शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाण्यावर फुलविली ११ एकर बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 19:19 IST

संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सांडपाण्यावर प्रक्रिया करून शिवाजी विद्यापीठाच्या उद्यान विभागाने ११ एकर परिसरामधील बाग ...

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सांडपाण्यावर प्रक्रिया करून शिवाजी विद्यापीठाच्या उद्यान विभागाने ११ एकर परिसरामधील बाग फुलविली आहे. दर दिवशी ८० हजार लिटर पाण्याचा पुनर्वापर केला जात आहे. पाण्याचे प्रदूषण टाळण्यासह पाणी बचतीचे पर्यावरणपूरक पाऊल या माध्यमातून विद्यापीठाने टाकले आहे.वसतिगृहातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते विद्यापीठ परिसरातील विविध बागांसाठी वापरण्याची संकल्पना राबविण्याचा निर्णय उद्यान विभागाने घेतला. त्यानुसार सन २००७ मध्ये या विभागाने मुलींच्या वसतिगृहामागे पहिला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पातून दर दिवशी ५० हजार लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया होते. प्रक्रिया केलेल्या पाण्यातून ग्रंथालयाच्या जुन्या आणि नव्या इमारतींसमोरील बगीचा, उत्तर बाजूचे सर्कल आणि त्यातील झाडे, कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा परिसर आणि मुलींच्या वसतिगृहासमोरील बगीचा फुलविला आहे.दहा एकरांतील परिसर हिरवागार केला आहे. पहिला प्रकल्प यशदायी ठरल्याने सन २०१३ मध्ये तंत्रज्ञान अधिविभागातील मुले आणि मुलींच्या वसतिगृह परिसरात प्रतिदिन ३० हजार लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा जैविक प्रकल्प सुरू करण्यात आला.या प्रकल्पातील पाण्यातून या विभागाच्या परिसरातील सव्वा एकरमधील बगीचाला पाणीपुरवठा केला जातो.तिसरा प्रकल्प कार्यान्वितविद्यापीठातील विविध विभाग, कॅँटीनला प्रशासनाकडून ‘आरओ’ फिल्टर पाणी पुरविले जाते. ‘आरओ’तून जे क्षारयुक्त पाणी बाहेर पडते. ते वाया जाऊ नये यासाठी त्या परिसरात नारळाच्या झाडांची बाग केली आहे. आता गेल्या महिन्यात पाच बंगला परिसरात २० हजार लिटर पाण्यावर प्रक्रिया करणारा तिसरा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. त्यातून उपलब्ध होणारे पाणी हे संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागासमोरील टेकडी आणि दूरशिक्षण केंद्राच्या परिसरातील झाडांना पुरविले जाणार आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून मिळालेल्या पाण्यातून बगीचा, झाडे फुलविण्याचा विद्यापीठाचा उपक्रम आदर्शवत ठरणारा आहे.