शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

थकीत ‘एफआरपी’वर १०३ कोटी व्याज

By admin | Updated: February 18, 2016 21:14 IST

कोल्हापूर विभागातील चित्र : साखर आयुक्तांकडील सुनावणी अंतिम टप्प्यात

राजाराम लोंढे-- कोल्हापूर --साखर कारखान्याकडे गाळपास आलेल्या उसास १४ दिवसांत ‘एफआरपी’ची पूर्ण रक्कम एकाही कारखान्याने दिलेली नाही. कायद्यानुसार शेतकऱ्यांना १५ टक्क्यांप्रमाणे व्याज द्यावे लागणार असून, कोल्हापूर विभागातील प्रलंबित ‘एफआरपी’वर तब्बल १०३ कोटी व्याजाची रक्कम होत आहे. राज्यात सगळीकडेच ही परिस्थिती आहे. याबाबत औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार साखर आयुक्तांकडे सुरू असलेली सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. ऊस गळितास गेल्यापासून १४ दिवसांच्या आत ‘एफआरपी’प्रमाणे शेतकऱ्यांना पैसे द्यावे, हा कायदा सांगतो. परंतु, कायदा अस्तित्वात आल्यापासून एकदाही १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना कोणी पैसे दिलेले नाहीत. या हंगामात साखरेचे दर घसरल्याने सरकारनेच ‘एफआरपी’चे दोन तुकडे करून कारखानदारांना सोयीचे केले. त्यानंतर साखरेच्या दरात कमालीची सुधारणा झाल्याने आर्थिक संकटातून कारखानदार निसटले; पण १८ महिन्यांपूर्वी उसाच्या लागणीसाठी शेतकऱ्यांनी विकास संस्था, बॅँकांतून काढलेल्या कर्जाचा आकडा फुगत आहे. ‘एफआरपी’च्या ८०:२०च्या फॉर्म्युल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्यात भरीस भर म्हणून ८० टक्के ‘एफआरपी’ही कारखान्यांनी थकविली आहे. याबाबत विभागातील पाच कारखान्यांना नोटिसाही काढल्या आहेत. कोल्हापूर विभागात जानेवारीअखेर एक कोटी ३५ लाख ४७ हजार टन उसाचे गाळप झाले आहे. विभागाची सरासरी एफआरपी २४२४ रुपये आहे. आतापर्यंत कारखान्यांनी ऊस बिलापोटी शेतकऱ्यांना २२७४ कोटी रुपये दिले आहेत. अद्याप १०८३ कोटी ८३ लाख रुपये जानेवारीअखेर देय एफआरपी रक्कम आहे. राज्यातील सर्वच विभागांत ही परिस्थिती आहे. या विरोधात मराठवाड्यातील प्रल्हाद इंगवले या शेतकऱ्याने औरंगाबाद खंडपीठाकडे याचिका दाखल केली होती. यावर साखर आयुक्तांनी सुनावणी घेऊन निर्णय घ्यावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आयुक्तांकडे याबाबतची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. आयुक्त कायद्याचे पालन करणार की पुन्हा कारखानदारांचीच सोय बघणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. २० टक्क्यांची शक्यता धूसरच!शासनाने साखर हंगामाची कोंडी फोडण्यासाठी ‘एफआरपी’चा ८०:२०चा फॉर्म्युला पुढे आणला. परंतु, अनेक कारखान्यांची ८० टक्के देतानाच दमछाक झाली आहे. त्यांची हंगामाच्या शेवटच्या टप्प्यातील बिले लवकर हातात पडणे कठीण आहे. त्यामुळे उर्वरित २० टक्के एफआरपी हंगाम संपण्यापूर्वी मिळण्याची शक्यता फारच धूसर आहे. सरकारने कायदा केला आणि त्यांनीच मोडला आहे. न्यायव्यवस्थेकडेच न्याय मागणे एवढेच आमच्या हातात राहिले आहे. ‘एफआरपी’ प्रमाणे पैसे न देता कारखानदारांनी शेतकऱ्यांना हजारो कोटींना लुटले आहे. दुर्दैवाने त्यांना मुख्यमंत्र्यांसह ‘स्वाभिमानी’चे नेते सामील झाले आहेत. हे सगळे मताचे राजकारण असल्याने जोपर्यंत अन्यायाविरोधात जनमत होत नाही, तोपर्यंत अन्याय दूर होणार नाही. - रघुनाथदादा पाटील, नेते, शेतकरी संघटना