शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपूरकरांना २४ तास पाणी

By admin | Updated: November 24, 2014 23:05 IST

योजनेसाठी हायटेक यंत्रणा : साडेआठ कोटींचा प्रस्ताव; नगरपालिका करणार नियोजन

संदीप बावचे - जयसिंगपूर -शहरात पाणीपुरवठ्याची हायटेक यंत्रणा करण्यासाठी जयसिंगपूर नगरपालिकेने विकासात्मक पाऊल टाकले आहे. वॉटर आॅडिट योजनेनंतर नळ पाणीपुरवठा, जॅकवेलचे विस्तारीकरण, जलशुद्धिकरणाचे नूतनीकरण, दहा लाख लिटर क्षमतेची नवीन टाकी व त्यासाठी आवश्यक वितरण नलिका अशी साडेआठ कोटी रुपयांची योजना शहरात राबविली जाणार आहे. सन १९६७ मध्ये उदगाव येथील कृष्णा नदीवरून जयसिंगपूर शहरासाठी नळ पाणी योजना राबविताना २५ हजार लोकसंख्या गृहित धरून ती करण्यात आली होती. त्या काळात चिपरी गावालाही पाणीपुरवठा केला जात होता. टप्प्याटप्प्याने वाढलेली उपनगरे, लोकसंख्या, आदींमुळे पुरेसा पाणीपुरवठा करणे अडचणीचे ठरले होते. सन २००६ ते २०११ या काळात पाणी साठवणूक क्षमता कमी प्रमाणात होत असल्यामुळे पाणीपुरवठा करण्यामध्ये असमतोलपणा निर्माण झाल्याचा प्रश्न पुढे आला होता. यावेळी नगरसेवक व प्रशासन यंत्रणेने पुढाकार घेऊन केंद्र शासनाच्या युआयडीएसएसएटी या योजनेतून दहा कोटी ऐंशी लाखांचा प्रस्ताव मंजूर केला. त्यामध्ये अजिंक्यतारा सोसायटी येथे सात लाख, दिन बंधू येथे पाच लाख लिटर क्षमतेच्या दोन पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या. यामुळे शहरातील राजीव गांधीनगर, दत्त कॉलनी, प्रियदर्शनी कॉलनी, हेरवाडे कॉलनी, खामकर मळा या भागाला पाणीपुरवठा करणे शक्य झाले. दरम्यान, शासनाच्या अन्य निधीतून व पालिकेच्या फंडातून शाहूनगरमध्ये सात लाख, आंबेडकर सोसायटीत दोन लाख, आठवी गल्लीत दोन लाख, नोकर हौसिंग सोसायटी येथे तीन लाख क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या. विस्तारित शहरामुळे या पाण्याच्या टाक्या आवश्यक होत्या. शहराला मीटर पद्धतीने पाणी पुरवठ्यास प्रारंभ झाल्यानंतर जल व ऊर्जा लेखा परीक्षण (वॉटर आॅडिट) ही योजना राबविण्यात आली आहे. या योजनेंतर्गत ग्राहक सर्वेक्षण, जल लेखा परीक्षण, ऊर्जा लेखा परीक्षण, पाणी मोजमाप यंत्र, भविष्यातील नियोजित आराखडा, जी.आय.एस. (वेबसाईट) प्रणाली आणि मीटर रीडिंग यंत्रणा यावर हा निधी खर्च करण्यात आला आहे. यामुळे पाणी उपसा होणाऱ्या ठिकाणापासून ते वितरण प्रणालीपर्यंत पाण्याची मोजदाद करणे सोईस्कर बनले आहे. वॉटर आॅडिट योजना राबविण्यात आल्यानंतर या योजनेवर काम करणाऱ्या जीवन प्राधिकरण व खासगी एजन्सीने दिलेल्या अहवालानुसार सध्याच्या पाणीपुरवठा योजना कमकुवत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे अद्ययावत अशी पाणीपुरवठा योजना राबविण्याच्या शिफारशीनुसार शासनाचा पाणीपुरवठा विभाग व नगरपालिकेने पाणी योजना हायटेक बनविण्याच्या दृष्टिकोनातून पुढाकार घेण्याचे धोरण निश्चित केले आहे. सध्या असलेल्या जॅकवेलचे विस्तारीकरण करण्याबरोबरच जलशुद्धिकरण केंद्राचे नूतनीकरण, जुनी खराब झालेली दगडी टाकी, ई-वार्ड टाकीच्या जागी दहा लाख लिटर्स क्षमतेची नवीन पाण्याची टाकी बांधणे, त्यासाठी आवश्यक वितरण नलिका, असा साडेआठ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाला पाठविण्याचा ठराव नुकताच विशेष सभेत मंजूर केला आहे. २४ तास पाणीनळ पाणीपुरवठ्याच्या नव्याने प्रस्तावित असणाऱ्या या योजनेतून येत्या २५ वर्षांत शहरातील पाणीपुरवठा अद्ययावत करण्यात येणार असून, सुमारे एक लाख नागरिकांना पाणीपुरवठा होईल, असा आराखडा तयार करण्यात आला आहे. शहरात शंभर टक्के नळांना मीटर व पाण्याचा स्रोत मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यास नळाला २४ तास पाणी देण्याची योजना नगरपालिकेकडून भविष्यात सुरू करण्यात येईल, असा आशावाद माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अस्लम फरास यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.योग्य नियोजनयाव्यतिरिक्त शहराच्या शाहूनगर, आंबेडकर सोसायटी, लक्ष्मी पार्क यांसह उर्वरित भागांत तांत्रिकदृष्ट्या योग्य व अचूक पाण्याच्या पाईपलाईनही टाकण्यात येणार आहेत.