शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

७ वर्षांत १०५६ शेतकऱ्यांचा अपमृत्यू!

By admin | Updated: December 4, 2015 00:23 IST

सातारा जिल्ह्याची धक्कादायक आकडेवारी : शासनाकडून ८६७ वारसांना ८ कोटी ६७ लाख रुपयांची मदत; विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

प्रदीप यादव -- सातारा  सातारा जिल्ह्यात गेल्या सात वर्षांत जवळपास १ हजार ५६ शेतकऱ्यांचा अपमृत्यू झाला आहे. विदर्भ, मराठवाड्यापेक्षाही पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातील ही आकडेवारी चिंताजनक अशीच आहे. यासाठी प्रत्येक बळीराजाचा विमा असणे गरजेचे बनले आहे. शासन पातळीवर शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे धोरण राबविले जात आहे. या अनुषंगाने विविध योजना सुरु करण्यात आल्या असून आजपर्यंत मृत्यू पावलेल्या ८६७ शेतकऱ्यांच्या वारसांना शासनाने ८ कोटी ६७ लाख रुपयांची मदत दिली आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती बिनभरवशाची झाली आहे. तरीही एक तरी हंगाम हाताला लागेल, या आशेने शेतकरी कर्ज काढून शेती पिकवतात. मात्र गेल्या दहा-बारा वर्षातील पर्जन्यमान पाहिले तर ऐन मोक्याला पावसाने घात केल्याचे पाहायला मिळते. जूनमध्ये कधी अतिवृष्टीमुळे तर कधी पावसाने ओढ दिल्याने पेरण्या लांबणीवर पडत राहिल्या. तर बरेचदा दुबार पेरणीचे संकट ओढवल्याचे प्रकार घडत आहेत. पेरण्या केल्यानंतर पीक काढायच्या वेळेलाच नेमका अवकाळी पाऊस येतो आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आणि जनावारांचा चारा सर्वकाही धुऊन नेतो, हेच गेल्या दहा वर्षातील चित्र आहे. शेतीत काही पिकत नसल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे विवाह, घर बांधणे, आजारपण यासाठी शेतकरी कर्ज घेतात आणि या फेऱ्यातून त्यांची सुटका काही होत नाही. त्यामुळे आत्महत्येचेही प्रमाण वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने २०१५-१६ मध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत संरक्षण रकमेमध्ये दुपटीने वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकरी जितेंद्र शिंदे यांनी दिली. या योजनेचा कालावधी १२ महिन्यांचा असून १ डिसेंबर २०१५ ते ३० नोव्हेंबर २०१६ या कालावधीत दिवसातील २४ तासांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी अपघातग्रस्त व्यक्तीच्या नावे शेतजमीन असणे आवश्यक आहे. तसेच अपघातावेळी त्यांचे वय किमान १० वर्षे व कमाल ७५ वर्षे असणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे शेतकऱ्यांस अपंगत्व अथवा मृत्यू कोणत्याही प्रकारच्या अपघातानेच येणे आवश्यक आहे. विमा हप्त्याची रक्कम कंपनीस अदा...महसूल विभागाकडील नोंदीप्रमाणे १० ते ७५ वयोगटातील सुमारे १ कोटी ३७ लाख खातेदारांचा प्रतिशेतकरी १९.८९ रुपयेप्रमाणे विमा हप्त्याची रक्कम शासनाने विमा कंपनीस अदा केली आहे. शेतकऱ्यास कोणतीही रक्कम अदा करावी लागणार नाही. अपघातग्रस्त शेतकरी व वारसांनी कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी यांच्या संपर्क साधून प्रस्ताव सादर करावे.- जितेंद्र शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, साताराया योजनेंतर्गत ग्राह्य अपघातांचे प्रकार रस्ता, रेल्वे अपघात, पाण्यामध्ये बुडून मृत्यू, जंतूनाशक अथवा अन्य कारणाने विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरुन पडून झालेला अपघात वा मृत्यू, सर्पदंश, विंचूदंश, नक्षलवाद्याकडून झालेली हत्या, जनावरांच्या चावण्याने, हल्ल्यामुळे जखमी किंवा मृत्यू, जनावरांच्या चावण्याने रेबीज होऊन मृत्यू, जखमी होऊन मृत्यू, जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू होऊन शव न मिळणे, दंगल, अन्य कोणतेही अपघात याचा या योजनेत समावेश आहे.१८९ कुटुंबे मदतीपासून वंचित२००८-१५ या कालावधीत जिल्ह्यात एकूण १०५६ शेतकऱ्यांचा अपमृत्यू झाला आहे. पैकी ८६७ शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत दिली आहे. शेजजमीन नावावर नसणे, जवळच्या व्यक्तीकडून खून, वाहन अपघातात वाहन चालविण्याचा परवाना नसणे आदी कारणांमुळे १८९ शेतकऱ्यांना मदत मिळू शकली नाही, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.नुकसानभरपाईचे स्वरुप या योजनेच्या अपघात व नुकसानभरपाईचे स्वरूप असे आहे. अपघाती मृत्यू, अपघातामुळे २ डोळे अथवा २ अवयव निकामी होणे, अपघातामुळे १ डोळा व १ अवयवय निकामी होणे यासाठी २ लाख रुपये व अपघातामुळे १ डोळा अथवा २ अवयव निकामी होणे, यासाठी १ लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यईल.