शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
3
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
4
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
5
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
6
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
7
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
8
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
9
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
10
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
11
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
12
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
13
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
14
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
15
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
16
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
17
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
18
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
19
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
20
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...

शौचालयासाठी आता मिळणार १२ हजार अनुदान

By admin | Updated: November 14, 2014 23:33 IST

‘स्वच्छ भारत मिशन’ नवीन योजनेचे नाव : ‘निर्मलग्राम’च्या नावात केला बदल

प्रकाश पाटील- कोपार्डे -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे केंद्र व राज्यस्तरावर राबविण्यात येणाऱ्या ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामासाठी आता १२ हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय केंद्र व राज्य शासनाने घेतला आहे. हे अनुदान ज्या दिवशी ‘स्वच्छ भारत मिशन’ला प्रारंभ करण्यात आला, त्या गांधी जयंतीपासून देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या निर्मल भारत अभियानाचे २ आॅक्टोबरला ‘स्वच्छ भारत मिशन’ असे नामकरण करण्यात आले. निर्मल भारत अभियानातून शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी चार हजार ६०० रुपयांचे अनुदान देण्यात येत होते. तसेच या लाभार्थ्यांला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मनरेगामधून चार हजार ५००, असे एकूण नऊ हजार शंभर रुपयांचे अनुदान मिळत होते. त्याऐवजी ‘स्वच्छ भारत मिशन’ मधून आता १२ हजार रुपये देण्यात येणार आहेत. यातील नऊ हजार रुपये (७५ टक्के) केंद्र सरकार, तर तीन हजार रुपये (२५ टक्के), राज्य सरकारमार्फत देण्यात येतील, तर मनेरगांतर्गत दिले जाणारे प्रोत्साहन अनुदान बंद करण्याचा निर्णयही झाला आहे. इंदिरा आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांमधील शौचालयाच्या बांधकामासाठी स्वतंत्रपणे अर्थसंकल्पाची तरतूद करण्यात येणार आहे. तोपर्यंत ‘स्वच्छ भारत मिशन’मधून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. सार्वजनिक शौचालयाच्या उभारणीसाठी दोन लाख रुपये देण्यात येणार आहेत. त्यातील एक लाख २० हजार रुपये केंद्र शासन (६० टक्के), तर ६० हजार रुपये राज्य शासन (३० टक्के) देणार असून, २० हजार रुपये (१० टक्के) लोकवर्गणीतून जमा करावे लागणार आहेत. याबाबतचा राज्य शासनाने तसा स्पष्ट अध्यादेश काढला आहे. ग्रामसेवकांचे काम होणार कमी !वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामासाठी मनरेगात साडेचार हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. यासाठी लाभार्थ्याला जॉब कार्ड बनविणे, कुशल व अकुशल अशी कामगारांची प्रतवारी करणे, त्याची स्वतंत्र नोंद ठेवणे ही कामे ग्रामसेवकांना करावी लागत होती. त्याचा अहवाल गटविकास अधिकाऱ्याला द्यावा लागत होता व ती रक्कम मिळत होती. मात्र, या अंमलबजावणीने मनरेगाचे प्रोत्साहन अनुदान बंद करण्यात येत असल्याने यापुढे ग्रामसेवकांचे हे काम कमी होणार आहे.