शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

डोंबिवलीतील राजूनगर आणि गरिबाचा वाडा परिसरात पाणी टंचाई

By मुरलीधर भवार | Updated: October 10, 2023 13:56 IST

राजूनगर आणि गरीबाचा वाडा या परिसरातील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे.

कल्याण- डोंबिवली पश्चिमेतील राजूनगर आणि गरीबाचा वाडा परिसरात पाणी टंचाईचा सामना नागरीक करीत आहे. गेल्या सात वर्षापासून पाण्याची समस्या नागरीकांना भेडसावत आहे. त्याठिकाणीचे पाणी पुरवठा अभियंते केवळ आश्वासन देतात. पाणी मिळत नाही. पाण्याचा टँकर ही पुरविला जात नाही. नागरीकांना पाणी मिळाले नाही तर महापालिका मुख्यालयात ठिय्या आंदाेलन करण्याचा इशारा माजी स्थायी समिती सभापती आणि भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी दिला आहे.

भाजपचे माजी नगरसेवक म्हात्रे यांनी आज महापालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेतली. राजूनगर आणि गरीबाचा वाडा या परिसरातील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. या समस्येबाबत वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. तसेच पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता अनिरुद्ध सराफ यांच्याकडे मागणी केली आहे. गेल्या सात वर्षापासून नागरीकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ही समस्या सोडविण्याकरीता प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्याला अभियंते सराफ हे जबाबदार आहे. '

नागरिकाची पाणी समस्या सोेडविण्यास असमर्थ असलेल्या सराफ यांची बदली करण्यात यावी. महापालिका हद्दीतील ज्या प्रभागा पाणी टंचाई असते. त्याठिकाणी महापालिका पाण्याचा टँकर मोफत पुरविते. राजूनगर आणि गरीबाचा वाडा या परिसरात पाणी टंचाई असता महापालिकेकडून पाण्याचा टँकर पुरविला जात नाही. या ठिकाणच्या नागरीकांना खाजगी टँकर चालकाकडून १५०० रुपये खर्च करुन टँकर खरेदी करावा लागत आहे. नळाला पाणी येत नसले तरी त्याचेही सरासरी बिल नागरीकांना भरावे लागत आहे. खाजगी टँकर चालकाकडून पाणी घेण्यास एका महिन्याला ४५ हजार रुपये खर्च येत आहे.

राजूनगर आणि गरीबाचा वाडा या परिसरात नागरी वस्ती वाढत आहे. नव्या नागरी वस्तीकरीता पाणी पुरवठ्याची सहा कनेक्शन देणे आवश्यक असताना त्याठिकाणी अभियंते सराफ यांच्याकडून केवळ दोन ते तीन कनेक्शनच दिली जात आहे. आहे त्या नागरी वस्तीला पाणी पुरवठा मिळत नाही. तसेच नव्याने झालेल्या नागरी वस्तीलाही पाणी मिळत नाही. पाणी समस्या सोडविली नाही तर महापालिका मुख्यालयात नागरीकांच्या समवेत ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा म्हात्रे यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.

टॅग्स :kalyanकल्याण