शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

"उद्धव ठाकरे यांनी आम्हाला मदत करुन दिली नाही, म्हणून एकनाथ शिंदे आमच्यासोबत", भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे विधान

By मुरलीधर भवार | Updated: September 14, 2022 16:23 IST

Ganpat Gaikwad: राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना एकनाथ शिंदे यांची आम्हाला मदत करण्याची इच्छा होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी आम्हाला मदत करु दिली नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले असे विधान कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी यांनी केले आहे.

- मुरलीधर भवार

कल्याण - राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना एकनाथ शिंदे यांची आम्हाला मदत करण्याची इच्छा होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी आम्हाला मदत करु दिली नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले असे विधान कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी यांनी केले आहे.एका सोशल मिडियावर काही सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकत्र्यानी आमदार गायकवाड यांच्या कामाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावेळी आमदार गायकवाड यांनी सोशल मिडियावर चर्चा करण्यापेक्षा खुली चर्चा करा. समोर येऊन कोणत्याही प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी समर्थ आहे असे आव्हान दिले होते. त्यानुसार आज ड प्रभाग कार्यालयाच्या समोर समाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विनोद तिवारी यांच्यासह काही नागरीक यांच्याशी चर्चा करण्यासाठी आमदार गायकवाड आले होते. यावेळी चर्चेच्या दरम्यान आमदार गायकवाड यांनी उपरोक्त विधान केले.

आमदार गायकवाड यांनी सांगितले की, राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार आहे. या दोन्ही नेत्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मी मिळून फूल स्पीडने कल्याण पूर्व मतदार संघाचा विकास करुन अशी हमी उपस्थित जागरुक नागरीक वर्गाला दिली. शहरातील विकास कामांसंदर्भात तिवारी यांच्यासह अन्य नागरीकांनी पंधरा मुद्यावर आमदार गायकवाड यांनी चर्चा केली. त्यांनी नागरीकांच्या सगळ्य़ा प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली. एखाद्या विकास कामासाठी किती निधी प्राप्त झाला. एखादे काम झाले आहे. तर एखादे काम का झाले नाही. ते न होण्यामागचे तांत्रिक आणि प्रशासकीय अडथळे काय आहेत. त्याची सविस्तर माहिती दिली.

कोणती कामे नगरसेवकांशी संबंधित आहे. कोणती कामे खासदार आणि आमदारांशी संबंधित आहेत या विषयीची माहिती उपस्थितांना दिली. तसेच नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी मी २४ तास उपलब्ध असतो. नागरीक माङयाकडे अनेक प्रश्न घेऊन येत असतात. त्याउपरही मी दर रविवारी नागरीकांच्या भेटी गाठीसाठी वेळ राखून ठेवतो. प्रत्येक नागरीकांना कार्यालयात भेटून त्यांची समस्या जाणून घेतो. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करतो. तसेच त्यांचा आढावा घेऊन समस्या सोडविल्यावर त्या नागरीकाला फोन करुन सांगतो की, त्याचे काम झाले आहे किंवा किती दिवसात मार्गी लागणार आहे. त्यामुळे काही प्रश्न सुटले नसतील तर ते का सुटले नाही. त्याची कारणो काय आहे. हे जाणून घेऊन आरोप केले पाहिजे. थेट कोणावर काही आरोप करणे योग्य नाही. लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याचा अधिकार नागरीकांना आहे. तो त्यांनी विचारलाच पाहिजे याकडे आमदार गायकवाड यांनी यावेळी लक्ष वेधले.

टॅग्स :kalyanकल्याण