शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

विनाकारण फिरणारे २३१ पॉझिटिव्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:21 IST

भारत चव्हाण / कोल्हापूर : कोल्हापूर शहरात तुलनेने सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून येत असताना तसेच संचारबंदीचे निर्बंध असताना विनाकारण ...

भारत चव्हाण / कोल्हापूर : कोल्हापूर शहरात तुलनेने सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून येत असताना तसेच संचारबंदीचे निर्बंध असताना विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची संख्या कमी नाही. दुसऱ्या लाटेत अशा मोकाट फिरणाऱ्या ४,४२७ नागरिकांना पकडून त्यांच्या महापालिकेच्या पथकामार्फत ॲंटिजन चाचण्या करण्यात आल्या, त्यात २३१ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले. हा एक कारवाईचा भाग असला तरी त्यामुळे संसर्ग रोखण्यासही मदत झाली.

जिल्ह्यात आणि शहरात संचारबंदी, लॉकडाऊन असूनही नागरिक वेगवेगळी कारणे शोधून रस्त्यावर मोकाट फिरत आहेत. त्यांना ना कोरोनाचे गांभीर्य ना त्यांच्या कुटुंबीयांची चिंता! सकाळी ११ वाजल्यापासून संचारबंदी असताना नागरिक रस्त्यावर येत असल्याचे पाहून महापालिका प्रशासनाने जो रस्त्यावर येईल, त्याची सक्तीने ॲंटिजन चाचणी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातील एक पथक स्थापन केले होते, नंतर रोज दोन ठिकाणी दोन पथके कार्यरत ठेवली. रस्त्यावर अशी चाचणी होतेय म्हटल्यावर काही महाभागांनी आपले मार्ग बदलले; पण फिरणे थांबिवले नाही.

-दंड भरू; पण बाहेर फिरू-

साने गुरुजी वसाहत परिसरात घडलेला हा किस्सा आहे. एक सेवानिवृत्त व्यक्ती रोज सकाळी फिरायला जायची. लॉकडाऊनमध्ये सकाळी फिरताना त्यांना पोलिसांनी पकडले आणि ५०० रुपये दंड केला. दंड भरल्यामुळे दुसऱ्या दिवशी फिरणे बंद होणे अपेक्षित होते. पण दुसऱ्या दिवशीही त्याच पोलिसांना पुन्हा ती व्यक्ती सापडली. पुन्हा ५०० रुपयांची पावती फाडली. तिसऱ्या दिवशीही पुन्हा तोच प्रकार घडला. शेवटी त्या व्यक्तीने पुढील १० दिवसांचे ५ हजार आत्तात घ्या, अशा शब्दात पोलिसांनाच सुनावले. त्या व्यक्तींची फिरण्याची हौस पाहून त्याला पोलीस ठाण्यात नेऊन काही तास थांबवून ठेवले. पण त्या व्यक्तीचे एकच म्हणणे होते... दंड भरू, पण बाहेर फिरू. आता बोला!

-दुसऱ्या लाटेत रिकामटेकड्यांची कोरोना चाचणी-

दुसरी लाट सुरू झाल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने १७ एप्रिलपासून अशा रिकामटेकड्यांचा बंदोबस्त करण्याकरिता ॲंटिजन चाचणी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून रविवारपर्यंत शहरात विविध ठिकाणी ४,४२७ व्यक्तींच्या कोरोना चाचणी करण्यात आल्या, त्यापैकी तब्बल २३१ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. त्यांना कोरोना झाल्याचे माहीतही नव्हते. अशा कारवाईतून एक चांगले झाले की, त्यांच्यापासून इतरांना होणारा संसर्ग टाळता आला.

-कोणाचा दवाखाना तर कोणाचा भाजीपाला-

अत्यावश्यक कारणासाठी काहीशी सवलत देण्यात आल्यामुळे कोणी भाजी आणायला निघालोय, कोणी दवाखान्यात निघालोय तर कोणी नातेवाईक मयत झाल्याने तिकडे निघालोय असे सांगून महापालिका पथकांची तसेच पोलिसांची दिशाभूल करत आहेत. शहरातील काही रुग्णालयांनी रुग्णांच्या नातेवाइकांना पास दिले आहेत. पण पथकातील अधिकारी, कर्मचारी ‘कुठे जायचे तिकडे जा पण आधी ॲंटिजन करून घ्या’ अशा शब्दात संबंधित व्यक्तीला झापत आहेत.