शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

‘मानवाधिकार’कडे १७ हजार तक्रारी प्रलंबित

By admin | Updated: May 21, 2015 00:45 IST

एस. आर. बन्नूरमठ यांची माहिती : सर्वाधिक पोलीस खात्याकडून हक्कांची पायमल्ली

कोल्हापूर : राज्य मानवी हक्क आयोगाकडे आतापर्यंत ६८ हजार ४२६ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यांपैकी १७ हजार तक्रारी प्रलंबित आहेत. १५ हजार ४९६ तक्रारी निकालात काढल्या आहेत. दोन हजारांपेक्षा अधिक तक्रारींमध्ये शासनास २१ लाख ४८ हजार नुकसान भरपाई संबंधितास देण्याचा आदेश दिला आहे, अशी माहिती राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष व सेवानिवृत्त न्यायमूर्ती एस. आर. बन्नूरमठ यांनी बुधवारी शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. दिवसभर सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील तक्रारींवर सुनावणी झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी ते बोलत होते. बन्नूरमठ म्हणाले, राज्यात २००१ साली मानवी हक्क आयोगाची स्थापना झाली. दोन वर्षांपासून आयोगाला अध्यक्ष आणि सदस्य नव्हते. त्यामुळे कामकाज ठप्प होते. सप्टेंबर २०१३ मध्ये मी आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. आयोगाकडे सरासरी रोज ५० ते ६० तक्रारी येत आहेत. शासकीय यंत्रणेकडून मानवी हक्कांची पायमल्ली झाल्याचीच तक्रार सुनावणीस पात्र ठरते. आमच्या कार्यकक्षे बाहेरील तक्रारीही येत आहेत. त्यांची सुनावणी घेतली जात नाही. आलेल्या तक्रारींपैकी निम्म्या तक्रारी कार्यकक्षेत येत नाहीत. आयोगाकडे आलेल्या अधिकाधिक तक्रारी गतीने निर्गत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.आयोगाकडून विनामूल्य सेवा दिली जाते. वकील फी किंवा वकील देण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे कोणाकोणाला मानवी हक्काची पायमल्ली झाली, असे वाटते त्या सर्वांनी आयोगाकडे तक्रार करावी. याशिवाय आयोगाने ३० तक्रारी स्वत:हून दाखल करून घेतल्या आहेत. लोकांच्या घरापर्यंत आयोग नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. विभागीय स्तरावर सुनावणी घेतली जात आहे. व्यापक जनजागृती केली जात आहे. वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांतून आलेल्या बातम्यांची दखल घेऊनही तक्रारी नोंदवून घेतल्या जात आहे. सर्वच विभागांकडून हक्काची पायमल्ली होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. परंतु, सर्वाधिक तक्रारी पोलीस विभागाविरोधात येत आहेत. आलेल्या तक्रारींची छाननी करण्यासाठी न्यायाधीश, सेवानिवृत्त सनदी अधिकारी दर्जाचे अधिकारी आहेत. त्यामुळे विविध पातळ्यांवर प्रत्येक तक्रारीची छाननी होते. आयोगाचे सदस्य भगवंतराव मोरे म्हणाले, न्याय्य पद्धतीने काम करणाऱ्या पोलीस व अधिकाऱ्यांना मानवी हक्क आयोगाची भीती बाळगण्याची गरज नाही. मानवी हक्कांची पायमल्ली न करताही गुन्हेगारांकडून माहिती काढण्याचे कौशल्य अनेक पोलीस अधिकाऱ्यांकडे आहे. (प्रतिनिधी)पहिल्यांदा नोंदणीची माहितीमानवी हक्क आयोगाचे फलक लावून अनेक स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत. आयोगाचे सदस्य, अध्यक्ष असल्याचे स्वयंघोषितपणे जाहीर करून व्हिजिटिंग कार्डे छापली आहेत, याकडे लक्ष वेधले असता बन्नूरमठ म्हणाले, अशा स्वयंसेवी संस्था नोंदणीकृत आहेत का, याची माहिती घेतली जात आहे. मानवी हक्क आयोगाच्या कोणत्याही शाखा नाहीत. त्यात कोणालाही सहभागी करून घेतले जात नाही. आयोगाला नुकसान भरपाईचा आदेश करण्याचा अधिकार आहे. थेट कारवाई करता येत नाही. कारवाईची शिफारस शासनाकडे केली जाते. गंभीर घटनेत स्वत: आयोग उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल करते. आज जागृती कार्यक्रमविश्रामगृहात आज, गुरुवारी सकाळी ११ ते १ या वेळेत राज्य मानवी हक्क आयोगाचा जागृती कार्यक्रम होईल. दुपारी तीन ते पाच या वेळेत पोलीस अधिकारी यांच्यासाठी ‘संवेदना’ कार्यक्रम होणार आहे.