांनी भाग घेतला. (प्रतिनिधी) रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ पाणीपुरवठा तसेच प. व डि. विभागाकडील रोजंदारी कर्मचाऱ्यांना दिवसाला ४१४ रुपये रोजंदारी देण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. यापूर्वी २३६ रुपये रोजंदारी दिली जात होती. या निर्णयाचा लाभ २०० कर्मचाऱ्यांना होणार आहे.