शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

आयकर भरणाऱ्या ३४०० शेतकऱ्यांकडून २.४० कोटी वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:24 IST

राजाराम लोंढे लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : केंद्र सरकारच्या पी. एम. किसान पेन्शन योजनेतील अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांकडून वसुली सुरू ...

राजाराम लोंढे

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या पी. एम. किसान पेन्शन योजनेतील अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांकडून वसुली सुरू झाली आहे. आयकर भरणाऱ्या ३८३२ शेतकऱ्यांपैकी ३४०० शेतकऱ्यांनी दोन कोटी ४० लाख रुपये सरकारला परत केले आहेत. उर्वरित ४३२ शेतकऱ्यांना पैसे भरण्यासाठी मंगळवार (दि. ८)पर्यंत मुदत दिली आहे.

शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या वतीने वार्षिक सहा हजार रुपये पेन्शन दिली जाते. जिल्ह्यातून पाच लाख ३७ हजार २१ शेतकऱ्यांनी पी. एम. किसान योजनेत सहभाग घेतला हाेता. चुकीची माहिती भरून पेन्शन योजनेचा लाभ घेतल्याच्या तक्रारी आल्यानंतर शासनाच्या वतीने संबंधित खात्यांची चौकशी सुरू केली. यामध्ये निकषांचे उल्लंघन केलेले १८ हजार लाभार्थी आढळले. त्यांमध्ये ३८३२ शेतकरी हे आयकर भरणारे असल्याचे स्पष्ट झाले. आयकर विभागानेच ही यादी दिल्याने शासनाकडून त्यांची वसुली सुरू केली. संबंधित शेतकऱ्यांना लाभ घेतलेली रक्कम परत करण्यासाठी ५ डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती. या कालावधीत ३४०० शेतकऱ्यांनी २ कोटी ४० लाख रुपये शासनाला परत केले आहेत. अजून ४३२ शेतकऱ्यांनी पैसे भरलेले नाहीत. पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे महसूल यंत्रणा त्यात गुंतली होती. त्यात काही सुट्ट्या आल्याने आणखी तीन दिवस म्हणजेच मंगळवारपर्यंतची मुदत दिली आहे. या कालावधीत पैसे भरले नाहीत तर बुधवारपासून गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

आयकर भरणाऱ्यांसह जमीन नावावर नसलेले, तरुण, पती-पत्नी दुहेरी लाभ घेतलेलेही आहेत. त्याचबरोबर राज्य सरकारच्या श्रावणबाळ, संजय गांधीसह इतर पेन्शन योजनेचा लाभ घेणाऱ्या ३७५० लोकांनी ‘पी. एम. किसान’चा लाभ घेतला आहे. त्यांच्याकडूनही वसुली केली जाणार आहे. त्यांना आठवड्यात नोटिसा काढून डिसेंंबरअखेर वसुली केली जाणार आहे.

-------------------------------------------

कारवाईची शेतकऱ्यांमध्ये धास्ती

शासनाने पैसे परत न करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीची धास्ती आहे. त्यामुळेच आयकर भरणाऱ्यांनी तातडीने पैसे परत केले.

-------------------------------------------

लाभार्थ्याकडून पैसे वसूल करण्याची पहिलीच वेळ

चुकीच्या पद्धतीने शासकीय अनुदान घेतलेल्यांकडून वसुलीच्या घटना घडल्या असतील. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात वसुली करण्याची ही पहिलीच वेळ आहे.