शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

कोल्हापूर शहरात १५ दिवसांत १५८४ रुग्ण, २५ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:22 IST

कोल्हापूर : कोल्हापूर शहर कोरोना संसर्गाच्या बाबतीत हॉटस्पॉट ठरले आहे. गेल्या पंधरा दिवसांत १५८४ व्यक्ती कोरोनाबाधित झाल्या असून २५ ...

कोल्हापूर : कोल्हापूर शहर कोरोना संसर्गाच्या बाबतीत हॉटस्पॉट ठरले आहे. गेल्या पंधरा दिवसांत १५८४ व्यक्ती कोरोनाबाधित झाल्या असून २५ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. शहरात राेज दीडशेच्या आसपास नवीन रुग्ण सापडत आहेत. गेला..गेला म्हणत कोरोना विषाणूने आपले रौद्ररूप कसे धारण केले याचे उदाहरण म्हणजे ही आकडेवारी आहे.

कोल्हापूर शहर कोरोनाच्या पहिल्या लाटेतसुद्धा हॉटस्पॉट ठरले होते. अतिशय प्रयत्नपूर्वक कोरोनाची ही लाट थोपविण्यात महापालिका प्रशासनास यश मिळाले. डिसेंबर व जानेवारी महिन्यात तर कोरोना विषाणू आता गेला अशीच शहरवासीयांची भावना झाली होती. याच दरम्यान दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.

दि. १६ जानेवारीपासून शहरात लसीकरण सुरू झाल्यानंतर तर कोरोना गेला, आपण सुटलो. आता लस आली असल्याने आपणाला काही होणार नाही अशा आविर्भावात शहरवासीय राहिले. लसीकरणाकडे दुर्लक्ष केले. मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर या सगळ्या गोष्टी विसरून गेले, पण फेब्रुवारीपासून कोरोनाने आपले हात-पाय पुन्हा पसरण्यास सुरुवात केली. एप्रिल महिना तर कोरोना विस्फोटाचा काळ ठरला आहे.

-शंभर दिवसांत २९६५ रुग्ण, ५१ मृत-

जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्याचे पंधरा दिवस धरून साडेतीन महिन्यांत २९६५ नवीन रुग्ण आढळले, तर ५१ व्यक्ती मृत झाल्या. कोरोनाचा विस्फोट किती मोठा आहे हेच या आकडेवारीतून पहायला मिळते. खबरदारी घेतली नाही आणि पुढची पंधरा दिवस अशीच परिस्थिती राहिली तर काळ कठीण असेल.

महिना कोरोनाबाधित रुग्ण मृतांची संख्या

- जानेवारी २२५ ०४

- फेब्रुवारी ३४३ १५

- मार्च ८१६ ०७

- एप्रिल (१५दिवस) १५८४ २५

-ना प्रशासन दक्ष, ना नागरिक -

कोरोनाला रोखण्याच्या लढाईत पहिल्या लाटेत जसे महापालिका प्रशासनाने झोकून देऊन काम केले तसे दुसऱ्या लाटेत पहायला मिळत नाही. बैठका, कागदावरील नियोजन, नियुक्ती आदेश, जबाबदाऱ्या वाटणे अशी कामे होत आहेत; परंतु प्रत्यक्ष ग्राऊंडलेव्हलला काहीच होताना दिसत नाही. प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करून बॅरिकेड्‌स लावणे, बाधित रुग्णाच्या घरावर स्टीकर चिकटविणे, त्याच्या जवळच्या संपर्कात आलेल्यांची चाचणी करून घेणे, प्रभाग सचिव पातळीवरील काम या गोष्टी शहरात पहायला मिळत नाहीत. आधी रुग्ण आढळला की, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सक्तीने होत होते, रुग्णाला ॲडमिट केले जात होते. आता कोणीही आरोग्य कर्मचारी येत नाही.