शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

१४० कोरोना रूग्ण, १८ हजार जनावरे हलवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:21 IST

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या यंत्रणेच्या माध्यमातून आतापर्यंत १४० कोरोना रूग्णांची आणि १८ ...

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या यंत्रणेच्या माध्यमातून आतापर्यंत १४० कोरोना रूग्णांची आणि १८ हजार जनावरे स्थलांतरित करण्यात आली आहेत अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली.

जिल्हा परिषदेतून सध्या पूर काळाचे व्यवस्थापन सुरू असून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखाराव यांच्या उपस्थितीमध्ये चव्हाण हे देखील या नियोजनामध्ये पूर्ण वेळ सहभागी आहेत. चव्हाण म्हणाले, पुरामुळे जिल्ह्यातील २९३ गावे बाधित झाली असून १ लाख नागरिक यामुळे बाधित झाले आहेत. यातील ४५ हजार नागरिकांची नातेवाईकांकडे सोय झाली असून उर्वरित सर्वांची २०० शासकीय निवारा गृहांमध्ये सोय करण्यात आली आहे.

दोन वर्षांपूर्वीच्या महापुराची तुलना करताना चव्हाण म्हणाले, २०१९ साली जेव्हा महापूर आला तेव्हा कोरोना नव्हता. मात्र यावेळी सर्व काही करताना कोरोना प्रतिबंधक काळजी घेऊनच सर्व काही करावे लागते. हे करूनच १४० कोरोना रूग्णांना स्थलांतर करून योग्य ठिकाणी दाखल करण्यात आले आहे. तसेच हायरिस्क नागरिकांची ॲंटिजन चाचणीही करण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या विभागांनी गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर काय जबाबदारी पार पाडायचे आहे याबाबतही सूचना करण्यात आल्या असून प्रत्येक तालुक्याला संपर्क अधिकारी नेमण्यात आले असून त्यांच्याकडून तेथील दैनंदिन परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.