शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

जिल्ह्यात २०९ जणांचा रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:33 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात १ जानेवारी २०२१ पासून आतापर्यंत तब्बल २०९ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे. ...

कोल्हापूर : जिल्ह्यात १ जानेवारी २०२१ पासून आतापर्यंत तब्बल २०९ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यातील १०७ जण कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. रुग्णांना उशिरा दाखल करण्याचा हा तोटा असून त्यामुळे उपचार सुरू करण्याचीही संधी डॉक्टरांना मिळालेली नाही.

ज्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू येतो, अशांची नोंद ‘ब्रॉट डेथ’ या प्रकारामध्ये केली जाते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर तातडीने उपचार सुरू करूनही ज्यांचा मृत्यू होता त्यांची नोंद ‘इर्मजन्सी डेथ’ या प्रकारामध्ये करण्यात येते.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता जास्त असल्यामुळे गेल्या साडेपाच महिन्यांत २ हजार ४२३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यातील १०७ जणांचा रुग्णालयात दाखल करण्याआधीच वाटेतच मृत्यू झाला आहे तर १०२ जण कोरोना पॉझिटिव्ह नव्हते तरी त्यांना इतर आजार होते; परंतु त्यांनाही रुग्णालयात उपचार घेण्याची संधीच मिळालेली नाही.

दुसऱ्या कोरोना लाटेमध्ये अनेकांना श्वसनाचा मोठ्या प्रमाणावर त्रास सुरू झाल्याने त्यांना ऑक्सिजन बेडची गरज भासू लागली. गडहिंग्लजसारख्या वैद्यकीयदृष्ट्या पुढारलेल्या शहरातही मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज असेल तर केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या रुग्णांची सोय त्या ठिकाणी होऊ शकते. हीच परिस्थिती जिल्ह्यातील अन्य विभागांमध्येही आहे.

उपजिल्हा रुग्णालयांमध्ये किंवा ग्रामीण रुग्णालयांमध्ये जे रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत त्यांना बरे होण्यासाठी अनेक दिवस लागतात. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना थेट रुग्णवाहिकेतून मोठ्या शासकीय किंवा खासगी रुग्णालयात दाखल करणे याला पर्याय नसतो. त्याच पद्धतीने कोरोना झाला नसला तरी देखील तीव्र स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका येणे, रक्तदाब एकदम वाढणे किंवा कमी होणे यासह अनेक कारणांमुळे रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागते. अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण दाखल असल्याने सर्वसाधारण रुग्णांना बेड मिळतानाही अडचणी येतात. त्यामुळे विविध कारणांमुळे अशा जिल्ह्यांतील एकूण २०९ जणांना रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच प्राण गमवावा लागला.

चौकट

रुग्णालयात विनाविलंब दाखल करण्याची गरज

रुग्णालयात रुग्णास दाखल करण्यासाठी विलंब केल्यास काय होते याचे हे उदाहरण आहे. कारण गेल्या साडेपाच महिन्यांत रुग्णालयात दाखल होण्याआधी २०९ जणांचा मृत्यू झाल्याने ज्यांना व्याधी आहेत अशांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी ही दक्षता घेण्याची गरज आहे.