शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

१३ वर्षे अंधारात; वीज, पाण्याविना घालमेल

By admin | Updated: May 21, 2015 00:06 IST

दोडामार्गमधील खांबल कुटुंबियांची व्यथा : ...अन्यथा उपोषणाशिवाय पर्याय नाही--लोकमत विशेष

शिरीष नाईक -कसई दोडामार्ग -कसई दोडामार्ग येथील संजय खांबल यांच्या घरात १३ वर्षे वीज नसल्याने त्यांचे कुटुंब अंधारात आहे. पिण्यासाठी पाण्याची सोयही ग्रामपंचातीने केली नाही. अशा भयानक परिस्थितीत आम्ही जगत आहोत. आम्हाला वीज द्या, पाणी द्या, अशी मागणी वारंवार संंबंधित यंत्रणेकडे केली. मात्र, आमची कोणी दखल घेतली नाही. एकप्रकारे आम्हाला वाळीत टाकल्यासारखे वाटते, अशी संतप्त भावना संजय खांबल यांनी व्यक्त केली. वीज आणि पाणी न मिळाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा खांबल यांनी दिला आहे. कसई दोडामार्ग ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात वीस वर्षांपूर्वी घर बांधले. या घरामध्ये माझी पत्नी संजोक्ता, तीन मुलगे व आई असा परिवार आहे. तेरा वर्षे घरात वीज नाही. अथक प्रयत्न केले. मात्र, यश आले नाही. कोणी दखल घेतली नाही, अशी खंत व्यक्त करून संजय खांबल यांनी आपली करूण कहाणी सांगितली. मी माझ्या परिवारासह येथे राहत आहे. घर बांधल्यानंतर रितसर वीज मीटर मिळावा, म्हणून वीज कार्यालयाकडे मागणी केली. यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. मात्र, लाईन ओढताना काही विरोधकांनी आमच्या जमिनीतून लाईन जोडू नका, असे सांगितले. त्यामुळे वीज कंपनीने लाईन ओढली नाही. गेली १३ वर्षे माझे कुटुंब अंधारात आहे. माझ्या तिन्ही मुलांनी अंधारात दिव्याखाली अभ्यास केला. मात्र, कोणालाही दया आली नाही. माणुसकीचा विचार करून लाईन ओढण्यास परवानगी देणे आवश्यक आहे. प्रत्येकाला घर, वीज, पाणी आणि अन्न मिळणे हा अधिकार आहे. त्यामुळे तहसीलदार आणि वीज कार्यालयाने संजय खांबल यांना वीज देणे बंधनकारक आहे. जर कोणी विरोध करत असेल, तर त्याला कायदेशीर मार्गांनी हाताळणे ही अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. विरोधकांची समजूत काढणे आवश्यक होतेमाझ्या या विषयाबाबत तोडगा काढण्यासाठी तंटामुक्ती अध्यक्षांकडे लेखी तक्रार केली. मात्र, त्यांनी दखल घेतली नाही. त्यानंतर तहसीलदार साहेबांकडे लेखी तक्रार आणि ग्रामपंचायतीकडे मागणी केली. मात्र, काहीच झाले नाही. विरोधकांनी विरोध केला. कोणीही दखल घेतली नाही. माझ्याकडे पैसे नसल्याने गरिबांना न्याय नसतो, हे मला समजून चुकले. पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते. अशा बिकट अवस्थेत माझे कुटुंब आहे. सर्व अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे हुंबरठे झिजवले. मात्र, काही उपयोग झाला नाही. तहसीलदार साहेबांची खरी जबाबदारी होती. त्यांनी विरोधकांची समजूत काढणे आवश्यक होते. त्यांनी प्रयत्न केले असते, तर हा वाद मिटला असता. ज्यांनी विरोध केला, त्यांच्या घरात वीज आहे. त्यांनाही कोणीतरी जमीन मालकाने परवानगी दिली असेल. जर त्यांना त्यावेळी असा विरोध झाला असता तर वीज कशी मिळाली असती ? या गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे.- संजय खांबल, कसई दोडामार्गनगरपंचायतीचा दर्जा मिळून काय उपयोग ?कसई दोडामार्ग गावाला आता नगर पंचायतीचा दर्जा मिळाला आहे. असे असताना या गावात तेरा वर्षे संजय खांबल यांच्या घरात अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे वीज जोडणी मिळाली नाही, हे दुर्दैव आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनधिकृतरित्या बांधलेल्या धनदांडग्यांना वीज, पाणी देण्यात येते. मात्र, संजय खांबल हे गरीब असल्याने त्यांच्या घरात अंधार आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.