शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

२४५ शासकीय समित्यांचा लागला ‘शोध’

By admin | Updated: February 10, 2015 00:29 IST

जिल्हा प्रशासनाकडून मोहीम : एकूण २८५ समित्या; आता होणार सदस्यांची नियुक्ती

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर जिल्ह्यात नेमक्या शासकीय समित्या आहेत तरी किती? याचाच शोध जिल्हा प्रशासनातर्फे घेण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या समित्यांवरील सदस्यांच्या नियुक्त्या आठवडाभरात करणार असल्याचे सांगितल्यावर या समित्या किती आहेत, याची माहिती घेतली जात आहे. आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तब्बल २४५ विविध समित्यांची माहिती उपलब्ध झाली आहे. दोन्ही काँग्रेसच्या सत्ताकाळात त्यांनी या समित्यांवरील सदस्यांच्या नियुक्तीकडे फारसे लक्षच दिले नव्हते. त्यामुळे या समित्या कागदावरच राहिल्या. त्यामुळे आता नव्या पालकमंत्र्यांनी सदस्यांची नियुक्ती करण्याची घोषणा केल्यावर प्रशासनाने त्याचा शोध सुरू केला. त्यातून फारच भन्नाट माहिती पुढे आली. एकूण अधिकृत समित्या किती, त्यांचे काम कसे चालते, त्याचे सचिव कोण आहेत, त्यांचे अधिकार काय याचा पत्ता लागलेला नाही. प्रशासनाला आतापर्यंत २४५ समित्या शोधून काढण्यात यश आले. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काही समित्यांचे रेकॉर्ड अद्ययावत ठेवल्याचे समजल्यानंतर तेथून माहिती घेतली आहे.ग्राहक तक्रार निवारण, महिला दक्षता, जिल्हा नियोजन, बालहक्क अशा तब्बल २८५ समिती असल्याची प्रशासनाची माहिती आहे. त्यातील बहुतांशी समित्यांमध्ये ‘अशासकीय सदस्य’ असतात. ‘सदस्य’ म्हणून सत्ताधारी नेते कार्यकर्त्यांना संधी देतात. पदसिद्ध अध्यक्ष जिल्हाधिकारी असले तरी अन्य कामाच्या व्यापातून इतक्या समित्यांच्या कामकाजात त्यांना थेट सहभाग घेणे शक्य नसते. त्यामुळे ‘सचिव’च समितीचा कारभार पाहतात. आवश्यक त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची सही घेतली जाते. अनेक वर्षांपासून असाच कारभार सुरू आहे. सर्व समित्यांमध्ये एकूण ‘अशासकीय सदस्य’ किती याचीही अद्ययावत संख्या या घडीला प्रशासनाकडे उपलब्ध नाही. परिणामी समित्याच माहीत नाही तर कामकाजाचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या समित्यांवरील सदस्यांना मोठा मान-सन्मान मिळतो असेही नाही. मात्र, लोकप्रतिनिधींना समित्यांवर कार्यकर्त्यांना संधी दिल्याचे समाधान मिळते. कांही दिवसापंतर अनेक सदस्य नियमित बैठकांना येत नाहीत. जनतेलाही समितीच्या कामकाजाबद्दल देणे-घेणे नसते. कोणत्या समितीचे काय काम आहे, जबाबदारी कोणती आहे, याची पुरेशी माहिती नसते. त्यामुळे समित्यांच्या कामकाजाबद्दल कोणी जाब विचारत नाही. परिणामी प्रशासनानेही या समित्यांकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. जिल्हा स्तरावर विविध २८५ शासकीय समित्या आहेत. सर्व समित्यांची माहिती संकलित केली जात आहे. आतापर्यंत २४५ समितींची माहिती संकलित झाली आहे. अजून माहिती घेण्याचे काम सुरू आहे. - विक्रांत चव्हाण, निवासी जिल्हाधिकारी