शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

उल्हासनगर महापालिका अधिकाऱ्यांत पदावरून खदखद, शासन प्रतिनियुक्त अधिकाऱ्यांची प्रतिक्षा

By सदानंद नाईक | Updated: June 1, 2024 17:42 IST

उल्हासनगर महापालिका आयुक्तांनी मागणी करूनही, शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अधिकारी दिले जात नसल्याने, वर्ग-१ व २ ची ८० टक्के पदे रिक्त आहेत.

उल्हासनगर : महापालिकेत शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अधिकाऱ्यांची नियुक्ती होत नसल्याने, वर्ग-१ व २ ची ८० टक्के पदे रिक्त आहेत. तर दुसरीकडे आवडी कर्मचाऱ्यांना एक पेक्षा जास्त महत्वाचे प्रभारी पदे तर नावाडी कर्मचाऱ्यांना साईडला टाकल्याचा सूर कर्मचाऱ्यांत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगले आहे. 

उल्हासनगर महापालिका आयुक्तांनी मागणी करूनही, शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अधिकारी दिले जात नसल्याने, वर्ग-१ व २ ची ८० टक्के पदे रिक्त आहेत. एक अतिरिक्त आयुक्त, दोन उपायुक्त, ६ सहायक आयुक्त, शहर अभियंता, बांधकाम व पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, कर संकलक निर्धारक, वैधकीय अधिकारी, नगररचनाकार, परिवहन व्यवस्थापक, महापालिका सचिव, मुख्य अग्निशमन अधिकारी, जनसंपर्क अधिकारी आदी महत्वाचे पदे रिक्त आहेत. त्यामुळे महापालिका कारभारात सावळागोंधळ उडाला आहे. महत्वाचे बहुतांश पदे लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्यांकडे देण्यात आल्याने, त्या पदाचा दरारा महापालिकेत राहिला नसल्याचे चित्र आहे. प्रभारी पदाचा पदभार देतांना एकाच अधिकाऱ्याकडे एक पेक्षा जास्त महत्वाचे पदे दिले. तर काही कर्मचारी व अधिकाऱ्यांना साईडला टाकल्याचे चित्र महापालिकेत आहे.

 महापालिकेत महत्वाचे प्रभारी पदे एकाच अधिकारी व लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्यांकडे दिल्याने, अन्य कर्मचाऱ्यांच्या नाराजीचा सूर उमटत आहे. ज्या अधिकाऱ्याकडे एका पेक्षा जास्त महत्वाचे पदे दिले. त्यातील बहुतांश अधिकारी व कर्मचारी यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. आयुक्त अजीज शेख हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार होते. मात्र निवृत्तीच्या एका आठवड्यापूर्वी ते आयएएस झाल्याने, त्यांना दोन वर्षे सेवा बढती मिळाली आहे. त्यांमुळे त्यांच्या बदलीची चर्चा शहरात सुरू झाली असून आयुक्तांनी एकाच अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे एका पेक्षा जास्त पदे न देता जुन्या व प्रामाणिक कर्मचाऱ्याना न्याय देण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून अप्रत्यक्ष होत आहे.

 प्रतिनियुक्तीच्या अधिकाऱ्याची मागणी महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांची मागणी शासनाकडे केली. मात्र प्रतिनियुक्तीवर अधिकारी का दिले जात नाही?. असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.