शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

उल्हास नदीला पुन्हा जलपर्णीचा वेढा; नदीत सोडले जातेय प्रदूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 00:52 IST

यंत्रणांचे दुर्लक्ष : नदीत सोडले जातेय प्रदूषित पाणी

कल्याण :  उल्हास नदीत दररोज ६०० दशलक्ष लीटर रसायनमिश्रित सांडपाणी व मलमूत्र प्रक्रिया न करताच सोडले जात आहे. या प्रदूषित पाण्यावर नदीपात्रात पुन्हा जलपर्णी वनस्पती उगवली आहे. या सगळ्याकडे सरकारी यंत्रणाचे दुर्लक्ष होत आहे.

उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी २०१३ पासून वनशक्ती या पर्यावरण संस्थेचा लढा सुरू आहे. या संस्थेची याचिका हरित लवादाकडे न्याय प्रविष्ट आहे. मात्र, कोरोनामुळे लवादाचे बेंच बसत नसल्यामुळे मार्चपासून आजपर्यंत सुनावणीच झालेली नाही. उल्हास वालधुनी जल बिरादरी आणि उल्हास नदी बचाव समिती यांच्याकडून वारंवार उल्हास नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न विविध ठिकाणी उपस्थित केला जात आहे. मात्र, त्याकडे स्थानिक स्वराज्य संस्था, एमआयडीसी, लघुपाटबंधारे, प्रदूषण नियंत्रण मंडळ आदींचे दुर्लक्ष होत आहे. मनसेचे माजी नगरसेवक नितीन निकम यांनीही प्रदूषणाकडे लक्ष वेधले आहे.

उल्हास नदीत कर्जतमधून ५० दशलक्ष लीटर, नेरळमधून ५० दशलक्ष लीटर, कुळगाव बदलापूरमधून ६० दशलक्ष लीटर, उल्हासनगरातून ९० दशलक्ष लीटर, केडीएमसीतून २१५ दशलक्ष लीटर, भिवंडीतून ११० दशलक्ष लीटर मलमूत्र व रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच सोडले जात  आहे. 

येत्या पाच वर्षांत उल्हास नदी ही जीवनदायिनी नदी न राहता प्रदूषित नदी होऊन तिला वालधुनी या प्रदूषित नदीचे स्वरूप येईल, असा दावा पर्यावरणप्रेमी व नदी बचावसाठी काम करणाऱ्यांकडून केला जात आहे. नदीप्रदूषण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दंड ठोठावला आहे, तरीही प्रदूषण थांबलेले नाही. प्रदूषित पाण्यामुळे नदीच्या पाण्यावर पुन्हा जलपर्णी उगवली असून, ती आरोग्यास हानिकारक आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.

टॅग्स :kalyanकल्याण