शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

१४ मृतदेह सापडले कित्येक मैलांवर

By admin | Updated: August 5, 2016 01:59 IST

सावित्री पूल दुर्घटना : दुसऱ्या दिवशीही शोधकार्य सुरूच

जयंत धुळप/संदीप जाधव -- महाड मुंबई-गोवा महामार्गावर महाडनजीक मंगळवारी रात्री सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेतील १४ मृतदेह गुरुवारी घटनास्थळापासून कित्येक मैल दूरवर सापडले. यावरून नदीच्या जोरदार प्रवाहामुळे इतर बेपत्ता व्यक्तीही कदाचित समुद्रापर्यंत वाहत गेल्या असाव्यात, अशी शक्यता वर्तविली जात आहे.पुलासह नदीपात्रात पडलेल्या तवेरा जीपमधील रंजना वझे यांचा मृतदेह घटनास्थळापासून एक कि.मी. अंतरावर महाड शहराजवळ केंबुर्ली नदी किनाऱ्यावर एका शेतात आढळला, तर याच गाडीतील शेवंती मिरगल यांचा मृतदेह त्याहून खूप पुढे ८० कि. मी. अंतरावर हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर सापडला. जयगड-मुंबई एसटी बसचे चालक श्रीकांत कांबळे यांचा मृतदेह ९० कि.मी. अंतरावर दापोली तालुक्यातील आंजर्ले किनारी, तर आवेद अल्ताफ चौगुले या राजापूर-मुंबई एसटी बसमधील प्रवाशांचा मृतदेह दादली पुलाजवळ, पांडुरंग घाग राजापूर यांचा केंबुर्लीजवळ, प्रशांत माने यांचा मृतदेह ३५ कि.मी अंतरावर म्हसळा तालुक्यातील तोराडी बंडवाडी खाडी किनारी सापडला. स्नेहा बैकर यांचा मृतदेहदेखील दोन कि.मी.वरील राजेवाडी नदी किनारी आढळून आला. याशिवाय सुनील बैकर, नेहा सुनील बैकर, रमेश कदम, प्रभाकर शिर्के, मंगेश कातर, संतोष बलेकर यांच्या मृतदेहाची ओळख पटली आहे.सर्व मृतदेह विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात सायंकाळी आणण्यात आले असून, त्यानंतर त्यांच्या नातेवाइकांकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. इतर बेपत्ता वाहनांचा तसेच प्रवाशांचा तपास लागत नसल्याने प्रशासन हतबल झाल्याचे दिसून आले. एखादा मृतदेह सापडल्याचे वृत्त मदत केंद्रात समजताच उपस्थित असलेल्या नातेवाइकांमध्ये घबराट निर्माण होत होती. आपल्याच नातेवाइकांचा हा मृतदेह असावा या आशेने दोन दिवस तळ ठोकून बसलेले हे सर्व नातेवाईक ग्रामीण रुग्णालयात धाव घेत होते. मृताची ओळख पटल्यानंतर मात्र त्या ठिकाणी त्यांना अश्रू अनावर होताना दिसून येत होते.इतरांचा शोध सुरूचसागरी तटरक्षक दल, एनडीआरएफ, नौदल, आदी यंत्रणांनी बुधवारी पहाटेपासून सुरू केलेले शोधकार्य गुरुवारी दुसऱ्या दिवशीदेखील युद्धपातळीवर सुरू असल्याचे दिसून आले. तीनशे किलो वजनाचे लोहचुंबक पाण्यात सोडून क्रेनच्या सहाय्याने वाहनांचा नदीत शोध घेण्याचे एनडीआरएफकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र सायं. पाच वाजेपर्यंत तरी या बेपत्ता वाहनांचा शोध घेण्यात अपयश आले. नौदलाच्या हेलिकॉप्टरद्वारे देखील शोधमोहीम सुरूच होती.ज्या ठिकाणी दुर्घटना घडली त्या ठिकाणी संपूर्ण दगडी कातळ असल्याने दुर्घटनेच्या ठिकाणी वाहने न सापडता ती पुढे वाहून गेली असावी, अशी शक्यता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.जोरदार प्रवाहामुळे अडचणीसुसज्ज यंत्रणा असूनही पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे तसेच जोरदार प्रवाहामुळे नदीत बेपत्ता वाहनांचा तसेच प्रवाशांचा शोध घेण्यात अडचणी येत असल्याचे एनडीआरएफचे निरीक्षक महमद शफिक यांनी ‘लोकमत’ला सांगितले. डेप्युटी कमांडर पंडित इथापे यांच्या नेतृत्वाखाली १०३ जवान मदतकार्य करीत असल्याचे शफिक यांनी सांगितले. घटनास्थळापासून सुमारे १० कि.मी. अंतरावरील पादली पुलापर्यंतच्या प्रवाहात बोटिंग डिप डायव्हर्स आॅक्सिजनयुक्त यंत्रणेद्वारे शोधकार्य सुरूच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोकण रेल्वेची पाण्याखाली शोध घेऊ शकणारी यंत्रेही शोधमोहिमेत वापरण्यात येत आहेत.