शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

१२५ कोटींतून दुसरा रंकाळा बांधता येईल

By admin | Updated: January 24, 2016 00:46 IST

पर्यावरणवादी कार्यकर्त्यांकडून उपरोधिक टीकास्त्र : निधी अक्षरश: गाळात; महानगरपालिका प्रशासनाची फसवेगिरी

कोल्हापूर : रंकाळा तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी आधी काहीच करायचे नाही, आणि मग उच्च न्यायालय अथवा हरित लवादाचा ससेमिरा मागे लागला की आम्ही अमुक आणि तमुक योजना राबविणार आहोत, असे सांगून वेळ मारून नेणे, ही महानगरपालिकेने केलेली फसवेगिरी असल्याची टीका येथील पर्यावरणवादी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. मनपा प्रशासनाने रंकाळा तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी १२७ कोटींचा प्रस्ताव केला आहे. उपाययोजनावर जर एवढा खर्च येणार असेल, तर तेवढ्याच निधीत नवीन तलाव बांधून होईल, अशी उपरोधिक टीका करण्यात येते. रंकाळा तलावाच्या प्रदूषणासंदर्भात महानगरपालिका प्रशासनाने कधीही गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळेच या तलावाला अवकळा आली आहे. तलावाचे योग्य संवर्धन करा, त्यात मिसळणारे सांडपाणी रोखले जावे यासाठी कोल्हापूरच्या तमाम नागरिकांनी मनपा प्रशासनाला वारंवार जाणीव करून दिली. आंदोलने करून त्यावर आवाज उठविला, तर कधी स्वत: श्रमदानाने रंकाळा स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. परंतु, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने आर्थिक परिस्थितीचे कारण देत राहिले, तरीही रंकाळ्याचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी कोल्हापूरच्या काही दानशूर व्यक्तींनी जलपर्णी हटाव मोहिमेसाठी स्वत:ची वाहने दिली. जलसंपदा विभागानेही वाहने पुरविली. तरीही महालिका प्रशासनाने त्यात सातत्य राखले नाही. मनपातील काही अधिकाऱ्यांनी जनतेचा लाखो रुपयांचा निधी गाळ काढण्यासाठी गाळातच घातला; परंतु परिणाम मात्र शून्यच दिसून आला. २००७-०८ मध्ये एका महिन्यात गाळ काढण्याकरिता ४८ लाख रुपयांचा निधी महानगरपालिकेने खर्च केला. हा निधी अक्षरश: गाळात अडकला. गाळ निघाल्याचे दिसलेच नाही, पण निधी मात्र खर्च झाला. सन २००९ मध्ये राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेतून ९ कोटींचा निधी मिळाला होता. या निधीतून परताळा परिसरातून तलावात मिसळणारे सांडपाणी पश्चिम भागातून वळविण्यात येणार होते. त्यासाठी जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले होते. हे काम पूर्ण झाले की नाही, झाले असेल तर हे सांडपाणी रोखले गेले की नाही, याची कधीही खात्री करून घेतली नाही. २००९ साली शाम हौसिंग सोसायटी ते रंकाळा टॉवर मार्गावर भुयारी गटर योजना राबवून त्याद्वारे तलावात मिसळणारे सांडपाणी वळविण्याचे काम हाती घेण्यात आले. हे काम तब्बल पाच वर्षे सुरू होते. या कामावर मूळ एस्टिमेटपेक्षा ८० टक्के जादा खर्च करण्यात आला. परंतु सांडपाणी वळविण्याचा प्रयोग शंभर टक्के यशस्वी झाला की नाही, याची कधीही तपासणी केली नाही. अनेकवेळा नाल्याचे पाणी बंधाऱ्यावरून वाहात जाऊन रंकाळ्यात मिसळते. भुयारी गटर योजनेचे काम पूर्णपणे यशस्वी झालेले नाही, १२७ कोटींतून काय करणार ? मनपा प्रशासनाने १२७ कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. या निधीतून तलावातील प्रदूषण रोखले जाणार आहे. ३० कोटींचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणार आहे. ४४ कोटी रुपये खर्चून गाळ काढणार आहे, आणि ३० कोटींची पश्चिम भागातून ड्रेनेज लाईन टाकणार आहे. आता नव्याने सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणार, ड्रेनेजलाईन टाकणार असा दावा आहे. मग यापूर्वी केलेल्या भुयारी गटर योजनेचे काय, असा प्रश्न आहे. शिवाय एवढी मोठी रक्कम कोण देणार, त्यासाठी पाठपुरावा कोण करणार आणि किती वर्षांत योजना पूर्ण करणार हाही मुद्दा असून, त्याचे उत्तर द्यावे लागणार आहे. यापेक्षा नवीन तलाव होईल, अशी टीका होत आहे. हे महानगरपालिकेचे अपयश आहे.