शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

खंबाळपाडा कांचनगावची स्मशानभूमी हरवली; ग्रामस्थ तरुणाची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2022 19:22 IST

कल्याण ठाकूर्ली रस्त्यालगत खंबाळपाडा कांचनगावची स्मशानभूमी होती. त्याठिकाणी ग्रामस्था मृतांवर अंत्यसंस्कार करीत होते.

कल्याण-कल्याण-ठाकूर्ली समांतर रस्त्यालगत खंबाळपाडा कांचनगावची स्मशानभूमी होती. ही स्मशानभूमी हरविली असल्याची बाब स्थानिक तरुण वैभव राणे यांनी निदर्शनास आणून दिली आहे. स्मशानभूमी हरविली असल्यास ती कुठे गेली याचा खुलासा महापालिका प्रशासनाकडून करण्यात यावा अन्यथा या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात येणार असल्याचे राणे यांनी सांगितले.

कल्याण ठाकूर्ली रस्त्यालगत खंबाळपाडा कांचनगावची स्मशानभूमी होती. त्याठिकाणी ग्रामस्था मृतांवर अंत्यसंस्कार करीत होते. आत्ता त्याठिकाणी स्मशानभूमीच नसल्याने अंत्यसंस्कार करायचे कुठे असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला आहे. याठिकाणी पूर्वी पासून स्मशानभूमी होती. लोकवस्ती वाढत गेली. त्यामुळे त्याठिकाणी स्मशानभूमीची गरज असताना स्मशानभूमी गायब कुठे करण्यात आली आहे. त्याला जबाबदार कोण आहे हे विविध प्रश्न राणो यांनी उपस्थित केले आहेत. याठिकाणी अनेक बिल्डरांचे नवे प्रकल्प सुरु आहेत. त्यामुळे या प्रकल्पांच्या गर्तेत नागरीकांची स्मशानभूमीच गायब करण्यात आली आहे.

दरम्यान यासंदर्भात महापालिकेच्या नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालक नगररचनाकार डी. सावंत यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, तक्रारदाराची तक्रार आमच्यापर्यंत प्राप्त झालेली नाही. त्याठिकाणच्या जागेच बांधकाम विकासाची परवाग दिली आहे. विकासक एकच असल्याने स्मशानभूमीची जागा बदली करण्यात आली आहे. आयुक्तांच्या अधिकारात हा बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे स्मशान भूमी हरविली नसून तिची जागा बदलली आहे.