शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

उल्हासनगरात कचऱ्याचे विलगीकरण कचरावेचक महिलांच्या जिवावर

By सदानंद नाईक | Updated: April 26, 2025 18:16 IST

आरोग्य सुरक्षा साहित्याशिवाय काम

उल्हासनगर : सुका व ओला कचऱ्याचे विलगीकरणाचे काम हिराघाट बोट क्लब येथील आरआरआर केंद्रात चालते. कचरा वेगळा करणाऱ्या कचरावेचक महिलांना मास्क, हॅन्डग्लोज, गमबूट आदी सुरक्षेचे साहित्य दिले जात नसल्याने, महिलेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

उल्हासनगर महापालिका आयुक्त पदी मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती झाल्यावर, शहराचे रुपडे बदलत आहे. त्यांनी राबविलेल्या डीप स्वच्छता मोहीमेमुळे शहर स्वच्छ व सुंदरतेकडे वाटचाल करीत आहे. मात्र दुसरीकडे विकासाच्या नावाखाली नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. डम्पिंगवर जाणाऱ्या कचऱ्यात घट होण्यासाठी ओला व सुका कचऱ्याचे विलगीकरण करण्याचे केंद्र हिराघाट बोट क्लब येथे चालते. येथे येणाऱ्या कचऱ्याचे विलगीकरण करून, ओला कचरा जसे भाजीपाला, फुल, झाडाचे पत्ते आदी सिमेंट कुंड्यात टाकून त्याचे ग्रीन खत बनविले जाते. तर सुका कचऱ्यातून प्लास्टिक पिशव्या, कागद, कापड्याच्या चिंद्या, पुष्टे, काच व दगड-माती वेगळी केली जाते. यापैकी काही वस्तूचा पुन्हा वापर केला जातो.

हिराघाट येथील आरआरआर केंद्रात कचरा विलगीकरण करणाऱ्या बहुतांश महिला कचरावेचक असून त्यांना ठेकेदारा मार्फत दरदिवशीं ४०० रुपये मजुरी दिली जाते. असे त्यांचे म्हणणे आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजे पर्यंत त्यांच्याकडून काम करून घेतले जाते. दुघंधीयुक्त कचाऱ्यांचे काम करणाऱ्या या कचरावेचक महिलांना सुरक्षेतेचे कोणतेही साहित्य दिले जात नाही. मास्क, हॅन्डग्लोज, गमबूट, स्वच्छ पाणी, फॅन, सावली शिवाय उन्हात काम करतात. याबाबतची कल्पना महापालिका स्वच्छता निरीक्षक, अधिकारी, आयुक्त यांना नसावी, असे दिसते. शहर स्वच्छतेसाठी स्वतःचा जीव अवघ्या ४०० रुपयासाठी धोक्यात घालत आहेत. महापालिका आयुक्तानी याबाबत चौकशी करून, सबंधित अधिकारी व ठेकेदार यावर कारवाईची मागणी होत आहे.

हिराघाट बिट क्लब येथे कचऱ्याचे विलगीकरण करण्याचे काम एका खाजगी ठेकेदाराला दिले आहे. ठेकेदार कचरावेचक महिलाकडून कचरा विलगीकरणाचे काम करून घेतो. मास्क, हॅन्डगोल्स आदी सुरक्षेचे साहित्य पुरविले जात असून महिला त्याचा वापर करतात का नाही. याबाबत माहिती घेतो - मनिष हिवरे (सार्वजनिक आरोग्य अधिकारी उल्हासनगर महापालिका )

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर