शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

खदानीच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या २ मुलांचा बुडून मृत्यू

By प्रशांत माने | Updated: October 9, 2022 15:52 IST

एकाला वाचविण्यात यश, भोपर गावातील घटना; खदानी ठरतायत मृत्यूचे सापळे

डोंबिवली: येथील भोपर गावातील गावदेवी मंदिरामागील खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या सहा मुलांपैकी दोघा मुलांचा बुडून दुर्देवी मुत्यु झाल्याची घटना रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. अन्य एका बुडणा-याला उर्वरीत तिघांनी वाचविले. मे महिन्यात एकाच कुटुंबातील पाच जणांचा खदानीत बुडून मृत्यू झाल्याची घटना संदप-भोपर परिसरात घडली होती. रविवारी घडलेल्या घटनेमुळे खदानी ठरतायत मृत्यूचे सापळे ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले.

आयुष केदारे (वय १२) आणि आयुष गुप्ता (वय १३) दोघेही रा. आयरेगाव, ज्योतीनगर झोपडपट्टी अशी मृत्यू झालेल्या दोघा मुलांची नावे आहेत. हे दोघे रविवारी सुट्टी असल्याने सकाळी अतुल अवटे, किर्तन म्हात्रे, पवन चव्हाण, परमेश्वर घोडके यांसह अन्य काही मित्रांबरोबर ज्योतीनगरमधील एका शाळेच्या पटांगणावर क्रिकेट खेळत होते. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दोघेजण अतुल, किर्तन, पवन आणि परमेश्वर यांच्यासह सायकलवरून भोपर येथील खदानीच्या पाण्यात पोहायला गेले होते. खदानीत उतरलेल्या सहाजणांपैकी अतुल, पवन, किर्तन हे खदानीच्या काठावर तर आयुष केदारे, आयुष गुप्ता आणि घोडके हे खोलवर पाण्यात पोहायला गेले होते. त्या तिघांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि ते बुडू लागले. यातील घोडकेला वाचविण्यात अन्य तिघांना यश आले परंतू दोघेही आयुष हे चिखलात रूतले गेल्याने त्यांना वाचविता आले नाही. ते बुडाल्याने चौघांनी आरडाओरड करायला सुरूवात केली. स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

पलावा अग्निशमन दल आणि मानपाडा पोलिसांना पाचारण करण्यात आले. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या शोध कार्यात दोघांचे मृतदेह हाती लागला. दरम्यान या घटनेने आयरेगाव, ज्योतीनगर झोपडपट्टीत शोककळा पसरली आहे.

डोंबिवली नजीकच्या संदप, खोणी, भोपर, चिंचपाडा, पलावा या ग्रामीण भागाच्या ठिकाणी अशा अनेक खदानी आहेत. त्याचा वापर गणेश विसर्जनासाठी होतो. एप्रिल- मे महिन्यात गावात पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने तेथील लोक कपडे धुण्यासाठी देखील या खदानींचा वापर करतात. मे महिन्यात पाणी टंचाईमुळे कपडे धुण्यासाठी खदानीवर गेलेल्या भोपर-देसलेपाडा परिसरातील एकाच कुटुंबातील पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. संदप-भोपर परिसरातील खदानीत  ही घटना घडली होती. आता रविवारी भोपर गावातील खदानीत दोघांना जीव गमवावा लागला आहे.  एकुणच ग्रामीण परिसरातील खदानींवर घडलेले आजवरचे अपघात पाहता संबंधित यंत्रणेने त्या कायमस्वरूपी बुजविणे गरजेचे आहे. आता तरी प्रशासनाला जाग येईल का?अन्यथा हा जीवघेण्या अपघातांचा सिलसिला कायम चालू राहील यात शंका नाही.