शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

७० पोलिसांवर ११५ गावांची सुरक्षा : करवीर तालुक्यातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 00:07 IST

वाढती लोकसंख्या, उपनगरांंची वाढणारी संख्या यात वाढलेली गुन्हेगारी, ग्रामीण भागात वाड्यावस्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांकडे लागणाऱ्या यंत्रणेचा अभाव करवीर पोलीस ठाण्यात दिसत आहे.

ठळक मुद्देपाच पोलीस चौकींचीही दुरवस्था; २५ हजार लोकसंख्येला एक पोलीस

कोपार्डे : वाढती लोकसंख्या, उपनगरांंची वाढणारी संख्या यात वाढलेली गुन्हेगारी, ग्रामीण भागात वाड्यावस्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांकडे लागणाऱ्या यंत्रणेचा अभाव करवीर पोलीस ठाण्यात दिसत आहे. खबरे, पोलीसमित्र यांची वानवा दिसत असल्याने जबरी चोºया, मारामाºया, खून घरफोड्यासारख्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यात करवीर पोलिसांना यातायात करावी लागताना दिसत आहेत.

करवीर तालुका हा जिल्ह्यात सर्वांत मोठा अडीच प्लॉटचा तालुका म्हणून ओळखला जातो. हा तालुका कोल्हापूर शहराच्या जवळ असल्याने अस्ताव्यस्त वाढणारी उपनगरे, शहरालगत असणाºया गावांची वाढणारी लोकसंख्या, पोलीस ठाण्यापासून ६० ते ७० कि.मी. अंतरावर असणारी डोंगराळ भागातील गावे व वाड्यावस्त्या यांच्या सुरक्षेचा ताण करवीर पोलिसांवर पडत असल्याचे स्पष्ट चित्र पाहायला मिळते आहे.

करवीर बरोबर गांधीनगर पोलीस ठाणे असले तरी करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११५ गावे समाविष्ट आहेत. यातील २० गावे अतिसंवेदनशील आहेत, तर ५६ गावे संवेदनशील आहेत. यातील काही गावांंचे पोलीस ठाण्यापासूनचे अंतर ४० ते ५० कि.मी.पर्यंतचे आहे. एखाद्या गावात गुन्हा घडल्यास वेळेत या गावात पोहोचण्यासाठी सक्षम यंत्रणा नसल्याचे स्पष्ट चित्र आहे. याचा परिणाम गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे शक्य नसल्याने अनेक जबरी चोऱ्यांचा उलगडा झालेला नाही.

करवीर पोलीस ठाण्याअंतर्गत चार पोलीस चौकी आहेत; पण त्या असून नसल्यासाख्याच असल्याने एखादी तक्रार करायची झाल्यास करवीर पोलीस ठाणे गाठावे लागते. येथेही येणाºया व्यक्तीस बसण्यासाठी पुरेशी जागा नाही. महिला कर्मचारी व नागरिकांना ही असुविधाजनक परिस्थिती आहे. यामुळे समोरच असणाºया चिंचेच्या झाडाखाली बसावे लागते. पण, पावसाळ्यात येणाºया लोकांना फारच असुविधांचा सामना करावा लागतो.मोठ्या चोºयांचा शोध कधीभामटे येथे दूध संस्था फोडून पावणेचार लाख लंपास केले आहेत. कसबा बीड, सांगरूळ परिसरात झालेल्या दूध संस्थांमधील चोºयांचा शोध लागलेला नाही.

कुंभी-कासारी कारखान्यावर ज्वेलरी, मोबाईल शॉपी फोडण्यात आल्या असून, त्याबाबत संबंधितांना कोणतीही माहिती दिली जात नाही, अशा तक्रारी आहेत.

अलीकडेच यशवंत बँकेच्या बालिंगा शाखेवर पडलेला दरोडा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शोधल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर उठणारे प्रश्न कमी झाले.खबरे, पोलीस मित्रांची वानवाएखादा गुन्हा शोधण्यासाठी अथवा तो घडल्यानंतर पोलिसांना तत्पर माहिती मिळण्यासाठी खबरे व पोलीसमित्र यांची करवीर पोलिसांकडे वानवा आहे. तसा आत्मविश्वास व संवाद पोलिसासांकडून होत नसल्याने खबरे पोलिसांपासून लांबच आहेत.करवीरला पोलीस कस्टडी नाहीकरवीर तालुक्यातील जनता शांतता व सुव्यवस्था राखणारी आहे; पण येथे सुबत्ता असल्याने जबरी घरफोड्या, मारामाºया, दूध संस्थांवरील दरोडे, एटीएम मशीन फोडण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर झाले आहेत. यातील चोरट्यांपर्यंत पोहोचण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. एखादा गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागलाच तर त्याला गांधीनगर पोलीस कस्टडीत ठेवावे लागत असून, गुन्ह्याच्या चौकशीसाठी मोठ्या अडचणी येत असल्याचे चित्र आहे.कार्यरत पोलीस कर्मचारी : ४पी. आय. १ ४साहाय्यक पो. निरीक्षक २ ४पीएसआय ४ ४ए एस आय ९ ४हेड कॉन्स्टेबल २४ ४पी एन २७ ४पोलीस कॉन्स्टेबल २० 

सुरक्षेच्या कारणास्तव गांधीनगर येथे पोलीस कस्टडी हलविण्यात आली आहे. घडलेल्या गुन्ह्यांपैकी ७५ टक्के गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे.- सुनील पाटील, पी.आय., करवीर पोलीस ठाणे

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPolice Stationपोलीस ठाणे