शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
4
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
5
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
6
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
7
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
8
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
9
चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
10
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
11
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
12
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
13
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
14
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
15
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
16
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
17
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
18
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
19
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
20
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा

१०७२ शाळा भरतात उघड्यावरच; ८९५ मैदानाविनाच !

By admin | Updated: July 1, 2014 00:55 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांची व्यथा : तब्बल ११९५ मुख्याध्यापकांना बसण्यासाठी खोलीच नाही, सोयी-सुविधा मिळणार कधी ?

राजाराम लोंढे : कोल्हापूरजिल्हा परिषदेच्या २०२८ शाळांपैकी तब्बल १०७२ शाळा उघड्यावरच आहेत. संरक्षण भिंती नसल्याने या शाळांची सुरक्षितताच धोक्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक शाहूवाडी तालुक्यातील २०५ शाळांचा समावेश आहे. केवळ संरक्षण भिंतींची वाणवा आहे, असे नाही तर तब्बल ११९५ मुख्याध्यापकांना बसण्यासाठी खोलीच नाही, तर ८९५ शाळांना मैदानच नाही.जिल्हा परिषदेचे प्रशासन गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून ‘ई-लर्निंग’सारखे नावीन्यपूर्ण उपक्रम शिक्षण विभागाच्या वतीने राबविले जात आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी जशी अत्याधुनिक साधनसामग्रींची गरज असते, तशी त्या शाळेची भौगोलिक स्थितीही मजबूत असणे गरजेचे असते. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई)नुसार या सुविधा असणे बंधनकारक आहे. शाळेचा परिसर स्वच्छ व सुंदर असला तरच शाळेतील वातावरण आल्हाददायक राहण्यास मदत होते. यासाठी शाळांच्या संरक्षण भिंती, प्रशस्त मैदान, मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र खोली, पाण्याची व्यवस्था, अशा मूलभूत सुविधा तिथे असणे गरजेचे आहे; पण जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये या सुविधा कमी आहेत. शाळा इमारतीच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळेच्या सभोवती कंपौंड (संरक्षण भिंत) असणे गरजेचे आहे. इमारतीबरोबर शाळेचा बगिचा, परिसरातील झाडे यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने संरक्षण भिंतींची गरज शाळांना आहे. दहा शाळा इमारतीविनाच !जिल्ह्यात दहा शाळा इमारतीविनाच आहेत. यामध्ये भुदरगड, चंदगड, राधानगरी व शाहूवाडी तालुक्यांतील शाळांचा समावेश आहे.