शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

नळाला पाणी येत नाही, आले तर तेही दूषित; शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीने विचारला प्रशासनाला जाब

By मुरलीधर भवार | Updated: October 11, 2023 16:28 IST

शहराच्या पश्चिमेतील ठाणकरपाडा, बेतूरकरपाडा, मनिषानगर, दुर्गानगर, साईनगर या भागात पाणी टंचाई आहे. लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही.

कल्याण : शहराच्याच्या पश्चिम भागात पाणी पुरवठा सुरळीत केला जात नाही. नळाला पाणी येत नाही. जे पाणी येते तेही दूषित असते. तरी देखील प्रशासनाकडून नागरीकांना पाण्याची बिले कशी काय पाठविली जातात. आधी शुद्ध पाणी पुरवठा करा मगच नागरीकांकडून पाणी बिलाची वसूली केली. येत्या सात दिवसात पाणी पुरवठा सुरळित झाला नाही तर महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनासमोरच ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना शिंदे गटाच्या महिला संघटक नेत्रा उगले यांनी दिला आहे.शहराच्या पश्चिमेतील ठाणकरपाडा, बेतूरकरपाडा, मनिषानगर, दुर्गानगर, साईनगर या भागात पाणी टंचाई आहे. लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. नळाद्वारे येणारे पाणी दूषित असते. या पूर्वीही शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक माेहन उगले यानी वारंवार प्रशासाकडे पाठपुरवा केला आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंते प्रमोद मोरे यांच्या दालनात जाऊन पाणी प्रश्न का सूटत नाही. याचा जाब विचारला होता. मात्र प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. काही दिवसापूर्वी अभियंता मोरे यांना दालनात प्रवेश करण्यापासून उगले यांनी रोखले होते. याच प्रश्नावर स्वत: उगले हे आंदोलन करणार होते. मात्र त्याची प्रकृती ठिक नसल्याने शिवसेना महिला संघटक नेत्रा उगले यांनी महिलांसोबत अभियंते मोरे यांचे दालन आज गाठले. त्यांना पाणी पुरवठा सुरळित करण्याविषयी जाब विचारला. येत्या सात दिवसात पाणी पुरवठा सुरळित झाला नाही तर आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी माजी नगरसेवक उगले हे रुग्णालयात दाखल असल्याने त्यांनी व्हीडीओ कॉलद्वारे अभियंते मोरे यांच्याशी संपर्क साधला. नागरीकांच्या पाण्याची समस्या सोडविण्याची मागणी केली.दरम्यान कालच डोंबिवलीतील राजूनगर आणि गरीबाचा वाडा येथील नागरीकांना पाण्याची समस्या भेडसावत असल्याने भाजप माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेऊन पाणी समस्या सात दिवसात सुटली नाही तर ठिय्या आंदोलनाचा इशारा प्रशासनाला दिला आहे. त्या पाठोपाठ आत्ता शिवसेना शिंदे गटाने सात दिवसाचा अल्टीमेट प्रशासनाला दिला आहे. यंदा बारवी धरणात पुरेसा पाणी साठा आहे. पाणी साठा पुरेसा असताना नागरीकांना पाण्याची समस्या का भेडसावत आहे असा संतप्त सवाल भाजप आणि शिवेसना शिंदे गटाकडून उपस्थित केला जात आहे.