शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

जिल्ह्यातील २३ गावे नव्याने टंचाईच्या खाईत

By admin | Updated: May 25, 2016 00:18 IST

दुष्काळ दाहकतेत वाढ : एकूण १६३ गावे टंचाईग्रस्त

भीमगोंडा देसाई-- कोल्हापूर -जिल्ह्यातील २३ गावे नव्याने टंचाईच्या खाईत लोटली आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने घोषित केलेल्या टंचाईग्रस्त गावांची संख्या १६२ वर पोहोचली आहे. सर्वाधिक दुष्काळाची झळ भुदरगड, राधानगरी तालुक्यास बसत आहे. टंचाईग्रस्त गावात पिण्याचे पाणी देण्यासाठी जिल्हा प्रशासन विंधन विहिरींची खुदाई करणे, खासगी विहिर अधिग्रहन करणे, अशी कामे करीत आहे.गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने दोन महिन्यांपासून जिल्ह्यात पाणीटंचाईची झळ तीव्र होत आहे. पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटत आहेत. त्यामुळे त्या गावातील लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणासाठी ३० जूनअखेर टंचाई निवारण कृती आराखडा तयार केला आहे.पहिल्या टप्यात प्रशासनाने ११३ गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित केले. घोषित गावात तातडीने उपाययोजना केल्या. त्यानंतर टंचाईग्रस्त गावांची यादी वाढत राहिली. नुकतेच पुन्हा २३ गावे टंचाईग्रस्त म्हणून जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी जाहीर करून प्रत्यक्ष उपाययोजना करण्याची सूचना जिल्हा परिषद प्रशासनास दिले आहेत. आतापर्यंत ७३ विंधन विहिरींची खुदाई करण्यात आली आहे. विंधन विहिरीस पाणी न लागलेल्या ठिकाणी २२ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे.