शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

७० पोलिसांवर ११५ गावांची सुरक्षा : करवीर तालुक्यातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 00:07 IST

वाढती लोकसंख्या, उपनगरांंची वाढणारी संख्या यात वाढलेली गुन्हेगारी, ग्रामीण भागात वाड्यावस्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांकडे लागणाऱ्या यंत्रणेचा अभाव करवीर पोलीस ठाण्यात दिसत आहे.

ठळक मुद्देपाच पोलीस चौकींचीही दुरवस्था; २५ हजार लोकसंख्येला एक पोलीस

कोपार्डे : वाढती लोकसंख्या, उपनगरांंची वाढणारी संख्या यात वाढलेली गुन्हेगारी, ग्रामीण भागात वाड्यावस्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांकडे लागणाऱ्या यंत्रणेचा अभाव करवीर पोलीस ठाण्यात दिसत आहे. खबरे, पोलीसमित्र यांची वानवा दिसत असल्याने जबरी चोºया, मारामाºया, खून घरफोड्यासारख्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यात करवीर पोलिसांना यातायात करावी लागताना दिसत आहेत.

करवीर तालुका हा जिल्ह्यात सर्वांत मोठा अडीच प्लॉटचा तालुका म्हणून ओळखला जातो. हा तालुका कोल्हापूर शहराच्या जवळ असल्याने अस्ताव्यस्त वाढणारी उपनगरे, शहरालगत असणाºया गावांची वाढणारी लोकसंख्या, पोलीस ठाण्यापासून ६० ते ७० कि.मी. अंतरावर असणारी डोंगराळ भागातील गावे व वाड्यावस्त्या यांच्या सुरक्षेचा ताण करवीर पोलिसांवर पडत असल्याचे स्पष्ट चित्र पाहायला मिळते आहे.

करवीर बरोबर गांधीनगर पोलीस ठाणे असले तरी करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११५ गावे समाविष्ट आहेत. यातील २० गावे अतिसंवेदनशील आहेत, तर ५६ गावे संवेदनशील आहेत. यातील काही गावांंचे पोलीस ठाण्यापासूनचे अंतर ४० ते ५० कि.मी.पर्यंतचे आहे. एखाद्या गावात गुन्हा घडल्यास वेळेत या गावात पोहोचण्यासाठी सक्षम यंत्रणा नसल्याचे स्पष्ट चित्र आहे. याचा परिणाम गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे शक्य नसल्याने अनेक जबरी चोऱ्यांचा उलगडा झालेला नाही.

करवीर पोलीस ठाण्याअंतर्गत चार पोलीस चौकी आहेत; पण त्या असून नसल्यासाख्याच असल्याने एखादी तक्रार करायची झाल्यास करवीर पोलीस ठाणे गाठावे लागते. येथेही येणाºया व्यक्तीस बसण्यासाठी पुरेशी जागा नाही. महिला कर्मचारी व नागरिकांना ही असुविधाजनक परिस्थिती आहे. यामुळे समोरच असणाºया चिंचेच्या झाडाखाली बसावे लागते. पण, पावसाळ्यात येणाºया लोकांना फारच असुविधांचा सामना करावा लागतो.मोठ्या चोºयांचा शोध कधीभामटे येथे दूध संस्था फोडून पावणेचार लाख लंपास केले आहेत. कसबा बीड, सांगरूळ परिसरात झालेल्या दूध संस्थांमधील चोºयांचा शोध लागलेला नाही.

कुंभी-कासारी कारखान्यावर ज्वेलरी, मोबाईल शॉपी फोडण्यात आल्या असून, त्याबाबत संबंधितांना कोणतीही माहिती दिली जात नाही, अशा तक्रारी आहेत.

अलीकडेच यशवंत बँकेच्या बालिंगा शाखेवर पडलेला दरोडा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शोधल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर उठणारे प्रश्न कमी झाले.खबरे, पोलीस मित्रांची वानवाएखादा गुन्हा शोधण्यासाठी अथवा तो घडल्यानंतर पोलिसांना तत्पर माहिती मिळण्यासाठी खबरे व पोलीसमित्र यांची करवीर पोलिसांकडे वानवा आहे. तसा आत्मविश्वास व संवाद पोलिसासांकडून होत नसल्याने खबरे पोलिसांपासून लांबच आहेत.करवीरला पोलीस कस्टडी नाहीकरवीर तालुक्यातील जनता शांतता व सुव्यवस्था राखणारी आहे; पण येथे सुबत्ता असल्याने जबरी घरफोड्या, मारामाºया, दूध संस्थांवरील दरोडे, एटीएम मशीन फोडण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर झाले आहेत. यातील चोरट्यांपर्यंत पोहोचण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. एखादा गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागलाच तर त्याला गांधीनगर पोलीस कस्टडीत ठेवावे लागत असून, गुन्ह्याच्या चौकशीसाठी मोठ्या अडचणी येत असल्याचे चित्र आहे.कार्यरत पोलीस कर्मचारी : ४पी. आय. १ ४साहाय्यक पो. निरीक्षक २ ४पीएसआय ४ ४ए एस आय ९ ४हेड कॉन्स्टेबल २४ ४पी एन २७ ४पोलीस कॉन्स्टेबल २० 

सुरक्षेच्या कारणास्तव गांधीनगर येथे पोलीस कस्टडी हलविण्यात आली आहे. घडलेल्या गुन्ह्यांपैकी ७५ टक्के गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे.- सुनील पाटील, पी.आय., करवीर पोलीस ठाणे

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPolice Stationपोलीस ठाणे