शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

१२५ कोटींतून दुसरा रंकाळा बांधता येईल

By admin | Updated: January 24, 2016 00:46 IST

पर्यावरणवादी कार्यकर्त्यांकडून उपरोधिक टीकास्त्र : निधी अक्षरश: गाळात; महानगरपालिका प्रशासनाची फसवेगिरी

कोल्हापूर : रंकाळा तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी आधी काहीच करायचे नाही, आणि मग उच्च न्यायालय अथवा हरित लवादाचा ससेमिरा मागे लागला की आम्ही अमुक आणि तमुक योजना राबविणार आहोत, असे सांगून वेळ मारून नेणे, ही महानगरपालिकेने केलेली फसवेगिरी असल्याची टीका येथील पर्यावरणवादी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. मनपा प्रशासनाने रंकाळा तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी १२७ कोटींचा प्रस्ताव केला आहे. उपाययोजनावर जर एवढा खर्च येणार असेल, तर तेवढ्याच निधीत नवीन तलाव बांधून होईल, अशी उपरोधिक टीका करण्यात येते. रंकाळा तलावाच्या प्रदूषणासंदर्भात महानगरपालिका प्रशासनाने कधीही गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळेच या तलावाला अवकळा आली आहे. तलावाचे योग्य संवर्धन करा, त्यात मिसळणारे सांडपाणी रोखले जावे यासाठी कोल्हापूरच्या तमाम नागरिकांनी मनपा प्रशासनाला वारंवार जाणीव करून दिली. आंदोलने करून त्यावर आवाज उठविला, तर कधी स्वत: श्रमदानाने रंकाळा स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. परंतु, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने आर्थिक परिस्थितीचे कारण देत राहिले, तरीही रंकाळ्याचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी कोल्हापूरच्या काही दानशूर व्यक्तींनी जलपर्णी हटाव मोहिमेसाठी स्वत:ची वाहने दिली. जलसंपदा विभागानेही वाहने पुरविली. तरीही महालिका प्रशासनाने त्यात सातत्य राखले नाही. मनपातील काही अधिकाऱ्यांनी जनतेचा लाखो रुपयांचा निधी गाळ काढण्यासाठी गाळातच घातला; परंतु परिणाम मात्र शून्यच दिसून आला. २००७-०८ मध्ये एका महिन्यात गाळ काढण्याकरिता ४८ लाख रुपयांचा निधी महानगरपालिकेने खर्च केला. हा निधी अक्षरश: गाळात अडकला. गाळ निघाल्याचे दिसलेच नाही, पण निधी मात्र खर्च झाला. सन २००९ मध्ये राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेतून ९ कोटींचा निधी मिळाला होता. या निधीतून परताळा परिसरातून तलावात मिसळणारे सांडपाणी पश्चिम भागातून वळविण्यात येणार होते. त्यासाठी जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले होते. हे काम पूर्ण झाले की नाही, झाले असेल तर हे सांडपाणी रोखले गेले की नाही, याची कधीही खात्री करून घेतली नाही. २००९ साली शाम हौसिंग सोसायटी ते रंकाळा टॉवर मार्गावर भुयारी गटर योजना राबवून त्याद्वारे तलावात मिसळणारे सांडपाणी वळविण्याचे काम हाती घेण्यात आले. हे काम तब्बल पाच वर्षे सुरू होते. या कामावर मूळ एस्टिमेटपेक्षा ८० टक्के जादा खर्च करण्यात आला. परंतु सांडपाणी वळविण्याचा प्रयोग शंभर टक्के यशस्वी झाला की नाही, याची कधीही तपासणी केली नाही. अनेकवेळा नाल्याचे पाणी बंधाऱ्यावरून वाहात जाऊन रंकाळ्यात मिसळते. भुयारी गटर योजनेचे काम पूर्णपणे यशस्वी झालेले नाही, १२७ कोटींतून काय करणार ? मनपा प्रशासनाने १२७ कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. या निधीतून तलावातील प्रदूषण रोखले जाणार आहे. ३० कोटींचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणार आहे. ४४ कोटी रुपये खर्चून गाळ काढणार आहे, आणि ३० कोटींची पश्चिम भागातून ड्रेनेज लाईन टाकणार आहे. आता नव्याने सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणार, ड्रेनेजलाईन टाकणार असा दावा आहे. मग यापूर्वी केलेल्या भुयारी गटर योजनेचे काय, असा प्रश्न आहे. शिवाय एवढी मोठी रक्कम कोण देणार, त्यासाठी पाठपुरावा कोण करणार आणि किती वर्षांत योजना पूर्ण करणार हाही मुद्दा असून, त्याचे उत्तर द्यावे लागणार आहे. यापेक्षा नवीन तलाव होईल, अशी टीका होत आहे. हे महानगरपालिकेचे अपयश आहे.