शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
4
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
5
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
6
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
7
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
8
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
9
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
10
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
11
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
12
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
14
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
16
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
17
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
19
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
20
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार

पुरात अडकलेल्या १७ जणांची सुटका; एक मुलगा बेपत्ता

By admin | Updated: July 14, 2016 01:05 IST

‘एनडीआरएफ’ची कामगिरी : पूरग्रस्त १४०० जणांचे स्थलांतर

कोल्हापूर : पुराच्या पाण्यात अडकलेल्या जिल्ह्यातील जवळपास २८० हून अधिक कुटुंबांतील सुमारे १४०० लोकांना जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथका (एनडीआरएफ)च्या जवानांच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले; तर आंबेवाडी, वडणगे, शिरोली, केर्ली येथे ‘एनडीआरएफ,’ अग्निशमन दल व जीवनज्योतीच्या जवानांनी बचावकार्य करून पुरात अडकलेल्या १७ जणांना बाहेर काढले. रेडेडोह येथे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तीन मुलांमधील एक मुलगा बेपत्ता आहे. अभिजित ऊर्फ सचिन बळिराम आगरकर (वय १८, रा. वडणगे, ता. करवीर; मूळ गाव केज, जि. बीड) असे त्याचे नाव आहे. वडणगे (ता. करवीर) येथील शिवपार्वती यात्री निवास येथे अडकलेल्या आठजणांना सकाळी सहा वाजल्यापासून तब्बल चार तास बचाव मोहीम राबवून बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. ‘एनडीआरएफ’ने पाण्यात बोट टाकून यात्री निवास येथे प्रयाण केले. या ठिकाणी बचावकार्य करीत प्रदीप गोपाळ शिंदे (वय ४९), शीला गोपाळ शिंदे (७०), पौर्णिमा प्रदीप शिंदे (१८), प्रियांका प्रदीप शिंदे (२३), पुष्पा गोपाळ शिंदे (४४), राजेश शिंदे (१५), प्रतीक्षा प्रदीप शिंदे (१५) व लक्ष्मण आप्पाजी खवाडे (१७) यांना बाहेर काढले. यामध्ये ‘एनडीआरएफ’चे डेप्युटी कमांडिंग आॅफिसर आलोककुमार यांच्या नेतृत्वाखाली ४० जणांचे पथक, जीवन ज्योती संस्थेचे १० जणांचे पथक सहभागी झाले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे, तहसीलदार डॉ. योगेश खरमाटे उपस्थित होते. यानंतर सकाळी अकराच्या सुमारास कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावरील बालिंगा ते साबळेवाडी रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याचे समजताच ‘एनडीआरएफ’चे पथक या ठिकाणी गेले. साबळेवाडी येथील मंगल कार्यालयात लग्नसमारंभ असल्याने वऱ्हाडी मंडळी अलीकडच्या बाजूला अडकली होती. रस्त्यावर पाणी आल्याने त्यांना पुढे जाता येत नव्हते. त्यामुळे ‘एनडीआरएफ’ व ‘जीवनज्योती’च्या जवानांच्या मदतीने त्यांना व महिलांना बोटीतून सुरक्षितपणे पलीकडे सोडले जात होते. हे मदतकार्य दिवसभर सुरू राहिले. तहसीलदार डॉ. योगेश खरमाटे यांनी येथे भेट देऊन पाहणी करून यंत्रणेला योग्य त्या सूचना केल्या. तसेच आमदार चंद्रदीप नरके व सामाजिक कार्यकर्ते राजू सूर्यवंशी यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसमवेत स्वत: पाण्यात उतरून मदतकार्य केले. त्याचबरोबर जिल्ह्यातही ठिकठिकाणी बचाव आणि मदतकार्य राबविण्यात आले. प्रयाग चिखली येथील १५ कुटुंबांतील ४८ व वळिवडे येथील २५ व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी आणि कवठेसार येथील ६५ कुटुंबांतील सुमारे २११ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी आणि घुणकी येथील १२६ कुटुंबांतील ६५० व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. भुदरगड तालुक्यातील शेणगाव येथील सहा कुटुंबांतील २४ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. पन्हाळा तालुक्यातील मराठवाडी येथे दरड कोसळण्याची शक्यता असल्याने १५ लोकांना केकतवाडी येथे स्थलांतरित करण्यात आले. पंचगंगा नदीची पाणीपातळी ४५ फूट ६ इंच गेली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरातील काही सखल भागांमध्ये पुराचे पाणी गेल्याने तेथील १०७ कुटुंबांतील ४६३ लोकांना महापालिका प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. यापुढेही पुराचा धोका असणाऱ्या भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे काम प्रशासनाने गतिमान केले आहे.