शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

फळपिकांच्या विमारकमेत २५ ते ५० टक्के कपात

By admin | Updated: November 7, 2014 00:08 IST

विमा कंपन्यांचा दबाव : कोल्हापूर जिल्ह्यातील केळी, द्राक्ष, आंबा बागायतदारांना बसणार फटका

प्रकाश पाटील - कोपार्डे --बदलत्या तापमानासह वेगवान वाऱ्यांमुळे व अवकाळी पावसाने होणारे फळपिकांचे नुकसान व संबंधित शेतकऱ्यांना बसणारा फटका लक्षात घेऊन शासनाने कृषी विभागाच्यावतीने हवामानाधारित पथदर्शक फळपीक विमा योजना याहीवर्षी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यावेळी विविध फळपिकांसाठी पूर्वी ठरविलेल्या विमा संरक्षण रकमेत तब्बल २५ ते ५० टक्क्यांनी कपात केली आहे. यात राज्यातील १२ जिल्ह्यांनाच लक्ष्य करीत शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविण्याचा प्रकार केल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहेत.द्राक्ष, केळी, संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू, आंबा, काजू, आदी निवडक फळपिकांना विमा संरक्षण मिळवून देण्यासाठी हवामानावर आधारित फळपीक योजनेचा पहिला टप्पा राज्यभरात राबविला होता. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला होता. योजनेला वाढता प्रतिसाद लक्षात घेता यंदा दुसऱ्या टप्प्यातील फळपीक विमा योजना सुरू ठेवण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होते. त्या अनुषंगाने १० सप्टेंबर २०१४ रोजी झालेल्या शासन निर्णयानुसार कृषी विभागाने द्राक्ष, संत्रा, मोसंबी तसेच डाळिंब, पेरू, केळी, आंबा व काजू या फळपिकांचा हवामानावर आधारित विमा योजनेत अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. दरम्यान, विमा कंपन्यांनी निवडक जिल्ह्यांसाठी पूर्वीच्या विमा संरक्षित रकमेवर हरकत घेतली. विमा कंपनीच्या दबावापुढे झुकलेल्या कृषी विभागाने शेतकऱ्यांचा कोणताही विचार न करता १६ आॅक्टोबरला विमा रकमेत २५ ते ५० टक्के कपातीचा सुधारित निर्णय घेतला आहे.विशेष म्हणजे शेतकऱ्यांचे हित न पाहता विमा कंपन्यांच्या अरेरावीपुढे कृषी विभागाने नांगी टाकली आहे. महिन्याभरातच आधीचा शासन निर्णय फिरविण्यात आला आहे. त्यातही सर्व खटाटोप विशेषत्वाने खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच कोकणातील १२ जिल्ह्यांसाठी केल्याचे उघडकीस आले आहे. त्यात जळगाव, धुळे, बुलडाणा, बीड, वर्धा, नागपूर, उस्मानाबाद, कोल्हापूर, नगर, लातूर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. विमा संरक्षित रकमेत व शेतकऱ्यांनी भरावयाच्या हप्त्यात कपात झाल्यानंतर विमा योजनेतील केंद्र व राज्य हिश्श्यातही आपोआपच कपात झाली आहे.फळपीकलाभक्षेत्रपूर्वीची विमा संरक्षण रक्कम (हेक्टरी)सुधारित विमा रक्कमही हेक्टरीकेळीजळगाव१ लाख५० हजारकेळीधुळे, बीड, कोल्हापूर, बुलडाणा, लातूर, उस्मानाबाद१ लाख७५ हजारमोसंबीनगर, बीड, नागपूर, बुलडाणा, वर्धा, उस्मानाबाद६० हजार४५ हजारद्राक्षबीड, बुलडाणा, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, उस्मानाबाद१ लाख ५० हजार१ लाख १२ हजारआंबाबीड, कोल्हापूर, उस्मानाबाद१ लाख७५ हजारकाजूरायगड, रत्नागिरी, कोल्हापूर७५ हजार५६ हजार २५० डाळिंबनगर, बीड, बुलडाणा, धुळे, लातूर, उस्मानाबाद१ लाख७५ हजारउसाला मिळणारा दर परवडणारा नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपला मोर्चा केळी, आंबा लागवडीकडे वळविला आहे; मात्र अवकाळी पावसाच्या तडाख्याने केळी व आंबा पिकांचे मोठे नुकसान होत होते. शासनाने फळपीक विमा योजना राबविली; पण त्यात कपात करून शेतकऱ्यांनाच नुकसान सोसावे लागणार आहे. तेव्हा पूर्वीप्रमाणेच योजना मार्गी लावावी. -विठ्ठल पाटील, शेतकरी संघटना, पाटपन्हाळा, ता. पन्हाळा