शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

अकरावीत १३७९ जणांची प्रवेश निश्चिती

By admin | Updated: July 6, 2016 00:14 IST

तिसरा दिवस : आज प्रक्रियेला सुटी; उद्या अखेरचा दिवस; पावसाने उघडीप दिल्याने गर्दी

कोल्हापूर : अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील प्रत्यक्ष प्रवेश घेण्याच्या तिसऱ्या दिवशी मंगळवारी १३७९ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी प्रवेश निश्चिती केली. दिवसभरात पावसाने अधिकतर वेळ उघडीप दिल्याने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दरम्यान, रमजान ईदनिमित्त आज, बुधवारी प्रवेश प्रक्रियेला सुटी राहणार आहे. उद्या, गुरुवारी प्रत्यक्ष प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरू राहणार असून, हा अखेरचा दिवस आहे.शहरातील विविध ३२ महाविद्यालयांतील अकरावी प्रवेशासाठी शनिवार (दि. २)पासून प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही सुरू झाली. त्यानंतर मंगळवारी प्रक्रियेच्या तिसऱ्या दिवशी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेसाठी एकूण १३७९ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी प्रवेश निश्चित केले. दिवसभरात पावसाने काहीशी उघडिप दिल्याने प्रवेशाची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. सायंकाळी उशिरापर्यंत महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी दिसून आली. प्रवेश प्रक्रियेच्या तक्रार निवारण केंद्रांवर मंगळवारी एकूण १२९ तक्रार दाखल झाल्या. त्यात कला शाखेबाबत दाखल झालेल्या तीन तक्रार मान्य करण्यात आल्या. वाणिज्य शाखेसाठीच्या ३६ तक्रारींचा समावेश होता. त्यातील चार मान्य व ३२ अमान्य करण्यात आल्या. विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक ९० तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यातील दहा मान्य, तर ८० अमान्य झाल्या. गुणवत्ता यादीनुसार महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही पूर्ण करण्याचा उद्या, गुरुवारी अखेरचा दिवस आहे. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर महाविद्यालयीन पातळीवर विद्यार्थ्यांना दि. ८ आणि ९ जुलैला प्रवेश दिला जाईल. दरम्यान, शहरातील सर्व महाविद्यालयांतील अकरावीचे वर्ग दि. ११ जुलैपासून सुरू होतील. (प्रतिनिधी)‘तंत्रनिकेतन’च्या गुणवत्ता यादीची प्रतीक्षाशासकीय आणि खासगी तंत्रनिकेतनमधील पदविका अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची मुदत सोमवार (दि. ४)पर्यंत होती. या कालावधीत एकूण ९७९ अर्जांची विक्री, तर ७१४ विद्यार्थ्यांनी अर्जांची निश्चिती केली आहे. अर्ज निश्चिती केलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीच्या प्रसिद्धीची प्रतीक्षा लागली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण संचालनालयाकडून गुणवत्ता यादीच्या प्रसिद्धीची तारीख लवकरच प्रसिद्ध होईल, अशी माहिती शासकीय तंत्रनिकेतनमधील सुविधा केंद्राचे प्रमुख एम. एस. कागवाडे यांनी दिली. ‘कृषी’साठी अर्ज स्वीकृतीची मुदत संपलीकृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या कृषी महाविद्यालयांत बारावीनंतर बी. एस्सी. प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेच्या आॅनलाईन प्रवेश अर्ज स्वीकृतीचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेतर्फे कृषी महाविद्यालयातील बारावीनंतर बी. एस्सी. प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने आॅनलाईन राबविण्यात येत आहे. ६ जूनपासून प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, प्रवेश अर्ज स्वीकृती केंद्राकडे जमा करण्याची मंगळवारी शेवटचा दिवस आहे. अंतरिम गुणवत्ता यादीची प्रसिद्धी १२ जुलैला होणार आहे.