शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

२४ साखर कारखान्यांची धुराडी पेटली

By admin | Updated: November 5, 2014 00:49 IST

पंधरा लाख टनाचे गाळप : कोल्हापूर विभागातील बहुतांशी कारखाने १० नोव्हेंबरनंतरच

कोल्हापूर : राज्यात सोलापूर व अहमदनगर विभागातील २४ साखर कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. या कारखान्यांच्या गळीत हंगामाने गती घेतली नसली तरी आतापर्यंत १५ लाख टन उसाचे गाळप झालेले आहे. कोल्हापूर विभागातील कारखाने गळीत हंगामासाठी सज्ज असले तरी ऊस दराची कोंडी अजून फुटली नसल्याने यांची धुराडी अद्याप थंडच आहेत. साधारणत: १० नोव्हेंबरनंतर येथील बहुतांशी कारखान्यांचा हंगाम गती घेण्याची शक्यता आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस परिषदेत २७०० रुपये पहिल्या उचलीची मागणी केली आहे. साखर कारखान्यांचा उतारा व त्यानुसार शेतकऱ्यांना द्यावी लागणारी एफआरपीची रक्कम पाहिली तर या मागणीच्या जवळपासच आहे. सध्या बाजारपेठेतील साखरेचे दर व राज्य सहकारी बँकेने कारखान्यांना देऊ केलेली उचल पाहता एकरकमी एफआरपी देताना कारखानदारांची दमछाक होणार आहे. दरवर्षी ऊस परिषदेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊसदराचे आंदोलनाचे रणशिंग फुंकते पण यावर्षी तात्पुरते का असेना आंदोलनाचे हत्यार म्यान करून चर्चेसाठी वेळ दिलेली आहे. पण कारखाने सुरू करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे कारखानदारांसमोर पेच निर्माण झाला आहे. राज्य व केंद्र सरकारने कारखान्यांना मदतीबाबत तोंडही उघडलेले नाही. अशा परिस्थितीत कारखाने सुरू केले तर कायदेशीर कचाट्यात अडकण्याची भीती कारखानदारांना आहे. त्यामुळे विशेषत: कोल्हापूर विभागातील कारखानदारांनी ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ अशी भूमिका घेतली आहे. पुणे, सोलापूर व सातारा जिल्ह्यांतील सहकारी व खासगी अशा २२ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. अहमदनगर विभागातील एक सहकारी व एक खासगी साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला आहे. आठवड्यात या कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला असून आतापर्यंत १५ लाख टन उसाचे गाळप झाले. कोल्हापूर विभागातील कारखान्यांचा साखर उतारा जास्त आहे, परिणामी एफआरपीही वाढते. त्यामुळे कारखानदारांनी सध्या तरी थांबण्याचा निर्णय घेतला असून १० नोव्हेंबरनंतर हळूहळू कारखाने सुरू होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या नजरा चिमणीकडे मध्यंतरी तीन दिवसांचा अपवाद वगळता गेले महिनाभर उन्हाचा तडाका सुरू आहे. या काळात पाणी दिले नाही तर वजनाला फटका बसतो. लागणी करून सोळा महिन्यांचा कालावधी गेला तरी अद्याप ऊस तुटत नाही, त्यात कारखानदारही हंगामाबाबत बोलण्यास तयार नसल्याने शेतकऱ्यांच्या नजरा कारखान्यांच्या चिमणीकडे लागल्या आहेत. कोल्हापूर विभागातील साखर कारखान्याकडे अजून ऊसतोडणी मजूर आलेले नाहीत. त्यात राज्य बँकेने जाहीर केलेल्या उचलीमुळे कारखान्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. येत्या पाच-सहा दिवसांत विभागातील तीन-चार कारखाने सुरू होतील. - पी. जी. मेढे (तज्ज्ञ संचालक, छत्रपती राजाराम कारखाना)