शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

"उद्धव ठाकरे यांनी आम्हाला मदत करुन दिली नाही, म्हणून एकनाथ शिंदे आमच्यासोबत", भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे विधान

By मुरलीधर भवार | Updated: September 14, 2022 16:23 IST

Ganpat Gaikwad: राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना एकनाथ शिंदे यांची आम्हाला मदत करण्याची इच्छा होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी आम्हाला मदत करु दिली नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले असे विधान कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी यांनी केले आहे.

- मुरलीधर भवार

कल्याण - राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना एकनाथ शिंदे यांची आम्हाला मदत करण्याची इच्छा होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी आम्हाला मदत करु दिली नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले असे विधान कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी यांनी केले आहे.एका सोशल मिडियावर काही सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकत्र्यानी आमदार गायकवाड यांच्या कामाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावेळी आमदार गायकवाड यांनी सोशल मिडियावर चर्चा करण्यापेक्षा खुली चर्चा करा. समोर येऊन कोणत्याही प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी समर्थ आहे असे आव्हान दिले होते. त्यानुसार आज ड प्रभाग कार्यालयाच्या समोर समाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विनोद तिवारी यांच्यासह काही नागरीक यांच्याशी चर्चा करण्यासाठी आमदार गायकवाड आले होते. यावेळी चर्चेच्या दरम्यान आमदार गायकवाड यांनी उपरोक्त विधान केले.

आमदार गायकवाड यांनी सांगितले की, राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार आहे. या दोन्ही नेत्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मी मिळून फूल स्पीडने कल्याण पूर्व मतदार संघाचा विकास करुन अशी हमी उपस्थित जागरुक नागरीक वर्गाला दिली. शहरातील विकास कामांसंदर्भात तिवारी यांच्यासह अन्य नागरीकांनी पंधरा मुद्यावर आमदार गायकवाड यांनी चर्चा केली. त्यांनी नागरीकांच्या सगळ्य़ा प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली. एखाद्या विकास कामासाठी किती निधी प्राप्त झाला. एखादे काम झाले आहे. तर एखादे काम का झाले नाही. ते न होण्यामागचे तांत्रिक आणि प्रशासकीय अडथळे काय आहेत. त्याची सविस्तर माहिती दिली.

कोणती कामे नगरसेवकांशी संबंधित आहे. कोणती कामे खासदार आणि आमदारांशी संबंधित आहेत या विषयीची माहिती उपस्थितांना दिली. तसेच नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी मी २४ तास उपलब्ध असतो. नागरीक माङयाकडे अनेक प्रश्न घेऊन येत असतात. त्याउपरही मी दर रविवारी नागरीकांच्या भेटी गाठीसाठी वेळ राखून ठेवतो. प्रत्येक नागरीकांना कार्यालयात भेटून त्यांची समस्या जाणून घेतो. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करतो. तसेच त्यांचा आढावा घेऊन समस्या सोडविल्यावर त्या नागरीकाला फोन करुन सांगतो की, त्याचे काम झाले आहे किंवा किती दिवसात मार्गी लागणार आहे. त्यामुळे काही प्रश्न सुटले नसतील तर ते का सुटले नाही. त्याची कारणो काय आहे. हे जाणून घेऊन आरोप केले पाहिजे. थेट कोणावर काही आरोप करणे योग्य नाही. लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याचा अधिकार नागरीकांना आहे. तो त्यांनी विचारलाच पाहिजे याकडे आमदार गायकवाड यांनी यावेळी लक्ष वेधले.

टॅग्स :kalyanकल्याण