शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

खंबाळपाडा कांचनगावची स्मशानभूमी हरवली; ग्रामस्थ तरुणाची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2022 19:22 IST

कल्याण ठाकूर्ली रस्त्यालगत खंबाळपाडा कांचनगावची स्मशानभूमी होती. त्याठिकाणी ग्रामस्था मृतांवर अंत्यसंस्कार करीत होते.

कल्याण-कल्याण-ठाकूर्ली समांतर रस्त्यालगत खंबाळपाडा कांचनगावची स्मशानभूमी होती. ही स्मशानभूमी हरविली असल्याची बाब स्थानिक तरुण वैभव राणे यांनी निदर्शनास आणून दिली आहे. स्मशानभूमी हरविली असल्यास ती कुठे गेली याचा खुलासा महापालिका प्रशासनाकडून करण्यात यावा अन्यथा या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात येणार असल्याचे राणे यांनी सांगितले.

कल्याण ठाकूर्ली रस्त्यालगत खंबाळपाडा कांचनगावची स्मशानभूमी होती. त्याठिकाणी ग्रामस्था मृतांवर अंत्यसंस्कार करीत होते. आत्ता त्याठिकाणी स्मशानभूमीच नसल्याने अंत्यसंस्कार करायचे कुठे असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला आहे. याठिकाणी पूर्वी पासून स्मशानभूमी होती. लोकवस्ती वाढत गेली. त्यामुळे त्याठिकाणी स्मशानभूमीची गरज असताना स्मशानभूमी गायब कुठे करण्यात आली आहे. त्याला जबाबदार कोण आहे हे विविध प्रश्न राणो यांनी उपस्थित केले आहेत. याठिकाणी अनेक बिल्डरांचे नवे प्रकल्प सुरु आहेत. त्यामुळे या प्रकल्पांच्या गर्तेत नागरीकांची स्मशानभूमीच गायब करण्यात आली आहे.

दरम्यान यासंदर्भात महापालिकेच्या नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालक नगररचनाकार डी. सावंत यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, तक्रारदाराची तक्रार आमच्यापर्यंत प्राप्त झालेली नाही. त्याठिकाणच्या जागेच बांधकाम विकासाची परवाग दिली आहे. विकासक एकच असल्याने स्मशानभूमीची जागा बदली करण्यात आली आहे. आयुक्तांच्या अधिकारात हा बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे स्मशान भूमी हरविली नसून तिची जागा बदलली आहे.