शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

फेरीवाल्यामुळेच स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी, वाहतूक पोलिसांची केडीएमसीकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 15:32 IST

Kalyan : महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने १ जून पासून अनलॉक सुरु आहे. सुरुवातीला सर्व प्रकारची दुकाने शनिवार रविवार वगळता दुपारी दोन वाजेर्पयत सुरु ठेवण्याची मुभा दिली होती. आत्ता त्यात सायंकाळी चारवाजेर्पयत वाढ करण्यात आली आहे.

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विविध ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. त्याची कंट्रोल रुम महापालिका मुख्यालयात आहे. सीसीटीव्ही कार्यान्वीत होऊ देखील सीसीटीव्हीचे भय फेरीवाल्यांना नाही. त्यांच्याकडून रस्ता आडविला जात आहे. त्यामुळे स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. याची तक्रार वाहतूक पोलिसांनी महापालिका प्रशासनाकडे केल्यावर फेरीवाल्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे.

महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने १ जून पासून अनलॉक सुरु आहे. सुरुवातीला सर्व प्रकारची दुकाने शनिवार रविवार वगळता दुपारी दोन वाजेर्पयत सुरु ठेवण्याची मुभा दिली होती. आत्ता त्यात सायंकाळी चारवाजेर्पयत वाढ करण्यात आली आहे. स्टेशन परिसरातील शिवाजी चौक ते महंमद अली चौक, महंमद अली चौक ते दीपक हॉटेल, दीपक हॉटेल ते एसीटी डेपो, एसटी डेपो ते बैलबाजार चौक, बैलबाजार ते शिवाजी चौक या परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. शिवाजी चौक ते महंमद अली चौक , महंमद अली चौक ते दीपक हॉटेल या मार्गावर फेरीवाल्यांचे बस्तान आहे. महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत विविध ठिकाणी सीसीटीव्ही बसविले आहे. या सीसीटीव्ही अंतर्गत चौकात घडणारा अपघात, गुन्हा, वाहतूक कोंडी, फेरीवाले सर्व काही नियंत्रीत केले जाणार आहे. त्याची कंट्राल रुम महापालिका मुख्यालयात आहे. या कंट्रोल रुममधून २२० ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवता येते. सीसीटीव्ही लावण्यात आलेले असताना फेरीवाले रस्त्याच्या कडेला बसतात. वाहतूक कोंडी त्यांच्यामुळे होते. त्यांना सीसीटीव्हीचे भय नाही.

यासंदर्भात वाहतूक पोलिसांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, कंट्रोल रुमच्या आधारे २२० ठिकाणी लक्ष ठेवणो शक्य आहे. फेरीवाल्यांवर कारवाई करणो शक्य आहे. संबंधित प्रभाग अधिका:यांनी तातडीने फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश प्रभाग अधिका:यांनी दिले आहे. फेरीवाल्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल.

महापालिकेचा स्मार्ट सिटीचा प्रकल्प १४४५ कोटी रुपये खर्चाचा आहे. त्यापैकी सीसीटीव्ही लावण्यावर ७१ कोटी पेक्षा जास्त रुपये खर्च करण्यात आले आहेत. सीसीटीव्हा लावून देखील त्याचा उपयोग महापालिकेची यंत्रणा करणार नसेल. फेरीवाल्यामुळे वाहतूक कोंडी होते हे चित्र सीसीटीव्हीत कैद होऊन देखील प्रभाग अधिकारी कारवाई करणार नसतील. तर उभारलेल्या यंत्रणोचा उपयोग काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याण