शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

बैलगाडा शर्यतीतील फायरिंग प्रकरणातील वांटेड असलेले दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

By मुरलीधर भवार | Updated: August 31, 2024 19:51 IST

कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी

कल्याण-बैलगाडा शर्यतीत रिव्हा’ल्वर व बंदूकांनी अंधाधुंद फायरींग करुन जीवे ठार मारण्याच्या कटातील पाहिजे असलेल्या दोन आरोपींना कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे किरण अशोक गायकवाड (३५) आणि दीपेश तुलशीराम जाधव (३०) अशी आहेत. किरण हा डोंबिवलीतील देसलेपाड्यात राहणारा आहे. तर दीपेश हा आडीवली गावचा रहिवासी आहे. पोलिस या दोघांच्या शोधात होते. त्यांच्या विरोधात पोलिसांकडून मोक्काची करण्यात आली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२२ मध्ये आडीवली येथे राहणारे राहूल पाटील व त्यांच्या साथीदारांसोबत अंबरनाथ एमआयडीसी परिसरातील सुदामा हॉटेल येथे चर्चा करायची असे प्लानिंग करुन त्यांच्या जीवे ठार मारण्याचा कट रचला. रिव्हा’ल्वर आणि बंदूकातून फायरिंग करुन खून करण्याचा पंढरीनाथ फडके आणि त्या्च्या साथीदारांनी प्रयत्न केला होता. या प्रकरणी अंबरनाथ शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयात काही आरोपी अटक करण्यात आले. तर काही आरोपी फरार आहेत. त्यापैकी आरोपी किरण गायकवाड आणि दीपेश जाधव हे दोघे जण कुठेतरी बाहेर जाण्याकरीता कल्याण शीळ रोडवरील रुणवाल गृहसंकुलाच्या गेटवर भेटणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचला. त्यानुसार दोन्ही आरोपी त्याठिकाणी आले. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबूली दिली आहे. आरोपी किरण हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहे. दोन्ही आरोपी गेल्या दीड वर्षापासून होते. कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरिक्षक अजित शिंदे, सहाय्यक पाेलिस निरिक्षक संतोष उगलमुगले आणि उप निरिक्षक दत्ताराम भोसले यांच्या पथकाने आरोपींना जेरबंद करण्याची कारवाई केली आहे.