शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

डोंबिवलीतील राजूनगर आणि गरिबाचा वाडा परिसरात पाणी टंचाई

By मुरलीधर भवार | Updated: October 10, 2023 13:56 IST

राजूनगर आणि गरीबाचा वाडा या परिसरातील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे.

कल्याण- डोंबिवली पश्चिमेतील राजूनगर आणि गरीबाचा वाडा परिसरात पाणी टंचाईचा सामना नागरीक करीत आहे. गेल्या सात वर्षापासून पाण्याची समस्या नागरीकांना भेडसावत आहे. त्याठिकाणीचे पाणी पुरवठा अभियंते केवळ आश्वासन देतात. पाणी मिळत नाही. पाण्याचा टँकर ही पुरविला जात नाही. नागरीकांना पाणी मिळाले नाही तर महापालिका मुख्यालयात ठिय्या आंदाेलन करण्याचा इशारा माजी स्थायी समिती सभापती आणि भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी दिला आहे.

भाजपचे माजी नगरसेवक म्हात्रे यांनी आज महापालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेतली. राजूनगर आणि गरीबाचा वाडा या परिसरातील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. या समस्येबाबत वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. तसेच पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता अनिरुद्ध सराफ यांच्याकडे मागणी केली आहे. गेल्या सात वर्षापासून नागरीकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ही समस्या सोडविण्याकरीता प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्याला अभियंते सराफ हे जबाबदार आहे. '

नागरिकाची पाणी समस्या सोेडविण्यास असमर्थ असलेल्या सराफ यांची बदली करण्यात यावी. महापालिका हद्दीतील ज्या प्रभागा पाणी टंचाई असते. त्याठिकाणी महापालिका पाण्याचा टँकर मोफत पुरविते. राजूनगर आणि गरीबाचा वाडा या परिसरात पाणी टंचाई असता महापालिकेकडून पाण्याचा टँकर पुरविला जात नाही. या ठिकाणच्या नागरीकांना खाजगी टँकर चालकाकडून १५०० रुपये खर्च करुन टँकर खरेदी करावा लागत आहे. नळाला पाणी येत नसले तरी त्याचेही सरासरी बिल नागरीकांना भरावे लागत आहे. खाजगी टँकर चालकाकडून पाणी घेण्यास एका महिन्याला ४५ हजार रुपये खर्च येत आहे.

राजूनगर आणि गरीबाचा वाडा या परिसरात नागरी वस्ती वाढत आहे. नव्या नागरी वस्तीकरीता पाणी पुरवठ्याची सहा कनेक्शन देणे आवश्यक असताना त्याठिकाणी अभियंते सराफ यांच्याकडून केवळ दोन ते तीन कनेक्शनच दिली जात आहे. आहे त्या नागरी वस्तीला पाणी पुरवठा मिळत नाही. तसेच नव्याने झालेल्या नागरी वस्तीलाही पाणी मिळत नाही. पाणी समस्या सोडविली नाही तर महापालिका मुख्यालयात नागरीकांच्या समवेत ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा म्हात्रे यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.

टॅग्स :kalyanकल्याण