शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

थकीत ‘एफआरपी’वर १०३ कोटी व्याज

By admin | Updated: February 18, 2016 21:14 IST

कोल्हापूर विभागातील चित्र : साखर आयुक्तांकडील सुनावणी अंतिम टप्प्यात

राजाराम लोंढे-- कोल्हापूर --साखर कारखान्याकडे गाळपास आलेल्या उसास १४ दिवसांत ‘एफआरपी’ची पूर्ण रक्कम एकाही कारखान्याने दिलेली नाही. कायद्यानुसार शेतकऱ्यांना १५ टक्क्यांप्रमाणे व्याज द्यावे लागणार असून, कोल्हापूर विभागातील प्रलंबित ‘एफआरपी’वर तब्बल १०३ कोटी व्याजाची रक्कम होत आहे. राज्यात सगळीकडेच ही परिस्थिती आहे. याबाबत औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार साखर आयुक्तांकडे सुरू असलेली सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. ऊस गळितास गेल्यापासून १४ दिवसांच्या आत ‘एफआरपी’प्रमाणे शेतकऱ्यांना पैसे द्यावे, हा कायदा सांगतो. परंतु, कायदा अस्तित्वात आल्यापासून एकदाही १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना कोणी पैसे दिलेले नाहीत. या हंगामात साखरेचे दर घसरल्याने सरकारनेच ‘एफआरपी’चे दोन तुकडे करून कारखानदारांना सोयीचे केले. त्यानंतर साखरेच्या दरात कमालीची सुधारणा झाल्याने आर्थिक संकटातून कारखानदार निसटले; पण १८ महिन्यांपूर्वी उसाच्या लागणीसाठी शेतकऱ्यांनी विकास संस्था, बॅँकांतून काढलेल्या कर्जाचा आकडा फुगत आहे. ‘एफआरपी’च्या ८०:२०च्या फॉर्म्युल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्यात भरीस भर म्हणून ८० टक्के ‘एफआरपी’ही कारखान्यांनी थकविली आहे. याबाबत विभागातील पाच कारखान्यांना नोटिसाही काढल्या आहेत. कोल्हापूर विभागात जानेवारीअखेर एक कोटी ३५ लाख ४७ हजार टन उसाचे गाळप झाले आहे. विभागाची सरासरी एफआरपी २४२४ रुपये आहे. आतापर्यंत कारखान्यांनी ऊस बिलापोटी शेतकऱ्यांना २२७४ कोटी रुपये दिले आहेत. अद्याप १०८३ कोटी ८३ लाख रुपये जानेवारीअखेर देय एफआरपी रक्कम आहे. राज्यातील सर्वच विभागांत ही परिस्थिती आहे. या विरोधात मराठवाड्यातील प्रल्हाद इंगवले या शेतकऱ्याने औरंगाबाद खंडपीठाकडे याचिका दाखल केली होती. यावर साखर आयुक्तांनी सुनावणी घेऊन निर्णय घ्यावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आयुक्तांकडे याबाबतची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. आयुक्त कायद्याचे पालन करणार की पुन्हा कारखानदारांचीच सोय बघणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. २० टक्क्यांची शक्यता धूसरच!शासनाने साखर हंगामाची कोंडी फोडण्यासाठी ‘एफआरपी’चा ८०:२०चा फॉर्म्युला पुढे आणला. परंतु, अनेक कारखान्यांची ८० टक्के देतानाच दमछाक झाली आहे. त्यांची हंगामाच्या शेवटच्या टप्प्यातील बिले लवकर हातात पडणे कठीण आहे. त्यामुळे उर्वरित २० टक्के एफआरपी हंगाम संपण्यापूर्वी मिळण्याची शक्यता फारच धूसर आहे. सरकारने कायदा केला आणि त्यांनीच मोडला आहे. न्यायव्यवस्थेकडेच न्याय मागणे एवढेच आमच्या हातात राहिले आहे. ‘एफआरपी’ प्रमाणे पैसे न देता कारखानदारांनी शेतकऱ्यांना हजारो कोटींना लुटले आहे. दुर्दैवाने त्यांना मुख्यमंत्र्यांसह ‘स्वाभिमानी’चे नेते सामील झाले आहेत. हे सगळे मताचे राजकारण असल्याने जोपर्यंत अन्यायाविरोधात जनमत होत नाही, तोपर्यंत अन्याय दूर होणार नाही. - रघुनाथदादा पाटील, नेते, शेतकरी संघटना