शहरं
Join us  
Trending Stories
1
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
4
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
5
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
6
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
7
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
8
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
9
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
10
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
11
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
12
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
13
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
14
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
15
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
16
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
17
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
18
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
19
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
20
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या

१३ वर्षे अंधारात; वीज, पाण्याविना घालमेल

By admin | Updated: May 21, 2015 00:06 IST

दोडामार्गमधील खांबल कुटुंबियांची व्यथा : ...अन्यथा उपोषणाशिवाय पर्याय नाही--लोकमत विशेष

शिरीष नाईक -कसई दोडामार्ग -कसई दोडामार्ग येथील संजय खांबल यांच्या घरात १३ वर्षे वीज नसल्याने त्यांचे कुटुंब अंधारात आहे. पिण्यासाठी पाण्याची सोयही ग्रामपंचातीने केली नाही. अशा भयानक परिस्थितीत आम्ही जगत आहोत. आम्हाला वीज द्या, पाणी द्या, अशी मागणी वारंवार संंबंधित यंत्रणेकडे केली. मात्र, आमची कोणी दखल घेतली नाही. एकप्रकारे आम्हाला वाळीत टाकल्यासारखे वाटते, अशी संतप्त भावना संजय खांबल यांनी व्यक्त केली. वीज आणि पाणी न मिळाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा खांबल यांनी दिला आहे. कसई दोडामार्ग ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात वीस वर्षांपूर्वी घर बांधले. या घरामध्ये माझी पत्नी संजोक्ता, तीन मुलगे व आई असा परिवार आहे. तेरा वर्षे घरात वीज नाही. अथक प्रयत्न केले. मात्र, यश आले नाही. कोणी दखल घेतली नाही, अशी खंत व्यक्त करून संजय खांबल यांनी आपली करूण कहाणी सांगितली. मी माझ्या परिवारासह येथे राहत आहे. घर बांधल्यानंतर रितसर वीज मीटर मिळावा, म्हणून वीज कार्यालयाकडे मागणी केली. यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. मात्र, लाईन ओढताना काही विरोधकांनी आमच्या जमिनीतून लाईन जोडू नका, असे सांगितले. त्यामुळे वीज कंपनीने लाईन ओढली नाही. गेली १३ वर्षे माझे कुटुंब अंधारात आहे. माझ्या तिन्ही मुलांनी अंधारात दिव्याखाली अभ्यास केला. मात्र, कोणालाही दया आली नाही. माणुसकीचा विचार करून लाईन ओढण्यास परवानगी देणे आवश्यक आहे. प्रत्येकाला घर, वीज, पाणी आणि अन्न मिळणे हा अधिकार आहे. त्यामुळे तहसीलदार आणि वीज कार्यालयाने संजय खांबल यांना वीज देणे बंधनकारक आहे. जर कोणी विरोध करत असेल, तर त्याला कायदेशीर मार्गांनी हाताळणे ही अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. विरोधकांची समजूत काढणे आवश्यक होतेमाझ्या या विषयाबाबत तोडगा काढण्यासाठी तंटामुक्ती अध्यक्षांकडे लेखी तक्रार केली. मात्र, त्यांनी दखल घेतली नाही. त्यानंतर तहसीलदार साहेबांकडे लेखी तक्रार आणि ग्रामपंचायतीकडे मागणी केली. मात्र, काहीच झाले नाही. विरोधकांनी विरोध केला. कोणीही दखल घेतली नाही. माझ्याकडे पैसे नसल्याने गरिबांना न्याय नसतो, हे मला समजून चुकले. पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते. अशा बिकट अवस्थेत माझे कुटुंब आहे. सर्व अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे हुंबरठे झिजवले. मात्र, काही उपयोग झाला नाही. तहसीलदार साहेबांची खरी जबाबदारी होती. त्यांनी विरोधकांची समजूत काढणे आवश्यक होते. त्यांनी प्रयत्न केले असते, तर हा वाद मिटला असता. ज्यांनी विरोध केला, त्यांच्या घरात वीज आहे. त्यांनाही कोणीतरी जमीन मालकाने परवानगी दिली असेल. जर त्यांना त्यावेळी असा विरोध झाला असता तर वीज कशी मिळाली असती ? या गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे.- संजय खांबल, कसई दोडामार्गनगरपंचायतीचा दर्जा मिळून काय उपयोग ?कसई दोडामार्ग गावाला आता नगर पंचायतीचा दर्जा मिळाला आहे. असे असताना या गावात तेरा वर्षे संजय खांबल यांच्या घरात अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे वीज जोडणी मिळाली नाही, हे दुर्दैव आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनधिकृतरित्या बांधलेल्या धनदांडग्यांना वीज, पाणी देण्यात येते. मात्र, संजय खांबल हे गरीब असल्याने त्यांच्या घरात अंधार आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.