शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर शहरात १५ दिवसांत १५८४ रुग्ण, २५ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:22 IST

कोल्हापूर : कोल्हापूर शहर कोरोना संसर्गाच्या बाबतीत हॉटस्पॉट ठरले आहे. गेल्या पंधरा दिवसांत १५८४ व्यक्ती कोरोनाबाधित झाल्या असून २५ ...

कोल्हापूर : कोल्हापूर शहर कोरोना संसर्गाच्या बाबतीत हॉटस्पॉट ठरले आहे. गेल्या पंधरा दिवसांत १५८४ व्यक्ती कोरोनाबाधित झाल्या असून २५ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. शहरात राेज दीडशेच्या आसपास नवीन रुग्ण सापडत आहेत. गेला..गेला म्हणत कोरोना विषाणूने आपले रौद्ररूप कसे धारण केले याचे उदाहरण म्हणजे ही आकडेवारी आहे.

कोल्हापूर शहर कोरोनाच्या पहिल्या लाटेतसुद्धा हॉटस्पॉट ठरले होते. अतिशय प्रयत्नपूर्वक कोरोनाची ही लाट थोपविण्यात महापालिका प्रशासनास यश मिळाले. डिसेंबर व जानेवारी महिन्यात तर कोरोना विषाणू आता गेला अशीच शहरवासीयांची भावना झाली होती. याच दरम्यान दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.

दि. १६ जानेवारीपासून शहरात लसीकरण सुरू झाल्यानंतर तर कोरोना गेला, आपण सुटलो. आता लस आली असल्याने आपणाला काही होणार नाही अशा आविर्भावात शहरवासीय राहिले. लसीकरणाकडे दुर्लक्ष केले. मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर या सगळ्या गोष्टी विसरून गेले, पण फेब्रुवारीपासून कोरोनाने आपले हात-पाय पुन्हा पसरण्यास सुरुवात केली. एप्रिल महिना तर कोरोना विस्फोटाचा काळ ठरला आहे.

-शंभर दिवसांत २९६५ रुग्ण, ५१ मृत-

जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्याचे पंधरा दिवस धरून साडेतीन महिन्यांत २९६५ नवीन रुग्ण आढळले, तर ५१ व्यक्ती मृत झाल्या. कोरोनाचा विस्फोट किती मोठा आहे हेच या आकडेवारीतून पहायला मिळते. खबरदारी घेतली नाही आणि पुढची पंधरा दिवस अशीच परिस्थिती राहिली तर काळ कठीण असेल.

महिना कोरोनाबाधित रुग्ण मृतांची संख्या

- जानेवारी २२५ ०४

- फेब्रुवारी ३४३ १५

- मार्च ८१६ ०७

- एप्रिल (१५दिवस) १५८४ २५

-ना प्रशासन दक्ष, ना नागरिक -

कोरोनाला रोखण्याच्या लढाईत पहिल्या लाटेत जसे महापालिका प्रशासनाने झोकून देऊन काम केले तसे दुसऱ्या लाटेत पहायला मिळत नाही. बैठका, कागदावरील नियोजन, नियुक्ती आदेश, जबाबदाऱ्या वाटणे अशी कामे होत आहेत; परंतु प्रत्यक्ष ग्राऊंडलेव्हलला काहीच होताना दिसत नाही. प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करून बॅरिकेड्‌स लावणे, बाधित रुग्णाच्या घरावर स्टीकर चिकटविणे, त्याच्या जवळच्या संपर्कात आलेल्यांची चाचणी करून घेणे, प्रभाग सचिव पातळीवरील काम या गोष्टी शहरात पहायला मिळत नाहीत. आधी रुग्ण आढळला की, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सक्तीने होत होते, रुग्णाला ॲडमिट केले जात होते. आता कोणीही आरोग्य कर्मचारी येत नाही.