शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
3
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
4
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
5
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
6
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
7
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
8
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
9
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
10
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
11
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
12
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
13
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
14
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
15
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
16
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
17
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
18
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
19
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
20
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!

फळपिकांच्या विमारकमेत २५ ते ५० टक्के कपात

By admin | Updated: November 7, 2014 00:08 IST

विमा कंपन्यांचा दबाव : कोल्हापूर जिल्ह्यातील केळी, द्राक्ष, आंबा बागायतदारांना बसणार फटका

प्रकाश पाटील - कोपार्डे --बदलत्या तापमानासह वेगवान वाऱ्यांमुळे व अवकाळी पावसाने होणारे फळपिकांचे नुकसान व संबंधित शेतकऱ्यांना बसणारा फटका लक्षात घेऊन शासनाने कृषी विभागाच्यावतीने हवामानाधारित पथदर्शक फळपीक विमा योजना याहीवर्षी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यावेळी विविध फळपिकांसाठी पूर्वी ठरविलेल्या विमा संरक्षण रकमेत तब्बल २५ ते ५० टक्क्यांनी कपात केली आहे. यात राज्यातील १२ जिल्ह्यांनाच लक्ष्य करीत शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविण्याचा प्रकार केल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहेत.द्राक्ष, केळी, संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू, आंबा, काजू, आदी निवडक फळपिकांना विमा संरक्षण मिळवून देण्यासाठी हवामानावर आधारित फळपीक योजनेचा पहिला टप्पा राज्यभरात राबविला होता. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला होता. योजनेला वाढता प्रतिसाद लक्षात घेता यंदा दुसऱ्या टप्प्यातील फळपीक विमा योजना सुरू ठेवण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होते. त्या अनुषंगाने १० सप्टेंबर २०१४ रोजी झालेल्या शासन निर्णयानुसार कृषी विभागाने द्राक्ष, संत्रा, मोसंबी तसेच डाळिंब, पेरू, केळी, आंबा व काजू या फळपिकांचा हवामानावर आधारित विमा योजनेत अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. दरम्यान, विमा कंपन्यांनी निवडक जिल्ह्यांसाठी पूर्वीच्या विमा संरक्षित रकमेवर हरकत घेतली. विमा कंपनीच्या दबावापुढे झुकलेल्या कृषी विभागाने शेतकऱ्यांचा कोणताही विचार न करता १६ आॅक्टोबरला विमा रकमेत २५ ते ५० टक्के कपातीचा सुधारित निर्णय घेतला आहे.विशेष म्हणजे शेतकऱ्यांचे हित न पाहता विमा कंपन्यांच्या अरेरावीपुढे कृषी विभागाने नांगी टाकली आहे. महिन्याभरातच आधीचा शासन निर्णय फिरविण्यात आला आहे. त्यातही सर्व खटाटोप विशेषत्वाने खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच कोकणातील १२ जिल्ह्यांसाठी केल्याचे उघडकीस आले आहे. त्यात जळगाव, धुळे, बुलडाणा, बीड, वर्धा, नागपूर, उस्मानाबाद, कोल्हापूर, नगर, लातूर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. विमा संरक्षित रकमेत व शेतकऱ्यांनी भरावयाच्या हप्त्यात कपात झाल्यानंतर विमा योजनेतील केंद्र व राज्य हिश्श्यातही आपोआपच कपात झाली आहे.फळपीकलाभक्षेत्रपूर्वीची विमा संरक्षण रक्कम (हेक्टरी)सुधारित विमा रक्कमही हेक्टरीकेळीजळगाव१ लाख५० हजारकेळीधुळे, बीड, कोल्हापूर, बुलडाणा, लातूर, उस्मानाबाद१ लाख७५ हजारमोसंबीनगर, बीड, नागपूर, बुलडाणा, वर्धा, उस्मानाबाद६० हजार४५ हजारद्राक्षबीड, बुलडाणा, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, उस्मानाबाद१ लाख ५० हजार१ लाख १२ हजारआंबाबीड, कोल्हापूर, उस्मानाबाद१ लाख७५ हजारकाजूरायगड, रत्नागिरी, कोल्हापूर७५ हजार५६ हजार २५० डाळिंबनगर, बीड, बुलडाणा, धुळे, लातूर, उस्मानाबाद१ लाख७५ हजारउसाला मिळणारा दर परवडणारा नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपला मोर्चा केळी, आंबा लागवडीकडे वळविला आहे; मात्र अवकाळी पावसाच्या तडाख्याने केळी व आंबा पिकांचे मोठे नुकसान होत होते. शासनाने फळपीक विमा योजना राबविली; पण त्यात कपात करून शेतकऱ्यांनाच नुकसान सोसावे लागणार आहे. तेव्हा पूर्वीप्रमाणेच योजना मार्गी लावावी. -विठ्ठल पाटील, शेतकरी संघटना, पाटपन्हाळा, ता. पन्हाळा