शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

१४० कोरोना रूग्ण, १८ हजार जनावरे हलवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:21 IST

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या यंत्रणेच्या माध्यमातून आतापर्यंत १४० कोरोना रूग्णांची आणि १८ ...

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या यंत्रणेच्या माध्यमातून आतापर्यंत १४० कोरोना रूग्णांची आणि १८ हजार जनावरे स्थलांतरित करण्यात आली आहेत अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली.

जिल्हा परिषदेतून सध्या पूर काळाचे व्यवस्थापन सुरू असून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखाराव यांच्या उपस्थितीमध्ये चव्हाण हे देखील या नियोजनामध्ये पूर्ण वेळ सहभागी आहेत. चव्हाण म्हणाले, पुरामुळे जिल्ह्यातील २९३ गावे बाधित झाली असून १ लाख नागरिक यामुळे बाधित झाले आहेत. यातील ४५ हजार नागरिकांची नातेवाईकांकडे सोय झाली असून उर्वरित सर्वांची २०० शासकीय निवारा गृहांमध्ये सोय करण्यात आली आहे.

दोन वर्षांपूर्वीच्या महापुराची तुलना करताना चव्हाण म्हणाले, २०१९ साली जेव्हा महापूर आला तेव्हा कोरोना नव्हता. मात्र यावेळी सर्व काही करताना कोरोना प्रतिबंधक काळजी घेऊनच सर्व काही करावे लागते. हे करूनच १४० कोरोना रूग्णांना स्थलांतर करून योग्य ठिकाणी दाखल करण्यात आले आहे. तसेच हायरिस्क नागरिकांची ॲंटिजन चाचणीही करण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या विभागांनी गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर काय जबाबदारी पार पाडायचे आहे याबाबतही सूचना करण्यात आल्या असून प्रत्येक तालुक्याला संपर्क अधिकारी नेमण्यात आले असून त्यांच्याकडून तेथील दैनंदिन परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.