शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

रुग्णालय कसले, हे तर प्राथमिक उपचार केंद्र; गंभीर रुग्णांची धाव ठाणे, मुंबईकडे

By प्रशांत माने | Updated: August 16, 2023 11:14 IST

या रुग्णालयाची अवस्था  प्राथमिक उपचार केंद्रासारखी आहे.

प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली :  केडीएमसीचे डोंबिवलीत शास्त्रीनगर रुग्णालय आहे. मात्र तज्ज्ञ डॉक्टर आणि पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी गंभीर स्वरूपातील रुग्णांना ठाणे आणि मुंबईतील रुग्णालयांची वाट धरावी लागते. रुग्णालयामध्ये मुबलक प्रमाणात औषधांचा साठा असल्याचा दावा केला जातो. मात्र गंभीर अवस्थेतील रुग्णावर उपचारच होत नसतील, तर त्याचा उपयोग काय, असा सवाल रुग्णांचे नातेवाइक करत आहेत. या रुग्णालयाची अवस्था  प्राथमिक उपचार केंद्रासारखी आहे.

शास्त्रीनगर रुग्णालयाचा मंगळवारी आढावा घेतला. येथील बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी) उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसली, परंतु स्वातंत्र्य दिनाची सुट्टी असल्याने तो विभाग बंद होता. त्वचारोग, जनरल विभाग, डोळे तपासणी, अस्थिरोग, नाक-कान-घसा आणि दंत उपचार, ताप रुग्ण तपासणी विभाग, रक्तपेढी विभाग एरवी सुरू असले, तरी मंगळवारी ओपीडीसह तेदेखील बंद होते. डेंग्यूच्या रुग्णाला रक्तातील प्लेटलेट्स कमी झाल्याने रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागल्याचे दिसले.

रुग्णालयात अतिदक्षता (आयसीयू) विभाग आहे, पण बंद आहे. बर्न विभाग नसल्याने भाजलेल्या रुग्णांना येथे दाखल करून घेतले जात नाही. रुग्णालयात प्रसूती विभाग आहे, पण नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) पूर्ण तयार होऊनही तो बालरोग तज्ज्ञाअभावी बंद आहे. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

खासगी रुग्णालयांचा आसरा

एरवी रुग्ण गंभीर झाल्यावर त्याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयासह केईएम, लोकमान्य टिळक रुग्णालय (शीव, मुंबई) या ठिकाणच्या सरकारी रुग्णालयांमध्ये पाठविले जायचे. परंतु कळवा येथील रुग्णालयामध्ये सध्या ओढावलेली परिस्थिती पाहता इथले गंभीर रुग्ण सध्या सायन अथवा केईएम रुग्णालयात पाठवले जात आहेत.

 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीhospitalहॉस्पिटल