शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

सांडपाण्यावर फुलविली ११ एकर बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 19:19 IST

संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सांडपाण्यावर प्रक्रिया करून शिवाजी विद्यापीठाच्या उद्यान विभागाने ११ एकर परिसरामधील बाग ...

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सांडपाण्यावर प्रक्रिया करून शिवाजी विद्यापीठाच्या उद्यान विभागाने ११ एकर परिसरामधील बाग फुलविली आहे. दर दिवशी ८० हजार लिटर पाण्याचा पुनर्वापर केला जात आहे. पाण्याचे प्रदूषण टाळण्यासह पाणी बचतीचे पर्यावरणपूरक पाऊल या माध्यमातून विद्यापीठाने टाकले आहे.वसतिगृहातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते विद्यापीठ परिसरातील विविध बागांसाठी वापरण्याची संकल्पना राबविण्याचा निर्णय उद्यान विभागाने घेतला. त्यानुसार सन २००७ मध्ये या विभागाने मुलींच्या वसतिगृहामागे पहिला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पातून दर दिवशी ५० हजार लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया होते. प्रक्रिया केलेल्या पाण्यातून ग्रंथालयाच्या जुन्या आणि नव्या इमारतींसमोरील बगीचा, उत्तर बाजूचे सर्कल आणि त्यातील झाडे, कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा परिसर आणि मुलींच्या वसतिगृहासमोरील बगीचा फुलविला आहे.दहा एकरांतील परिसर हिरवागार केला आहे. पहिला प्रकल्प यशदायी ठरल्याने सन २०१३ मध्ये तंत्रज्ञान अधिविभागातील मुले आणि मुलींच्या वसतिगृह परिसरात प्रतिदिन ३० हजार लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा जैविक प्रकल्प सुरू करण्यात आला.या प्रकल्पातील पाण्यातून या विभागाच्या परिसरातील सव्वा एकरमधील बगीचाला पाणीपुरवठा केला जातो.तिसरा प्रकल्प कार्यान्वितविद्यापीठातील विविध विभाग, कॅँटीनला प्रशासनाकडून ‘आरओ’ फिल्टर पाणी पुरविले जाते. ‘आरओ’तून जे क्षारयुक्त पाणी बाहेर पडते. ते वाया जाऊ नये यासाठी त्या परिसरात नारळाच्या झाडांची बाग केली आहे. आता गेल्या महिन्यात पाच बंगला परिसरात २० हजार लिटर पाण्यावर प्रक्रिया करणारा तिसरा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. त्यातून उपलब्ध होणारे पाणी हे संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागासमोरील टेकडी आणि दूरशिक्षण केंद्राच्या परिसरातील झाडांना पुरविले जाणार आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून मिळालेल्या पाण्यातून बगीचा, झाडे फुलविण्याचा विद्यापीठाचा उपक्रम आदर्शवत ठरणारा आहे.