शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

खंबाळपाडा कांचनगावची स्मशानभूमी हरवली; ग्रामस्थ तरुणाची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2022 19:22 IST

कल्याण ठाकूर्ली रस्त्यालगत खंबाळपाडा कांचनगावची स्मशानभूमी होती. त्याठिकाणी ग्रामस्था मृतांवर अंत्यसंस्कार करीत होते.

कल्याण-कल्याण-ठाकूर्ली समांतर रस्त्यालगत खंबाळपाडा कांचनगावची स्मशानभूमी होती. ही स्मशानभूमी हरविली असल्याची बाब स्थानिक तरुण वैभव राणे यांनी निदर्शनास आणून दिली आहे. स्मशानभूमी हरविली असल्यास ती कुठे गेली याचा खुलासा महापालिका प्रशासनाकडून करण्यात यावा अन्यथा या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात येणार असल्याचे राणे यांनी सांगितले.

कल्याण ठाकूर्ली रस्त्यालगत खंबाळपाडा कांचनगावची स्मशानभूमी होती. त्याठिकाणी ग्रामस्था मृतांवर अंत्यसंस्कार करीत होते. आत्ता त्याठिकाणी स्मशानभूमीच नसल्याने अंत्यसंस्कार करायचे कुठे असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला आहे. याठिकाणी पूर्वी पासून स्मशानभूमी होती. लोकवस्ती वाढत गेली. त्यामुळे त्याठिकाणी स्मशानभूमीची गरज असताना स्मशानभूमी गायब कुठे करण्यात आली आहे. त्याला जबाबदार कोण आहे हे विविध प्रश्न राणो यांनी उपस्थित केले आहेत. याठिकाणी अनेक बिल्डरांचे नवे प्रकल्प सुरु आहेत. त्यामुळे या प्रकल्पांच्या गर्तेत नागरीकांची स्मशानभूमीच गायब करण्यात आली आहे.

दरम्यान यासंदर्भात महापालिकेच्या नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालक नगररचनाकार डी. सावंत यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, तक्रारदाराची तक्रार आमच्यापर्यंत प्राप्त झालेली नाही. त्याठिकाणच्या जागेच बांधकाम विकासाची परवाग दिली आहे. विकासक एकच असल्याने स्मशानभूमीची जागा बदली करण्यात आली आहे. आयुक्तांच्या अधिकारात हा बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे स्मशान भूमी हरविली नसून तिची जागा बदलली आहे.