शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

२४५ शासकीय समित्यांचा लागला ‘शोध’

By admin | Updated: February 10, 2015 00:29 IST

जिल्हा प्रशासनाकडून मोहीम : एकूण २८५ समित्या; आता होणार सदस्यांची नियुक्ती

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर जिल्ह्यात नेमक्या शासकीय समित्या आहेत तरी किती? याचाच शोध जिल्हा प्रशासनातर्फे घेण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या समित्यांवरील सदस्यांच्या नियुक्त्या आठवडाभरात करणार असल्याचे सांगितल्यावर या समित्या किती आहेत, याची माहिती घेतली जात आहे. आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तब्बल २४५ विविध समित्यांची माहिती उपलब्ध झाली आहे. दोन्ही काँग्रेसच्या सत्ताकाळात त्यांनी या समित्यांवरील सदस्यांच्या नियुक्तीकडे फारसे लक्षच दिले नव्हते. त्यामुळे या समित्या कागदावरच राहिल्या. त्यामुळे आता नव्या पालकमंत्र्यांनी सदस्यांची नियुक्ती करण्याची घोषणा केल्यावर प्रशासनाने त्याचा शोध सुरू केला. त्यातून फारच भन्नाट माहिती पुढे आली. एकूण अधिकृत समित्या किती, त्यांचे काम कसे चालते, त्याचे सचिव कोण आहेत, त्यांचे अधिकार काय याचा पत्ता लागलेला नाही. प्रशासनाला आतापर्यंत २४५ समित्या शोधून काढण्यात यश आले. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काही समित्यांचे रेकॉर्ड अद्ययावत ठेवल्याचे समजल्यानंतर तेथून माहिती घेतली आहे.ग्राहक तक्रार निवारण, महिला दक्षता, जिल्हा नियोजन, बालहक्क अशा तब्बल २८५ समिती असल्याची प्रशासनाची माहिती आहे. त्यातील बहुतांशी समित्यांमध्ये ‘अशासकीय सदस्य’ असतात. ‘सदस्य’ म्हणून सत्ताधारी नेते कार्यकर्त्यांना संधी देतात. पदसिद्ध अध्यक्ष जिल्हाधिकारी असले तरी अन्य कामाच्या व्यापातून इतक्या समित्यांच्या कामकाजात त्यांना थेट सहभाग घेणे शक्य नसते. त्यामुळे ‘सचिव’च समितीचा कारभार पाहतात. आवश्यक त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची सही घेतली जाते. अनेक वर्षांपासून असाच कारभार सुरू आहे. सर्व समित्यांमध्ये एकूण ‘अशासकीय सदस्य’ किती याचीही अद्ययावत संख्या या घडीला प्रशासनाकडे उपलब्ध नाही. परिणामी समित्याच माहीत नाही तर कामकाजाचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या समित्यांवरील सदस्यांना मोठा मान-सन्मान मिळतो असेही नाही. मात्र, लोकप्रतिनिधींना समित्यांवर कार्यकर्त्यांना संधी दिल्याचे समाधान मिळते. कांही दिवसापंतर अनेक सदस्य नियमित बैठकांना येत नाहीत. जनतेलाही समितीच्या कामकाजाबद्दल देणे-घेणे नसते. कोणत्या समितीचे काय काम आहे, जबाबदारी कोणती आहे, याची पुरेशी माहिती नसते. त्यामुळे समित्यांच्या कामकाजाबद्दल कोणी जाब विचारत नाही. परिणामी प्रशासनानेही या समित्यांकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. जिल्हा स्तरावर विविध २८५ शासकीय समित्या आहेत. सर्व समित्यांची माहिती संकलित केली जात आहे. आतापर्यंत २४५ समितींची माहिती संकलित झाली आहे. अजून माहिती घेण्याचे काम सुरू आहे. - विक्रांत चव्हाण, निवासी जिल्हाधिकारी