शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा बांधकामाची माहिती केडीएमसीने न्यायालयास का दिली नाही? बेकायदा बांधकाम प्रकरणीतील याचिकर्त्याचा सवाल

By मुरलीधर भवार | Updated: January 4, 2024 19:11 IST

बेकायदा बांधकाम प्रकरणी उच्च न्यायालयाने केडीएमसी आयुक्तांना न्याालयात हजर होण्याचे आदेश दिले आहे.

कल्याण - बेकायदा बांधकाम प्रकरणी उच्च न्यायालयाने केडीएमसी आयुक्तांना न्याालयात हजर होण्याचे आदेश दिले आहे. या आदेशानंतर बेकायदा बांधकाम प्रकरणातील याचिकाकर्ते कौस्तूभ गोखले यांनी सवाल उपस्थित केला आहे की, बेकायदा बांधकामाची माहिती महापालिकेने न्यायालयास का दिली नाही ? महाालिका झोपली होती का अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

२०२० साली याचिकाकर्ते हरिश्चंद्र म्हात्रे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी उच्च न्यायालयात काल सुनावणी झाली. याचिकाकर्ते म्हात्रे यांनी आठ बेकायदा बांधकाम प्रकरणात याचिका दाखल केली असली तरी न्यायालयास माहिती देताना त्यांनी महापालिका हद्दीत १ लाख ७० हजार बेकायदा बांधकामे असल्याची माहिती दिली आहे. ही माहिती महापालिकेने न्यायालयास देणे अपेक्षित आहे. महापालिकेने ही माहिती दिलेली नाही. ही माहिती महापालिकेने का दिली नाही ? म्हात्रे यांच्या याचिकेपूर्वी महापालिका हद्दीतील बेकादा बांधकाम प्रकरणाची याचिका न्यायप्रविष्ट आहे. या याचिकेचे याचिकाकर्ते गोखले यांच्यासह त्यांचे सहकारी श्रीनिवास घाणेकर आहेत. गोखले आणि घाणेकर यांच्याय याचिकेवरही काही आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर म्हात्रे यांच्या याचिकेवर सुनावणी झाली आहे. या दोन प्रकरणात मागच्या आदेशाला प्रभावीत करणारे आदेश होण्याची शक्यता आहे. याकडे गोखले यांनी लक्ष वेधले आहे. गोखले यांच्या याचिकेनुसार बेकायदा बांधकाम प्रकरणी अग्यार समिती नेमण्यात आली होती. 

अग्यार समितीने दिलेल्या अहवालानुसार महापालिका हद्दीत ६८ हजार बेकायदा बांधकामे होते. अग्यार समितीचा अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्विकारला होता. त्यानुसार महापालिकेने चौकशी करणे अपेक्षित होते. महापालिकेने चाैकशीच केलेली नाही. त्याचबरोबर ड्यू टू लॉ’ प्राेसेसनुसार बेकायदा बांधकामे महापालिकेने घोषितच केलेली नाही. याचिकाकर्ते घाणेकर यांनी सांगितले की, प्रत्येक बेकायदा बांधकाम प्रकरणी प्रभाग अधिकाऱ््यास जबाबदार धरण्यात यावे असे स्पष्ट आदेश होते. ही बाब गोखले यांनी लेखी स्वरुपात वारंवार महापालिकेच्या लक्षात आणून दिली. महापालिकेने कोणतीही कारवाई केली नाही. अग्यार समितीची चौकशी केली नाही. एका सत्यप्रतिज्ञा पत्रानुसार दोषी आढलेल्या ११ सनदी अधिकारी निर्दोष ठरविण्यात धन्यता मानली. या दोन्ही गोष्टी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाशी विसंगत आहेत. एकूणच सरकार आपल्या कर्मचाऱ््यांना आणि महापालिका महापालिकेच्या कर्मचाऱ््यांना वाचवित असल्याचे दिसून येते.

टॅग्स :kalyanकल्याण