शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
3
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
4
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
5
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
6
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
7
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
8
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
9
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
10
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
11
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
12
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
13
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
14
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
15
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
16
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
17
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
18
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
19
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
20
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  

रंकाळा केंद्रातील १९ लाख मत्स्यबीज गेले वाहून; महापुराचा तडाखा : मत्स्य व्यावसायिक शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:28 IST

कोल्हापूर : शहरात पडलेल्या प्रचंड पावसाने रंकाळा ओव्हरफ्लो झाला, पण त्याचा परिणाम तलावाशेजारी असणाऱ्या मत्स्यबीज केंद्राला बसला आहे. त्यात ...

कोल्हापूर : शहरात पडलेल्या प्रचंड पावसाने रंकाळा ओव्हरफ्लो झाला, पण त्याचा परिणाम तलावाशेजारी असणाऱ्या मत्स्यबीज केंद्राला बसला आहे. त्यात सोडण्यात आलेल्या १९ लाख मत्स्य जिरे (बीज) रंकाळा तलावात वाहून गेले, परिणामी जिल्ह्यातील मत्स्यशेती करणारे शेतकरी, लहान-मोठे तलाव यांना मत्स्यबीजाचा तुटवडा जाणवणार आहे.

जिल्ह्यातील लहान-मोठे तलावांना प्रतिवर्षी रंकाळा मत्स्यबीज केंद्रातून बीज पुरवठा केला जातो. तसेच जवळपास १२५ शेततळ्यांच्या माध्यमातून मत्स्य व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनाही इथूनच बीजपुरवठा केला जात होता. यंदा बीजच वाहून गेल्याने शेतकऱ्यांसह लहान-मोठ्या तलावांना मत्स्यबीज तुटवडा भासणार आहे. याचा परिणाम शेतकरी, कोळी, मत्स्य व्यावसायिक यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. मत्स्य व्यवसाय विभागाकडून गेल्या ६ वर्षांपासून रंकाळा मत्स्यबीज केंद्रातून बीज निर्मिती प्रक्रिया बंद होती. खासगी मत्स्यबीज विक्रेत्यांकडून जिल्ह्यातील तलाव व शेतकऱ्यांना बीज पुरवठ्यासाठी मदत केली जात होती. यंदा नव्याने रंकाळा मत्स्यबीज केंद्रात बीज निर्मितीचा प्रयत्न केला होता; पण पडलेल्या प्रचंड पावसाने रंकाळा ओव्हरफ्लो झाला, परिणामी ६ बीज प्रक्रिया तळी (लगून) मध्ये पाणी साम डोम भरल्याने जवळपास सर्वच बीज रंकाळा तलावामध्ये वाहून गेले.

मत्स्य व्यवसाय विभागाची अनास्था

विभागीय मत्स्य व्यवसाय विभागामध्ये विभागीय आयुक्त हे पद २००८ पासून प्रभारी आहे. तसेच या विभागातील प्रत्यक्ष रंकाळा मत्स्य केंद्रामध्ये काम करणारे क्षेत्रीकची ३ पदे रिक्त आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मत्स्य व्यवसायाकडे कल वाढत चाललेला असतानासुद्धा येथे कायमस्वरूपी विभागीय आयुक्त व इतर रिक्त पदे भरण्याची गरज होती; पण शासनाच्या अनास्थेमुळे या विभागाकडे दुर्लक्ष केले जात आहे.

प्रतिक्रिया.....

प्रत्येकवर्षी ऑगस्ट महिन्यात खासगी किंवा सरकारी बीज उपलब्ध होत होते. यावर्षी पुराने बीज वाहून गेल्याने खासगी विक्रेत्यांकडून चढ्या दराने बीज विकत घ्यावे लागणार आहे. महापुराने इतर पिके वाया गेली आहेतच शिवाय मत्स्य शेती तोट्यात येणार आहे.

आनंदा पाटील,

कोथळी (ता. करवीर) मत्स्य शेतकरी

यावर्षी रंकाळा तलाव पूर्ण भरल्याने शेजारील मत्स्य तळ्यातील बीज तलावात वाहून गेले आहे. जिल्ह्यातील तलाव व शेतकऱ्यांना इतर शासकीय किंवा खासगी बीज उपलब्धतेसाठी मार्गदर्शन केले जाईल.

सतीश खाडे,

प्रभारी सहायक आयुक्त, मत्स्य व्यवसाय