शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

नळाला पाणी येत नाही, आले तर तेही दूषित; शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीने विचारला प्रशासनाला जाब

By मुरलीधर भवार | Updated: October 11, 2023 16:28 IST

शहराच्या पश्चिमेतील ठाणकरपाडा, बेतूरकरपाडा, मनिषानगर, दुर्गानगर, साईनगर या भागात पाणी टंचाई आहे. लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही.

कल्याण : शहराच्याच्या पश्चिम भागात पाणी पुरवठा सुरळीत केला जात नाही. नळाला पाणी येत नाही. जे पाणी येते तेही दूषित असते. तरी देखील प्रशासनाकडून नागरीकांना पाण्याची बिले कशी काय पाठविली जातात. आधी शुद्ध पाणी पुरवठा करा मगच नागरीकांकडून पाणी बिलाची वसूली केली. येत्या सात दिवसात पाणी पुरवठा सुरळित झाला नाही तर महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनासमोरच ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना शिंदे गटाच्या महिला संघटक नेत्रा उगले यांनी दिला आहे.शहराच्या पश्चिमेतील ठाणकरपाडा, बेतूरकरपाडा, मनिषानगर, दुर्गानगर, साईनगर या भागात पाणी टंचाई आहे. लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. नळाद्वारे येणारे पाणी दूषित असते. या पूर्वीही शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक माेहन उगले यानी वारंवार प्रशासाकडे पाठपुरवा केला आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंते प्रमोद मोरे यांच्या दालनात जाऊन पाणी प्रश्न का सूटत नाही. याचा जाब विचारला होता. मात्र प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. काही दिवसापूर्वी अभियंता मोरे यांना दालनात प्रवेश करण्यापासून उगले यांनी रोखले होते. याच प्रश्नावर स्वत: उगले हे आंदोलन करणार होते. मात्र त्याची प्रकृती ठिक नसल्याने शिवसेना महिला संघटक नेत्रा उगले यांनी महिलांसोबत अभियंते मोरे यांचे दालन आज गाठले. त्यांना पाणी पुरवठा सुरळित करण्याविषयी जाब विचारला. येत्या सात दिवसात पाणी पुरवठा सुरळित झाला नाही तर आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी माजी नगरसेवक उगले हे रुग्णालयात दाखल असल्याने त्यांनी व्हीडीओ कॉलद्वारे अभियंते मोरे यांच्याशी संपर्क साधला. नागरीकांच्या पाण्याची समस्या सोडविण्याची मागणी केली.दरम्यान कालच डोंबिवलीतील राजूनगर आणि गरीबाचा वाडा येथील नागरीकांना पाण्याची समस्या भेडसावत असल्याने भाजप माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेऊन पाणी समस्या सात दिवसात सुटली नाही तर ठिय्या आंदोलनाचा इशारा प्रशासनाला दिला आहे. त्या पाठोपाठ आत्ता शिवसेना शिंदे गटाने सात दिवसाचा अल्टीमेट प्रशासनाला दिला आहे. यंदा बारवी धरणात पुरेसा पाणी साठा आहे. पाणी साठा पुरेसा असताना नागरीकांना पाण्याची समस्या का भेडसावत आहे असा संतप्त सवाल भाजप आणि शिवेसना शिंदे गटाकडून उपस्थित केला जात आहे.