शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
4
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
5
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
6
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
7
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
8
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
9
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
10
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
11
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
12
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
13
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
14
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
15
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
16
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
17
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
18
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
19
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
20
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल

शहरातील अन्यत्र सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 00:26 IST

गल्लोगल्लीच्या दादा, भाईंना आवर काेण घालणार : कारवाईत सातत्य राखणे गरजेचे

- अनिकेत घमंडीडोंबिवली : कल्याण - डोंबिवली शहरांत राजरोस बेकायदा बांधकामे फोफावली आहेत. दत्तनगर येथील सरकारी जागेवर असलेल्या एका बेकायदा बांधकामावर सुरू असलेल्या कारवाईला परिसरातील काही गुंड लोकांनी विरोध केला. थेट पालिकेच्या पोकलेनची हवा काढून अधिकाऱ्यांना शिवीगाळ करण्यापर्यंत मजल गेली. गल्लोगल्लीतल्या या दादा, भाईंच्या गुंडप्रवृत्तीवर महापालिका कशी अंकुश मिळवणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.शहरात गोग्रासवाडी परिसरात अंबिकानगरमध्ये आणि दत्तनगर भागात अन्यत्रही बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. काही ठिकाणी नागरिक राहायलाही गेले आहेत. त्यामुळे आता कारवाई होणार की नाही, हे गुलदस्त्यात आहे. पश्चिमेलाही शाळेसाठी आरक्षित जागेवर बेकायदा बांधकाम झाले होते. त्यावर तत्कालीन प्रभागक्षेत्र अधिकारी भारत पवार यांनी कारवाई केली होती. पण, ती इमारत पूर्ण जमीनदोस्त करावी, अशी मागणी दक्ष नागरिकांनी केली होती. अधिवेशन काळात पालिकेने सगळ्या प्रभागांत अशा बांधकामांवर कारवाई करण्यासाठी कंबर कसली होती. पण, पुन्हा ती कारवाई थंडावली. २७ गावांतही अशी बांधकामे उभी राहात आहेत. तत्कालीन आयुक्त ई. रवींद्रन यांनी काढलेल्या आदेशानंतर कारवाई कागदावरच राहिली. वर्षभरात सर्वत्र अगदी हाताच्या बाेटांवर मोजता येतील, एवढ्याच कारवाया झाल्या आहेत. त्या तुलनेत अशा बांधकामांचे मजलेच्या मजले उभे राहात असल्याने कारवाईचे प्रमाण अल्प असल्याचे दिसून येते.महापालिकेच्या १५ ते २० वर्षांत पहिल्यांदा दत्तनगर येथील बेकायदा बांधकाम हे रात्रभर कारवाई करून २२ तासानंतर जमीनदोस्त करण्यात आले. याबद्दल कारवाईतील सर्व अधिकाऱ्यांचे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या भूमिकेबद्दल समाधान, कौतुक व्यक्त होत आहे. अशा कारवाया सातत्याने होत राहाणे गरजेचे असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले.अग्यार समितीने अधोरेखित केलेली ३७ हजार ९२० बांधकामे, तत्कालीन आयुक्त ई रवींद्रन यांनी सांगितलेली २७ गावांतील ७९ हजारांहून अधिक बांधकामे, त्यानंतरची सुमारे एक लाख अशी एकंदरीत दोन लाखांहून अधिक बांधकामे या महापालिका हद्दीत उभी आहेत. या सगळ्या प्रकरणांचे काय करणार? एक ते दोन कारवाया करून काहीही होत नाही. खूप मोठा भ्रष्टाचार झाला असून राजरोस बांधकामे उभी राहात आहेत. खरेतर, ज्या प्रभागात अशी कामे होतात तेथील नगरसेवक, पोलीस अधिकारी आणि प्रभाग क्षेत्र अधिकारी हे सगळे त्या कामांना जबाबदार धरले पाहिजेत; पण तसे होत नाही ही या शहरांची शोकांतिका आहे.    - कौस्तुभ गोखले, माहिती     अधिकार कार्यकर्ते

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका