शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

डोंबिवलीतील नागरिकांची वाट बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 23:53 IST

रस्त्यांची झाली दुरवस्था : खड्ड्यांमुळे अचानक मारावा लागताे ब्रेक

ठळक मुद्देपावसाळा आणि रस्त्यातील खड्डे हे समीकरण दरवर्षी पावसाळ्यात अनुभवायला मिळते. दिवाळीपूर्वी खड्डे बुजवले जातील, असा दावा केडीएमसीच्या वतीने करण्यात आला होता.

डाेंबिवली :  एकीकडे पावसाळ्यात निर्माण झालेले रस्त्यांतील खड्डे बहुतांश ठिकाणी कायम राहिले आहेत. सुस्थितीतील महत्त्वाचे रस्तेही धड राहिलेले नाहीत. या रस्त्यांंवरून जाणाऱ्या वाहनांना अचानक खड्ड्यांचा सामना करावा लागत असल्याने खड्डे वाचवण्याच्या नादात अपघात होण्याची शक्यता व्यक्त हाेत आहे.

पावसाळा आणि रस्त्यातील खड्डे हे समीकरण दरवर्षी पावसाळ्यात अनुभवायला मिळते. दिवाळीपूर्वी खड्डे बुजवले जातील, असा दावा केडीएमसीच्या वतीने करण्यात आला होता. आजही काही ठिकाणी रस्त्यांची खड्ड्यांनी चाळण केल्याचे पाहायला मिळत आहे. भुयारी गटार योजना तसेच अन्य प्राधिकरणांच्या वाहिन्या टाकताना खोदलेल्या रस्त्यांनी ठाकुर्लीतील रेल्वे समांतर आणि ९० फुटी रस्त्याची वाताहत झाली आहे. चांगले सुस्थितीतील रस्तेही वाहन चालविण्यास धड राहिलेले नाहीत. पेंढरकर महाविद्यालयासमोरील रस्ता असो अथवा खंबाळपाडा परिसरातील न्यू कल्याण रोडची अवस्था पाहता याची प्रचीती येते. खंबाळपाडा परिसरातील अंतर्गत रस्त्यांचीही दयनीय अवस्था झाली आहे. 

ड्रेनेजच्या झाकणांभाेवती खड्डेघरडा सर्कल ते बंदीश पॅलेस यादरम्यानच्या रस्त्यावर टाकण्यात आलेल्या ड्रेनेजच्या झाकणांच्या भोवताली खड्डे पडले असून काही झाकणे रस्ता खचल्याने बाहेर आली आहेत. यात रस्त्यांची पातळी समप्रमाणात राहिलेली नाही. दोन वर्षांपूर्वी कल्याणमध्ये रस्ता समप्रमाणात नसल्याने दोघांचा बळी गेल्याची घटना घडली होती. आता डोंबिवलीतील रस्त्यांचीही तीच अवस्था असून एखादा बळी गेल्यानंतरच संबंधित यंत्रणेला जाग येणार का, असा सवाल केला जात आहे.  

मोठमोठी संकुले आणि टूमदार बंगले उभे राहिलेल्या या भागातील दुरवस्थेच्या गर्तेत सापडलेले रस्ते पाहता त्यापेक्षा ग्रामीण भागातील रस्ते बरे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. सावित्रीबाई फुले कलामंदिरासमोरील रस्त्यावर महाकाय खड्डे पडले आहेत. त्याठिकाणी स्ट्रीट लाइटही बंद असल्याने अपघाताचा धोका पाहता रात्री जीव मुठीत घेऊनच वाहनचालकांना या मार्गावरून जावे लागत आहे. त्यामुळे शहरातील हे रस्ते केव्हा सुस्थितीत येणार, अशी विचारणा चालक करत आहेत.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली