शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

उंबार्लीत श्रमदानातून दोन जलस्रोत झाले पुनरुज्जीवित; ३० स्वयंसेवकांनी घेतला पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 23:28 IST

३० स्वयंसेवकांनी घेतला पुढाकार : दोन फूट खोल मातीचा गाळ काढला

डोंबिवली : उंबार्ली येथील पक्षी अभयारण्यामध्ये ३० पर्यावरणप्रेमींनी १८ आणि २५ एप्रिल, अशा सलग दोन रविवारी श्रमदान करून दोन नैसर्गिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन केले. या जलस्रोतांमध्ये यावेळी पाण्याबरोबर गाळही काढण्यात आला. त्यामुळे आता त्यात अधिक प्रमाणात पाण्याचा साठा होणार आहे. त्याचा फायदा परिसरातील झाडांबरोबर पशू-पक्ष्यांना होईल, असे सांगण्यात आले.

उंबार्ली बाजूच्या डोंगरावर उंबराचे पाणी हा पाणवठा असून, त्याच्या कातळात जिवंत पाण्याचे झरे आहेत. पूर्वी या पाण्याचा वापर उंबार्लीतील ग्रामस्थ शेती व गुरांसाठी करत असत; पण गेली कित्येक वर्षे त्याचा वापर बंद आहे, तसेच पावसाच्या पाण्याबरोबर आलेल्या मातीचा गाळ त्यात साचला होता. श्रमदान शिबिरात जवळजवळ दोन फूट मातीचा ओला गाळ आणि चिखल या पाणवठ्यातून काढण्यात आला, तसेच गाळ व माती परत आत येऊ नये, यासाठी दगडांचा बंधारा बांधण्यात आला.

पाणवठ्याजवळ उंबराचे झाड असून, तिथे खोलगट भाग आहे. डोंगरावरून येणारे पावसाचे पाणी त्यात साठवण्यासाठी खड्डा खोदण्यात आला. साधारण १५ बाय १० फूट, असा हा खड्डा आहे. खड्ड्यातून काढलेली माती दगडी बंधारा तयार करून त्यावर लेपण्यात आली, तसेच खड्ड्यात डोंगरावरची माती येऊ नये म्हणून वरच्या बाजूस डोंगर उतारावर मातीत चर खोदले. माती पावसाबरोबर वाहून जाणार नाही व पाणी जास्तीत जास्त मुरेल आणि ते झाडांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरेल, असे पर्यावरणप्रेमी मंगेश कोयंडे यांनी सांगितले. असेच अनेक उपक्रम डोंबिवली पक्षी अभयारण्यात राबविण्यात येतील. अशा उपक्रमांद्वारे पक्षी, प्राण्यांचे आणि झाडांचे संवर्धन, संरक्षण योग्यरीत्या करण्यात येईल, असे ते म्हणाले.

या संस्थांनी घेतला सहभागसलग दोन रविवार सकाळी ३० स्वयंसेवकांनी श्रमदान केले. या उपक्रमात उंबार्ली, सोनार पाडा, दावडी, भाल, धामटन, खोणी आणि निळजे ही डोंबिवली पक्षी अभयारण्य लगतच्या गावांतील ग्रामस्थही सहभागी झाले होते.

टॅग्स :kalyanकल्याण