शहरं
Join us  
Trending Stories
1
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
3
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
4
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
5
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
6
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
7
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
8
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
9
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
10
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
11
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
12
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
13
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
14
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
15
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
16
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
17
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
18
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
19
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
20
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?

जनमित्रांच्या अथक परिश्रमातून पालघरमध्ये मतदान प्रक्रिया झाली सुकर; युद्धस्तरावर दुरुस्ती करून वीजपुरवठा 

By अनिकेत घमंडी | Updated: May 21, 2024 17:29 IST

गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाचा महावितरणच्या कल्याण परिमंडळाला मोठा फटका बसला.

अनिकेत घमंडी, डोंबिवली: गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाचा महावितरणच्या कल्याण परिमंडळाला मोठा फटका बसला. २ रोहित्र, १९० उच्चदाब आणि २७३ लघुदाब वीजवाहिनीचे खांब या वादळी वाऱ्यामुळे जमिनदोस्त झाले. सोमवारी मतदानाच्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या जनमित्रांनी अविरत परिश्रमाद्वारे सर्वच मतदान केंद्रावरील वीजपुरवठा सुरळीत केला. परिणामी संबंधित मतदान केंद्रावरील विशेषत: पालघर जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुलभ झाली.

पालघरमध्ये १५ आणि १६ मे रोजी झालेल्या वादळी पावसामुळे २२ केव्ही उच्चवाहिनीचे ८९ खांब पडले. यात एकट्या मोखाडा शाखेतील ८३ तर खोडाळा शाखेतील ६ खांबांचा समावेश होता. त्यामुळे खोच, पळसपाडा, घानवळ, नांदगाव, शिवली, झाप, पवारपाडा, चप्पलपाडा, सावर्डे या गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला. मुख्य अभियंता धनंजय औंढेकर आणि अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता सुनिल भारंबे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितिन संखे, उपकार्यकारी अभियंता राजेश शिवगण, शाखा अभियंता निखिल बनसोडे, किरण थाटे आणि जनमित्रांच्या टिमने कंत्राटदारांच्या कामगारांच्या मदतीने २२ केव्ही खोडाळा, २२ केव्ही खर्डी, २२ केव्ही मोखाडा फिडरवरील सर्व मतदान केंद्रांचा वीजपुरवठा सुरळीत केला.

दुर्गम व डोंगराळ भाग असल्याने प्रसंगी ६०० मीटरपर्यंत खांद्यावर खांब वाहून जलदगतीने काम पूर्ण करण्यात आले. परिणामी सोमवारी संबंधित मतदान केंद्रांवरील मतदानाची प्रक्रिया सुलभपणे पार पाडण्यात मदत झाली. मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी या कामगिरीबद्दल कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

टॅग्स :palgharपालघरelectricityवीजmahavitaranमहावितरण