शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी २०३ कोटींचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:29 IST

कोल्हापूर : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) योजनेअंतर्गत कोल्हापूर शहरात नागरी दळणवळण साधनांचा विकास याअंतर्गत रस्ते, गटर, भुयारी ...

कोल्हापूर : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) योजनेअंतर्गत कोल्हापूर शहरात नागरी दळणवळण साधनांचा विकास याअंतर्गत रस्ते, गटर, भुयारी मार्ग व फुटपाथ करण्याच्या कामांकरिता २०३.८२ कोटींच्या निधीस मंगळवारी मुंबईत मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे होते.

बैठकीस पालकमंत्री सतेज पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत उपस्थित होते, तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दूरभाष्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभाग घेतला.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) योजनेअंतर्गत नागरी दळणवळण साधनांचा विकास याअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील रस्ते, गटर, भुयारी मार्ग व फुटपाथ करण्याच्या कामांचा १७८ कोटींचा प्रस्ताव २०१९ मध्ये नगरविकास विभागाकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावावर मंगळवारच्या बैठकीत चर्चा झाली. प्रस्तावानुसार निधी देण्यास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली. परंतु, हा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वीचा असल्याने नवीन ‘डीएसआर’प्रमाणे होणाऱ्या २०३ कोटी ८२ लाखांचे प्रस्ताव दोन टप्प्यांत तातडीने सादर करा, अशी सूचना मंत्री शिंदे यांनी यावेळी केली. प्राधान्यक्रमाने केल्या जाणाऱ्या कामांना टप्प्याटप्प्याने निधी देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

महापालिकेची निवडणूक तोंडावर असल्याने प्रस्तावास मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. या विकासकामात पंचवीस टक्के रक्कम महापालिकेला भरावी लागणार आहे, परंतु पालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे पंचवीस टक्क्यांऐवजी दहा टक्के करावी, अशी विनंती पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली.

प्राधान्यक्रमाने करायच्या कामांचे दोन स्वतंत्र प्रस्ताव नवीन दरसूचीप्रमाणे येत्या काही दिवसांत पाठवावे लागणार आहेत. तसेच महानगरपालिकेने जुन्या योजनेतील कामांचा निधी खर्च झाला किंवा नाही, कामे पूर्ण झाली किंवा नाहीत याचा अहवाल द्यावा लागणार आहे. त्यामुळे अपूर्ण कामे एक महिन्यात पूर्ण केली जातील, असे आमदार जाधव यांनी सांगितले.

- क्षीरसागर, जाधव, पाटील यांचा पाठपुरावा -

कोल्हापूर शहरातील विकासकामांच्या या प्रस्तावाचा नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांनी गेल्या दोन वर्षांपासून सतत पाठपुरावा केला. या सर्वांनी मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री यांना प्रस्ताव, निवेदने देऊन सतत निधीबाबात आठवण करून दिली. तिघांच्या प्रयत्नांना मंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांचे पाठबळ मिळाले.

(फोटो देत आहे.)