शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

उल्हास नदीला पुन्हा जलपर्णीचा वेढा; नदीत सोडले जातेय प्रदूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 00:52 IST

यंत्रणांचे दुर्लक्ष : नदीत सोडले जातेय प्रदूषित पाणी

कल्याण :  उल्हास नदीत दररोज ६०० दशलक्ष लीटर रसायनमिश्रित सांडपाणी व मलमूत्र प्रक्रिया न करताच सोडले जात आहे. या प्रदूषित पाण्यावर नदीपात्रात पुन्हा जलपर्णी वनस्पती उगवली आहे. या सगळ्याकडे सरकारी यंत्रणाचे दुर्लक्ष होत आहे.

उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी २०१३ पासून वनशक्ती या पर्यावरण संस्थेचा लढा सुरू आहे. या संस्थेची याचिका हरित लवादाकडे न्याय प्रविष्ट आहे. मात्र, कोरोनामुळे लवादाचे बेंच बसत नसल्यामुळे मार्चपासून आजपर्यंत सुनावणीच झालेली नाही. उल्हास वालधुनी जल बिरादरी आणि उल्हास नदी बचाव समिती यांच्याकडून वारंवार उल्हास नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न विविध ठिकाणी उपस्थित केला जात आहे. मात्र, त्याकडे स्थानिक स्वराज्य संस्था, एमआयडीसी, लघुपाटबंधारे, प्रदूषण नियंत्रण मंडळ आदींचे दुर्लक्ष होत आहे. मनसेचे माजी नगरसेवक नितीन निकम यांनीही प्रदूषणाकडे लक्ष वेधले आहे.

उल्हास नदीत कर्जतमधून ५० दशलक्ष लीटर, नेरळमधून ५० दशलक्ष लीटर, कुळगाव बदलापूरमधून ६० दशलक्ष लीटर, उल्हासनगरातून ९० दशलक्ष लीटर, केडीएमसीतून २१५ दशलक्ष लीटर, भिवंडीतून ११० दशलक्ष लीटर मलमूत्र व रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच सोडले जात  आहे. 

येत्या पाच वर्षांत उल्हास नदी ही जीवनदायिनी नदी न राहता प्रदूषित नदी होऊन तिला वालधुनी या प्रदूषित नदीचे स्वरूप येईल, असा दावा पर्यावरणप्रेमी व नदी बचावसाठी काम करणाऱ्यांकडून केला जात आहे. नदीप्रदूषण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दंड ठोठावला आहे, तरीही प्रदूषण थांबलेले नाही. प्रदूषित पाण्यामुळे नदीच्या पाण्यावर पुन्हा जलपर्णी उगवली असून, ती आरोग्यास हानिकारक आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.

टॅग्स :kalyanकल्याण