शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

केंद्र व राज्य सरकारमुळे नागरिकांची दिवाळी आनंदाची – केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

By सचिन सागरे | Updated: November 5, 2023 17:24 IST

कल्याणमध्ये कपिल पाटील यांच्या हस्ते स्वस्त दरात चणाडाळीचे वितरण

सचिन सागरे

कल्याण : भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभाग आणि महाराष्ट्र फेडरेशनच्या वतीने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ६० रुपये किलो दराने भारत डाळच्या नावाने चणाडाळ विक्रिचा  उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कल्याणमध्ये देखील भारतीय जनता पार्टीचे कल्याण पश्चिम मंडळ अध्यक्ष वरुण पाटील यांच्यावतीने पश्चिमेतील पारनाका आणि साई चौक याठिकाणी या उपक्रमाचे आयोजन केले असून केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याहस्ते या केंद्राचे उद्घाटन करत नागरिकांना स्वस्त दरात डाळ वितरित करण्यात आली. यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, कल्याण पश्चिम मंडळ अध्यक्ष वरुण पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रेमनाथ म्हात्रे, अर्जुन म्हात्रे, अर्जुन भोईर, भगवान म्हात्रे, सुधीर वायले, शत्रुघ्न भोईर, माजी नगरसेवक दया गायकवाड, सुहास चौधरी, रोहिदास गायकर, अजय पवार आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून अल्प दरात चणाडाळ उपलब्ध करण्याचा संकल्प केला आणि त्याचे वाटप याठिकाणी सुरू झाले आहे. २०१४ साली प्रधानमंत्र्यांनी पहिल्यांदा शपथ घेतली तेव्हा त्यांनी गरिबांच्या प्रती आपले सरकार समर्पित असून आपण प्रधानमंत्री नसून प्रधानसेवक असल्याचे जाहीर केले होते. हाच संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी कोरोनाकाळ असेल किंवा त्यानंतरची परिस्थिती, देशातील ८० कोटी जनतेला मोफत धान्य देण्याचं काम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या देशात झालं.

आता दिवाळीचा सण आला असून प्रत्येक कुटुंबात चणा डाळ अतिशय उपयुक्त आहे. बाजरभाव १२० रुपये किलो असताना ६० रुपये किलो दराने हि डाळ उपलब्ध करण्यात आली असून एका व्यक्तीला ५ किलो चणाडाळ घेता येणार आहे. अल्प दरात डाळ उपलब्ध करून जनतेची आनंदाची दिवाळी करण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे. राज्य सरकारने देखील आनंदाच्या शिधाच्या माध्यमातून नागरिकांना दिवाळीसाठी उपयुक्त वस्तु देण्यात येणार आहे यामुळे नागरिकांची दिवाळी आणखी आनंदमय होणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली.