शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

नळाला पाणी येत नाही, आले तर तेही दूषित; शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीने विचारला प्रशासनाला जाब

By मुरलीधर भवार | Updated: October 11, 2023 16:28 IST

शहराच्या पश्चिमेतील ठाणकरपाडा, बेतूरकरपाडा, मनिषानगर, दुर्गानगर, साईनगर या भागात पाणी टंचाई आहे. लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही.

कल्याण : शहराच्याच्या पश्चिम भागात पाणी पुरवठा सुरळीत केला जात नाही. नळाला पाणी येत नाही. जे पाणी येते तेही दूषित असते. तरी देखील प्रशासनाकडून नागरीकांना पाण्याची बिले कशी काय पाठविली जातात. आधी शुद्ध पाणी पुरवठा करा मगच नागरीकांकडून पाणी बिलाची वसूली केली. येत्या सात दिवसात पाणी पुरवठा सुरळित झाला नाही तर महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनासमोरच ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना शिंदे गटाच्या महिला संघटक नेत्रा उगले यांनी दिला आहे.शहराच्या पश्चिमेतील ठाणकरपाडा, बेतूरकरपाडा, मनिषानगर, दुर्गानगर, साईनगर या भागात पाणी टंचाई आहे. लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. नळाद्वारे येणारे पाणी दूषित असते. या पूर्वीही शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक माेहन उगले यानी वारंवार प्रशासाकडे पाठपुरवा केला आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंते प्रमोद मोरे यांच्या दालनात जाऊन पाणी प्रश्न का सूटत नाही. याचा जाब विचारला होता. मात्र प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. काही दिवसापूर्वी अभियंता मोरे यांना दालनात प्रवेश करण्यापासून उगले यांनी रोखले होते. याच प्रश्नावर स्वत: उगले हे आंदोलन करणार होते. मात्र त्याची प्रकृती ठिक नसल्याने शिवसेना महिला संघटक नेत्रा उगले यांनी महिलांसोबत अभियंते मोरे यांचे दालन आज गाठले. त्यांना पाणी पुरवठा सुरळित करण्याविषयी जाब विचारला. येत्या सात दिवसात पाणी पुरवठा सुरळित झाला नाही तर आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी माजी नगरसेवक उगले हे रुग्णालयात दाखल असल्याने त्यांनी व्हीडीओ कॉलद्वारे अभियंते मोरे यांच्याशी संपर्क साधला. नागरीकांच्या पाण्याची समस्या सोडविण्याची मागणी केली.दरम्यान कालच डोंबिवलीतील राजूनगर आणि गरीबाचा वाडा येथील नागरीकांना पाण्याची समस्या भेडसावत असल्याने भाजप माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेऊन पाणी समस्या सात दिवसात सुटली नाही तर ठिय्या आंदोलनाचा इशारा प्रशासनाला दिला आहे. त्या पाठोपाठ आत्ता शिवसेना शिंदे गटाने सात दिवसाचा अल्टीमेट प्रशासनाला दिला आहे. यंदा बारवी धरणात पुरेसा पाणी साठा आहे. पाणी साठा पुरेसा असताना नागरीकांना पाण्याची समस्या का भेडसावत आहे असा संतप्त सवाल भाजप आणि शिवेसना शिंदे गटाकडून उपस्थित केला जात आहे.