शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

फेरीवाल्यामुळेच स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी, वाहतूक पोलिसांची केडीएमसीकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 15:32 IST

Kalyan : महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने १ जून पासून अनलॉक सुरु आहे. सुरुवातीला सर्व प्रकारची दुकाने शनिवार रविवार वगळता दुपारी दोन वाजेर्पयत सुरु ठेवण्याची मुभा दिली होती. आत्ता त्यात सायंकाळी चारवाजेर्पयत वाढ करण्यात आली आहे.

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विविध ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. त्याची कंट्रोल रुम महापालिका मुख्यालयात आहे. सीसीटीव्ही कार्यान्वीत होऊ देखील सीसीटीव्हीचे भय फेरीवाल्यांना नाही. त्यांच्याकडून रस्ता आडविला जात आहे. त्यामुळे स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. याची तक्रार वाहतूक पोलिसांनी महापालिका प्रशासनाकडे केल्यावर फेरीवाल्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे.

महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने १ जून पासून अनलॉक सुरु आहे. सुरुवातीला सर्व प्रकारची दुकाने शनिवार रविवार वगळता दुपारी दोन वाजेर्पयत सुरु ठेवण्याची मुभा दिली होती. आत्ता त्यात सायंकाळी चारवाजेर्पयत वाढ करण्यात आली आहे. स्टेशन परिसरातील शिवाजी चौक ते महंमद अली चौक, महंमद अली चौक ते दीपक हॉटेल, दीपक हॉटेल ते एसीटी डेपो, एसटी डेपो ते बैलबाजार चौक, बैलबाजार ते शिवाजी चौक या परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. शिवाजी चौक ते महंमद अली चौक , महंमद अली चौक ते दीपक हॉटेल या मार्गावर फेरीवाल्यांचे बस्तान आहे. महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत विविध ठिकाणी सीसीटीव्ही बसविले आहे. या सीसीटीव्ही अंतर्गत चौकात घडणारा अपघात, गुन्हा, वाहतूक कोंडी, फेरीवाले सर्व काही नियंत्रीत केले जाणार आहे. त्याची कंट्राल रुम महापालिका मुख्यालयात आहे. या कंट्रोल रुममधून २२० ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवता येते. सीसीटीव्ही लावण्यात आलेले असताना फेरीवाले रस्त्याच्या कडेला बसतात. वाहतूक कोंडी त्यांच्यामुळे होते. त्यांना सीसीटीव्हीचे भय नाही.

यासंदर्भात वाहतूक पोलिसांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, कंट्रोल रुमच्या आधारे २२० ठिकाणी लक्ष ठेवणो शक्य आहे. फेरीवाल्यांवर कारवाई करणो शक्य आहे. संबंधित प्रभाग अधिका:यांनी तातडीने फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश प्रभाग अधिका:यांनी दिले आहे. फेरीवाल्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल.

महापालिकेचा स्मार्ट सिटीचा प्रकल्प १४४५ कोटी रुपये खर्चाचा आहे. त्यापैकी सीसीटीव्ही लावण्यावर ७१ कोटी पेक्षा जास्त रुपये खर्च करण्यात आले आहेत. सीसीटीव्हा लावून देखील त्याचा उपयोग महापालिकेची यंत्रणा करणार नसेल. फेरीवाल्यामुळे वाहतूक कोंडी होते हे चित्र सीसीटीव्हीत कैद होऊन देखील प्रभाग अधिकारी कारवाई करणार नसतील. तर उभारलेल्या यंत्रणोचा उपयोग काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याण