शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिका अधिकाऱ्यांत पदावरून खदखद, शासन प्रतिनियुक्त अधिकाऱ्यांची प्रतिक्षा

By सदानंद नाईक | Updated: June 1, 2024 17:42 IST

उल्हासनगर महापालिका आयुक्तांनी मागणी करूनही, शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अधिकारी दिले जात नसल्याने, वर्ग-१ व २ ची ८० टक्के पदे रिक्त आहेत.

उल्हासनगर : महापालिकेत शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अधिकाऱ्यांची नियुक्ती होत नसल्याने, वर्ग-१ व २ ची ८० टक्के पदे रिक्त आहेत. तर दुसरीकडे आवडी कर्मचाऱ्यांना एक पेक्षा जास्त महत्वाचे प्रभारी पदे तर नावाडी कर्मचाऱ्यांना साईडला टाकल्याचा सूर कर्मचाऱ्यांत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगले आहे. 

उल्हासनगर महापालिका आयुक्तांनी मागणी करूनही, शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अधिकारी दिले जात नसल्याने, वर्ग-१ व २ ची ८० टक्के पदे रिक्त आहेत. एक अतिरिक्त आयुक्त, दोन उपायुक्त, ६ सहायक आयुक्त, शहर अभियंता, बांधकाम व पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, कर संकलक निर्धारक, वैधकीय अधिकारी, नगररचनाकार, परिवहन व्यवस्थापक, महापालिका सचिव, मुख्य अग्निशमन अधिकारी, जनसंपर्क अधिकारी आदी महत्वाचे पदे रिक्त आहेत. त्यामुळे महापालिका कारभारात सावळागोंधळ उडाला आहे. महत्वाचे बहुतांश पदे लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्यांकडे देण्यात आल्याने, त्या पदाचा दरारा महापालिकेत राहिला नसल्याचे चित्र आहे. प्रभारी पदाचा पदभार देतांना एकाच अधिकाऱ्याकडे एक पेक्षा जास्त महत्वाचे पदे दिले. तर काही कर्मचारी व अधिकाऱ्यांना साईडला टाकल्याचे चित्र महापालिकेत आहे.

 महापालिकेत महत्वाचे प्रभारी पदे एकाच अधिकारी व लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्यांकडे दिल्याने, अन्य कर्मचाऱ्यांच्या नाराजीचा सूर उमटत आहे. ज्या अधिकाऱ्याकडे एका पेक्षा जास्त महत्वाचे पदे दिले. त्यातील बहुतांश अधिकारी व कर्मचारी यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. आयुक्त अजीज शेख हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार होते. मात्र निवृत्तीच्या एका आठवड्यापूर्वी ते आयएएस झाल्याने, त्यांना दोन वर्षे सेवा बढती मिळाली आहे. त्यांमुळे त्यांच्या बदलीची चर्चा शहरात सुरू झाली असून आयुक्तांनी एकाच अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे एका पेक्षा जास्त पदे न देता जुन्या व प्रामाणिक कर्मचाऱ्याना न्याय देण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून अप्रत्यक्ष होत आहे.

 प्रतिनियुक्तीच्या अधिकाऱ्याची मागणी महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांची मागणी शासनाकडे केली. मात्र प्रतिनियुक्तीवर अधिकारी का दिले जात नाही?. असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.