शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पोहोच रस्त्याच्या कामाला अखेर झाली सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 00:13 IST

आंदोलनाची गरज नव्हती : शिवसेनेचा टोला

कल्याण : पत्रीपुलाचा गर्डर टाकला असला तरी त्याचा पोहोच (ॲप्रोच) रस्ता रखडला आहे. या रस्त्याचे काम न झाल्यास वाहतूककोंडी सुटणार नाही, याकडे मनसे आमदार राजू पाटील यांनी लक्ष वेधले होते. मात्र, या रस्त्याचे काम मंगळवारी सुरू झाले आहे. दरम्यान, या रस्त्याचे काम होणारच होते, त्यासाठी आंदोलनाची गरज नव्हती, असा टोला शिवसेनेने मनसेला लगावला आहे.

पत्रीपूल ते ठाकुर्ली या रेल्वे मार्गाला समांतर असलेल्या रस्त्याचे काम झाले आहे. मात्र, पत्रीपुलाला जोडणाऱ्या पोहोच रस्त्याचे १०० मीटर काम सहा वर्षांपासून रखडले होते. पत्रीपुलाच्या गर्डर टाकण्याच्या पहिल्याच दिवशी आ. पाटील यांनी या रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी केली होती. यासंदर्भात त्यांनी सोमवारी केडीएमसी आयुक्तांची भेट घेतली. अखेर, या रस्त्याचे काम मंगळवारपासून सुरू  झाले आहे. 

दरम्यान, खासदार  डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पोहोच रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावले जाईल, हे २१ नोव्हेंबरला स्पष्ट केले आहे, अशी माहिती परिवहन समिती सभापती व शिवसेना पदाधिकारी मनोज चौधरी यांनी दिली. तांत्रिक अडचणींमुळे रस्त्याचे काम रखडले होते. हे काम होणारच होते, त्यासाठी मनसेने आंदोलन करण्याची गरज नव्हती. पत्रीपुलाच्या कामाचे श्रेय घेता आले नाही, त्यासाठी मनसेने आंदोलन केले, असा टोला चौधरी यांनी लगावला आहे.

पोहोच रस्त्याचे १०० मीटरचे काम रखडले होते. नगररचना विभागाने रस्त्याच्या कामांसाठी सीमांकन दिले आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी लक्ष घालून तो तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मंगळवारपासून कामाला सुरुवात केली आहे. हा रस्ता पत्रीपुलाला लवकरच जोडला जाईल. - जगदीश कोरे, कार्यकारी अभियंता, केडीएमसी

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली