शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
4
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
5
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
6
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
7
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
8
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
9
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
10
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
11
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
12
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
13
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
14
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
15
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
16
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
17
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
18
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
19
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
20
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?

खदानीच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या २ मुलांचा बुडून मृत्यू

By प्रशांत माने | Updated: October 9, 2022 15:52 IST

एकाला वाचविण्यात यश, भोपर गावातील घटना; खदानी ठरतायत मृत्यूचे सापळे

डोंबिवली: येथील भोपर गावातील गावदेवी मंदिरामागील खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या सहा मुलांपैकी दोघा मुलांचा बुडून दुर्देवी मुत्यु झाल्याची घटना रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. अन्य एका बुडणा-याला उर्वरीत तिघांनी वाचविले. मे महिन्यात एकाच कुटुंबातील पाच जणांचा खदानीत बुडून मृत्यू झाल्याची घटना संदप-भोपर परिसरात घडली होती. रविवारी घडलेल्या घटनेमुळे खदानी ठरतायत मृत्यूचे सापळे ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले.

आयुष केदारे (वय १२) आणि आयुष गुप्ता (वय १३) दोघेही रा. आयरेगाव, ज्योतीनगर झोपडपट्टी अशी मृत्यू झालेल्या दोघा मुलांची नावे आहेत. हे दोघे रविवारी सुट्टी असल्याने सकाळी अतुल अवटे, किर्तन म्हात्रे, पवन चव्हाण, परमेश्वर घोडके यांसह अन्य काही मित्रांबरोबर ज्योतीनगरमधील एका शाळेच्या पटांगणावर क्रिकेट खेळत होते. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दोघेजण अतुल, किर्तन, पवन आणि परमेश्वर यांच्यासह सायकलवरून भोपर येथील खदानीच्या पाण्यात पोहायला गेले होते. खदानीत उतरलेल्या सहाजणांपैकी अतुल, पवन, किर्तन हे खदानीच्या काठावर तर आयुष केदारे, आयुष गुप्ता आणि घोडके हे खोलवर पाण्यात पोहायला गेले होते. त्या तिघांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि ते बुडू लागले. यातील घोडकेला वाचविण्यात अन्य तिघांना यश आले परंतू दोघेही आयुष हे चिखलात रूतले गेल्याने त्यांना वाचविता आले नाही. ते बुडाल्याने चौघांनी आरडाओरड करायला सुरूवात केली. स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

पलावा अग्निशमन दल आणि मानपाडा पोलिसांना पाचारण करण्यात आले. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या शोध कार्यात दोघांचे मृतदेह हाती लागला. दरम्यान या घटनेने आयरेगाव, ज्योतीनगर झोपडपट्टीत शोककळा पसरली आहे.

डोंबिवली नजीकच्या संदप, खोणी, भोपर, चिंचपाडा, पलावा या ग्रामीण भागाच्या ठिकाणी अशा अनेक खदानी आहेत. त्याचा वापर गणेश विसर्जनासाठी होतो. एप्रिल- मे महिन्यात गावात पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने तेथील लोक कपडे धुण्यासाठी देखील या खदानींचा वापर करतात. मे महिन्यात पाणी टंचाईमुळे कपडे धुण्यासाठी खदानीवर गेलेल्या भोपर-देसलेपाडा परिसरातील एकाच कुटुंबातील पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. संदप-भोपर परिसरातील खदानीत  ही घटना घडली होती. आता रविवारी भोपर गावातील खदानीत दोघांना जीव गमवावा लागला आहे.  एकुणच ग्रामीण परिसरातील खदानींवर घडलेले आजवरचे अपघात पाहता संबंधित यंत्रणेने त्या कायमस्वरूपी बुजविणे गरजेचे आहे. आता तरी प्रशासनाला जाग येईल का?अन्यथा हा जीवघेण्या अपघातांचा सिलसिला कायम चालू राहील यात शंका नाही.