शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

शहरातील १३९ सीसीटीव्ही कॅमेरे पडले बंद; वादळी वाऱ्याचा परिणाम : देखभाल दुरुस्तीचे बिल दोन वर्षे थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:22 IST

कोल्हापूर : शहरातील वाहतूक व्यवस्थेबरोबर कायदा व सुव्यवस्थेमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरांवर सरकारी अनास्थेची झापड आली आहे. त्याच्या ...

कोल्हापूर : शहरातील वाहतूक व्यवस्थेबरोबर कायदा व सुव्यवस्थेमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरांवर सरकारी अनास्थेची झापड आली आहे. त्याच्या देखभाल दुरुस्तीचे बिल संबंधित कंपनीला दिले नसल्याने दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसात १३९ कॅमेरे बंद पडले असून अद्याप ते दुरुस्त करण्यात आलेले नाहीत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पोलीस दंडाच्या माध्यमातून पैसे वसूल करतात तर त्यांनी त्याची देखभाल दुरुस्ती करावी, असे महापालिकेचे म्हणणे आहे.

कॅमेरे दुरुस्तीबाबत पोलीस प्रशासनाकडून गुरुवारी महापालिका आयुक्तांना पत्र देण्यात आले. महापालिकेच्या म्हणण्यानुसार ३१ मार्च २०२१ ला देखभाल, दुरुस्तीचा करार संपुष्टात आला आहे. पोलीस प्रशासन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहनचालकांविरुद्ध कारवाई करून दंडाच्या माध्यमातून वर्षाकाठी ५६ लाख मिळवते तर त्याची देखभाल, दुरुस्ती पोलीस प्रशासनाकडूनच केली जावी. त्यावर महापालिकेने तसे लेखी कळवावे, असे पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे.

शहराची सुरक्षितता, वाहतुकीची कोंडी व कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तत्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी शहरात सेफ सिटीअंतर्गत ६५ ठिकाणी १६५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. ह्याची देखभाल दुरुस्ती महापालिका तर नियंत्रण पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत होते. शहरातील प्रमुख बाजारपेठांत, ऐतिहासिक वास्तू, चौक, धार्मिक स्थळावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे ब​सविण्यात आले आहेत. शहरातील गुंडगिरी, मारामारी, चेन स्नॅचिंग, शाळा आणि कॉलेज परिसरातील घटनांवर त्यातून वॉच राहतो. यासाठी सुमारे ७ कोटींहून अधिक खर्च केला आहे.

गेल्या आठवड्यात वादळी पावसामुळे या कॅमेऱ्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. १६५ पैकी १३९ कॅमेरे बंद असून त्याच्या देखभाल, दुरुस्तीचे बिल दोन वर्ष थकीत आहे. बिल मिळाले नसल्याने संबंधित कंपनीने देखभाल दुरुस्ती केलेली नाही.

दृष्टीक्षेपात सेफ सिटी प्रकल्प

एकूण ठिकाणे : ६५

एकूण कॅमेरे : १६५

बंद पडलेले कॅमेरे : १३९

एकूण झालेला खर्च : ७ कोटींहून अधिक

देखभाल दुरुस्ती : कुणी करायची यावरून महापालिका व पोलीस प्रशासनाचे एकमेकांकडे बोट

फोटो : २१०५२०२१-कोल-सीसीटीव्ही

कोल्हापूर शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे वादळी वाऱ्याने बंद पडले असून त्याची दुरुस्ती कुणी करायची असा नवा वाद आता महापालिका व पोलीस प्रशासनामध्ये सुरू झाला आहे.