शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हास नदीला पुन्हा जलपर्णीचा वेढा; नदीत सोडले जातेय प्रदूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 00:52 IST

यंत्रणांचे दुर्लक्ष : नदीत सोडले जातेय प्रदूषित पाणी

कल्याण :  उल्हास नदीत दररोज ६०० दशलक्ष लीटर रसायनमिश्रित सांडपाणी व मलमूत्र प्रक्रिया न करताच सोडले जात आहे. या प्रदूषित पाण्यावर नदीपात्रात पुन्हा जलपर्णी वनस्पती उगवली आहे. या सगळ्याकडे सरकारी यंत्रणाचे दुर्लक्ष होत आहे.

उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी २०१३ पासून वनशक्ती या पर्यावरण संस्थेचा लढा सुरू आहे. या संस्थेची याचिका हरित लवादाकडे न्याय प्रविष्ट आहे. मात्र, कोरोनामुळे लवादाचे बेंच बसत नसल्यामुळे मार्चपासून आजपर्यंत सुनावणीच झालेली नाही. उल्हास वालधुनी जल बिरादरी आणि उल्हास नदी बचाव समिती यांच्याकडून वारंवार उल्हास नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न विविध ठिकाणी उपस्थित केला जात आहे. मात्र, त्याकडे स्थानिक स्वराज्य संस्था, एमआयडीसी, लघुपाटबंधारे, प्रदूषण नियंत्रण मंडळ आदींचे दुर्लक्ष होत आहे. मनसेचे माजी नगरसेवक नितीन निकम यांनीही प्रदूषणाकडे लक्ष वेधले आहे.

उल्हास नदीत कर्जतमधून ५० दशलक्ष लीटर, नेरळमधून ५० दशलक्ष लीटर, कुळगाव बदलापूरमधून ६० दशलक्ष लीटर, उल्हासनगरातून ९० दशलक्ष लीटर, केडीएमसीतून २१५ दशलक्ष लीटर, भिवंडीतून ११० दशलक्ष लीटर मलमूत्र व रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच सोडले जात  आहे. 

येत्या पाच वर्षांत उल्हास नदी ही जीवनदायिनी नदी न राहता प्रदूषित नदी होऊन तिला वालधुनी या प्रदूषित नदीचे स्वरूप येईल, असा दावा पर्यावरणप्रेमी व नदी बचावसाठी काम करणाऱ्यांकडून केला जात आहे. नदीप्रदूषण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दंड ठोठावला आहे, तरीही प्रदूषण थांबलेले नाही. प्रदूषित पाण्यामुळे नदीच्या पाण्यावर पुन्हा जलपर्णी उगवली असून, ती आरोग्यास हानिकारक आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.

टॅग्स :kalyanकल्याण