शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

१४० कोरोना रूग्ण, १८ हजार जनावरे हलवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:21 IST

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या यंत्रणेच्या माध्यमातून आतापर्यंत १४० कोरोना रूग्णांची आणि १८ ...

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या यंत्रणेच्या माध्यमातून आतापर्यंत १४० कोरोना रूग्णांची आणि १८ हजार जनावरे स्थलांतरित करण्यात आली आहेत अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली.

जिल्हा परिषदेतून सध्या पूर काळाचे व्यवस्थापन सुरू असून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखाराव यांच्या उपस्थितीमध्ये चव्हाण हे देखील या नियोजनामध्ये पूर्ण वेळ सहभागी आहेत. चव्हाण म्हणाले, पुरामुळे जिल्ह्यातील २९३ गावे बाधित झाली असून १ लाख नागरिक यामुळे बाधित झाले आहेत. यातील ४५ हजार नागरिकांची नातेवाईकांकडे सोय झाली असून उर्वरित सर्वांची २०० शासकीय निवारा गृहांमध्ये सोय करण्यात आली आहे.

दोन वर्षांपूर्वीच्या महापुराची तुलना करताना चव्हाण म्हणाले, २०१९ साली जेव्हा महापूर आला तेव्हा कोरोना नव्हता. मात्र यावेळी सर्व काही करताना कोरोना प्रतिबंधक काळजी घेऊनच सर्व काही करावे लागते. हे करूनच १४० कोरोना रूग्णांना स्थलांतर करून योग्य ठिकाणी दाखल करण्यात आले आहे. तसेच हायरिस्क नागरिकांची ॲंटिजन चाचणीही करण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या विभागांनी गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर काय जबाबदारी पार पाडायचे आहे याबाबतही सूचना करण्यात आल्या असून प्रत्येक तालुक्याला संपर्क अधिकारी नेमण्यात आले असून त्यांच्याकडून तेथील दैनंदिन परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.